शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
4
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
5
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
6
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
7
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
8
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
9
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
10
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
11
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
12
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
13
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
14
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
15
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
16
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
17
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
18
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
19
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
20
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह

ठाण्यातील तीन रस्ते सकाळच्या फेरफटक्यासाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 20:22 IST

ठाणेकरांचे आरोग्य सदृढ रहावे, यासाठी ठाणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सकाळी फेरफटका मारणाऱ्यांसाठी सकाळी ५ ते ७ या वेळात शहरांतील तीन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घेतला आहे. स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट ठाणे शहर आरोग्यदायीसुद्धा असावे, हाच या योजनेचा उद्देश आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देसकाळी ५ ते ७ या वेळेत वाहनांना प्रवेश बंदीठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणेकरांचे आरोग्य सदृढ रहावे, यासाठी ठाणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सकाळी फेरफटका मारणाऱ्यांसाठी सकाळी ५ ते ७ या वेळात शहरांतील तीन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घेतला आहे. या अनोख्या योजनेमुळे ठाणेकरांना ‘मॉर्निग वॉक’ करण्यास प्रोत्साहन मिळेल, सुरक्षितपणे व्यायामाची संधी मिळेल आणि सकाळच्या वेळेमध्ये होणाºया सोनसाखळी चोऱ्यांवरही नियंत्रण ठेवता येईल, असा विश्वास पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे.रस्ते सुरक्षा मोहिमेंतर्गत ठाणे वाहतूक पोलिसांनी ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हे अभियान हाती घेतले आहे. परंतू, त्यातून केवळ वाहन चालकांसाठीच नव्हे, तर पादचाºयांच्या सुरिक्षततेसाठीही प्रयत्न करणे महत्वाचे आहे. त्यानुसार ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने ही योजना मूर्त स्वरूपात आणली जात आहे. केवळ प्रभात फेरीसाठी काही रस्ते आरक्षित असावे, यासाठी सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला आग्रही होते. त्यांच्या सूचनेनुसार ठाणे शहरातील तीन हात नाका (उपायुक्त कार्यालय) ते धर्मवीर नाका सेवा रस्ता , उपवन तलावाजवळील अँम्फी थिएटर ते गावंड बाग (गणपती विसर्जनाचा कृत्रिम तलाव), पोखरण रोड क्र मांक दोन येथील बिरसा मुंडा चौक ते काशिनाथ घाणेकर नाटयगृह चौक या तीन रस्त्यांची निवड या विशेष योजनेसाठी केली आहे. पहाटे ५ ते ७ या वेळेमध्ये या तिन्ही रस्त्यांवर दुचाकी, तीन चाकी, चार चाकी किंवा अन्य कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. या रस्त्यांवर केवळ प्रभात फेरी योगा किंवा अन्य प्रकारांचे व्यायाम करणारे तसेच, सायकलिंग करणाºयांनाच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली.प्रभात फेरी करणाºया महिलांच्या गळयातील सोनसाखळया चोरीचे प्रकार रोखण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले जातात. मात्र, वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवरून फेरफटका मारणेही महिलांना असुरक्षित वाटते. परंतू, आता या तीन रस्त्यांवर वाहनांना प्रवेश मिळणार नसल्याने महिलांसह प्रत्येक पादचाºयांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तसेच, चालतांना रस्त्यांवर अपघात होण्याचा धोकाही नसेल. या उपक्र मामुळे सकाळी प्रभात फेरी मारणाºयांच्या संख्येत निश्चित भर पडेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.* स्मार्ट आणि आरोग्यदायी शहरासाठीसकाळचा फेरफटका मारण्याचे अनेक फायदे आहेत. चालण्याने श्वासाची गती, हृदयाची गती तसेच रक्त प्रवाहावर चांगला परिणाम होतो. पचनशक्ती वाढून भूक वाढण्यास मदत होते. शरीर तंदुरु स्त राहते. त्यामुळे प्रभात फेरीला प्रोत्साहन देण्याचे आमचे धोरण आहे. स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट ठाणे शहर आरोग्यदायीसुद्धा असावे, हाच या योजनेचा उद्देश आहे.बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस