शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

ठाण्यातील तीन रस्ते सकाळच्या फेरफटक्यासाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 20:22 IST

ठाणेकरांचे आरोग्य सदृढ रहावे, यासाठी ठाणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सकाळी फेरफटका मारणाऱ्यांसाठी सकाळी ५ ते ७ या वेळात शहरांतील तीन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घेतला आहे. स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट ठाणे शहर आरोग्यदायीसुद्धा असावे, हाच या योजनेचा उद्देश आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देसकाळी ५ ते ७ या वेळेत वाहनांना प्रवेश बंदीठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणेकरांचे आरोग्य सदृढ रहावे, यासाठी ठाणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सकाळी फेरफटका मारणाऱ्यांसाठी सकाळी ५ ते ७ या वेळात शहरांतील तीन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घेतला आहे. या अनोख्या योजनेमुळे ठाणेकरांना ‘मॉर्निग वॉक’ करण्यास प्रोत्साहन मिळेल, सुरक्षितपणे व्यायामाची संधी मिळेल आणि सकाळच्या वेळेमध्ये होणाºया सोनसाखळी चोऱ्यांवरही नियंत्रण ठेवता येईल, असा विश्वास पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे.रस्ते सुरक्षा मोहिमेंतर्गत ठाणे वाहतूक पोलिसांनी ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हे अभियान हाती घेतले आहे. परंतू, त्यातून केवळ वाहन चालकांसाठीच नव्हे, तर पादचाºयांच्या सुरिक्षततेसाठीही प्रयत्न करणे महत्वाचे आहे. त्यानुसार ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने ही योजना मूर्त स्वरूपात आणली जात आहे. केवळ प्रभात फेरीसाठी काही रस्ते आरक्षित असावे, यासाठी सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला आग्रही होते. त्यांच्या सूचनेनुसार ठाणे शहरातील तीन हात नाका (उपायुक्त कार्यालय) ते धर्मवीर नाका सेवा रस्ता , उपवन तलावाजवळील अँम्फी थिएटर ते गावंड बाग (गणपती विसर्जनाचा कृत्रिम तलाव), पोखरण रोड क्र मांक दोन येथील बिरसा मुंडा चौक ते काशिनाथ घाणेकर नाटयगृह चौक या तीन रस्त्यांची निवड या विशेष योजनेसाठी केली आहे. पहाटे ५ ते ७ या वेळेमध्ये या तिन्ही रस्त्यांवर दुचाकी, तीन चाकी, चार चाकी किंवा अन्य कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. या रस्त्यांवर केवळ प्रभात फेरी योगा किंवा अन्य प्रकारांचे व्यायाम करणारे तसेच, सायकलिंग करणाºयांनाच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली.प्रभात फेरी करणाºया महिलांच्या गळयातील सोनसाखळया चोरीचे प्रकार रोखण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले जातात. मात्र, वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवरून फेरफटका मारणेही महिलांना असुरक्षित वाटते. परंतू, आता या तीन रस्त्यांवर वाहनांना प्रवेश मिळणार नसल्याने महिलांसह प्रत्येक पादचाºयांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तसेच, चालतांना रस्त्यांवर अपघात होण्याचा धोकाही नसेल. या उपक्र मामुळे सकाळी प्रभात फेरी मारणाºयांच्या संख्येत निश्चित भर पडेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.* स्मार्ट आणि आरोग्यदायी शहरासाठीसकाळचा फेरफटका मारण्याचे अनेक फायदे आहेत. चालण्याने श्वासाची गती, हृदयाची गती तसेच रक्त प्रवाहावर चांगला परिणाम होतो. पचनशक्ती वाढून भूक वाढण्यास मदत होते. शरीर तंदुरु स्त राहते. त्यामुळे प्रभात फेरीला प्रोत्साहन देण्याचे आमचे धोरण आहे. स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट ठाणे शहर आरोग्यदायीसुद्धा असावे, हाच या योजनेचा उद्देश आहे.बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस