शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

जिल्ह्यात २८ जणांची कोरोनावर मात, रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 01:44 IST

ठाण्यासाठी आनंदाची बातमी : रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतेय

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करून रुग्ण बरे होण्याची संख्याही आता वाढू लागली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी मानली जात आहे. ठाण्यात आतापर्यंत तब्बल १२ कोरोना बाधीत रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तर तिकडे कल्याण डोंबिवलीतही १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासात १७ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ठाण्यात बुधवारी नवीन १४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ही २७२ एवढी झाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून मोठ्याप्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहे. आता त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसू लागले आहे. परंतु,दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्यात मंगळवारी एका दिवसात १७ नवीन कोरोनाबाधित रु ग्णांची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी ही २५१ वरून आता २७२ वर पोहोचली असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी नवीन १४ रुग्ण आढळले असून येथील रु ग्णांची संख्या १०१वर पोहोचली आहे.गेल्या काही दिवसात ठाण्यात कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. सोमवारी ३० रुग्णांची भर पडल्यानंतर मंगळवारी त्यात आणखी सात जणांची भर पडली तर बुधवारी यामध्ये १४ रुग्ण वाढल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु, असे असले तरी ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे एकीकडे कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे कोरोनावर मात करून ठाणे शहरात १२ रुग्ण हे ठणठणीत बरे झाले असून कल्याण डोंबिवलीतीला बाधीत रुग्णांची संख्या ही ५७ एवढी असून त्यातील २ रुग्ण मयत झाले आहेत. तर आतापर्यंत १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झालेले आहेत.डोंबिवलीत २ नवे रुग्णदरम्यान ठाणे शहरात आजघडीला ९५ जणांना याची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. तर १२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एका नव्या रु ग्णांची नोंद झाली आहे. तेथील रु ग्णाच्या आकडा ५२ वर पोहोचला असून डोंबिवलीत दोन रुग्ण आढळले आहेत. येथील आकडा ५७ झाला आहे. तर अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी मिरा-भार्इंदर, ठाणे ग्रामीण या भागात एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही.

टॅग्स :thaneठाणे