शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील तीन रस्ते सकाळच्या फेरफटक्यासाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 20:22 IST

ठाणेकरांचे आरोग्य सदृढ रहावे, यासाठी ठाणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सकाळी फेरफटका मारणाऱ्यांसाठी सकाळी ५ ते ७ या वेळात शहरांतील तीन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घेतला आहे. स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट ठाणे शहर आरोग्यदायीसुद्धा असावे, हाच या योजनेचा उद्देश आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देसकाळी ५ ते ७ या वेळेत वाहनांना प्रवेश बंदीठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणेकरांचे आरोग्य सदृढ रहावे, यासाठी ठाणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सकाळी फेरफटका मारणाऱ्यांसाठी सकाळी ५ ते ७ या वेळात शहरांतील तीन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घेतला आहे. या अनोख्या योजनेमुळे ठाणेकरांना ‘मॉर्निग वॉक’ करण्यास प्रोत्साहन मिळेल, सुरक्षितपणे व्यायामाची संधी मिळेल आणि सकाळच्या वेळेमध्ये होणाºया सोनसाखळी चोऱ्यांवरही नियंत्रण ठेवता येईल, असा विश्वास पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे.रस्ते सुरक्षा मोहिमेंतर्गत ठाणे वाहतूक पोलिसांनी ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हे अभियान हाती घेतले आहे. परंतू, त्यातून केवळ वाहन चालकांसाठीच नव्हे, तर पादचाºयांच्या सुरिक्षततेसाठीही प्रयत्न करणे महत्वाचे आहे. त्यानुसार ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने ही योजना मूर्त स्वरूपात आणली जात आहे. केवळ प्रभात फेरीसाठी काही रस्ते आरक्षित असावे, यासाठी सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला आग्रही होते. त्यांच्या सूचनेनुसार ठाणे शहरातील तीन हात नाका (उपायुक्त कार्यालय) ते धर्मवीर नाका सेवा रस्ता , उपवन तलावाजवळील अँम्फी थिएटर ते गावंड बाग (गणपती विसर्जनाचा कृत्रिम तलाव), पोखरण रोड क्र मांक दोन येथील बिरसा मुंडा चौक ते काशिनाथ घाणेकर नाटयगृह चौक या तीन रस्त्यांची निवड या विशेष योजनेसाठी केली आहे. पहाटे ५ ते ७ या वेळेमध्ये या तिन्ही रस्त्यांवर दुचाकी, तीन चाकी, चार चाकी किंवा अन्य कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. या रस्त्यांवर केवळ प्रभात फेरी योगा किंवा अन्य प्रकारांचे व्यायाम करणारे तसेच, सायकलिंग करणाºयांनाच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली.प्रभात फेरी करणाºया महिलांच्या गळयातील सोनसाखळया चोरीचे प्रकार रोखण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले जातात. मात्र, वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवरून फेरफटका मारणेही महिलांना असुरक्षित वाटते. परंतू, आता या तीन रस्त्यांवर वाहनांना प्रवेश मिळणार नसल्याने महिलांसह प्रत्येक पादचाºयांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तसेच, चालतांना रस्त्यांवर अपघात होण्याचा धोकाही नसेल. या उपक्र मामुळे सकाळी प्रभात फेरी मारणाºयांच्या संख्येत निश्चित भर पडेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.* स्मार्ट आणि आरोग्यदायी शहरासाठीसकाळचा फेरफटका मारण्याचे अनेक फायदे आहेत. चालण्याने श्वासाची गती, हृदयाची गती तसेच रक्त प्रवाहावर चांगला परिणाम होतो. पचनशक्ती वाढून भूक वाढण्यास मदत होते. शरीर तंदुरु स्त राहते. त्यामुळे प्रभात फेरीला प्रोत्साहन देण्याचे आमचे धोरण आहे. स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट ठाणे शहर आरोग्यदायीसुद्धा असावे, हाच या योजनेचा उद्देश आहे.बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस