शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

ठाण्यात तीन नवीन अग्निशमन केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 02:56 IST

स्थायी समितीची मंजुरी; पावसाळ्यानंतर कामांना सुरुवात

ठाणे : मान्सूनमध्ये घडणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी आणि प्रतिासाद कालावधी कमी करण्याच्या दृष्टीकोणातून ठाणे महापालिकेने तीन तात्पुरती बिट फायर स्टेशन कार्यान्वित केली आहेत. यातील ओवळा येथील फायर स्टेशन कायमस्वरुपी उभारण्यात येणार आहे. तसेच चिरागनगर आणि देसाई गाव येथेदेखील नव्याने कायमस्वरुपी फायर स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्तावांना नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिल्याने येत्या काही महिन्यात ती सुरू होतील, असा विश्वास अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.घोडबंदर भागातील तात्पुरत्या स्वरुपात अग्निशमन केंद्र कायमस्वरुपात आरक्षित भूखंडावर उभारण्यात येणार आहे. यासाठी ६.७७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसेच चिरागनगर येथील सर्व्हिस रस्ता भागातील आरक्षित भूखंडावरही नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी सात लाख ९९ हजार ९०१ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर दिव्यापाठोपाठ देसाई गाव येथेदेखील नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. दिवा आणि आजूबाजूची लोकसंख्या वाढत असल्याने येथे केवळ मुंब्य्राचेच अग्निशमन केंद्र सध्या अस्तित्त्वात आहे. परंतु, एखादी दुर्घटना घडल्यास येथील केंद्रातून गाडी जाण्यासाठी तासाचा अवधी जात होता. त्यामुळे देसाई गावात नव्याने ४ कोटी ३० लाख ९६ हजार १७ रुपये खर्चून नवे केंद्र उभारण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर या तिन्ही केंद्राच्या कामांना सुरुवात होणार आहे.लोकसंख्येनुसार फायर स्टेशनची गरजशहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात आहे. त्यानुसार, १४ फायर स्टेशनची गरज आहे, परंतु सध्या ६ फायर स्टेशन कार्यान्वित असून, नव्याने तीन केंद्रे तयार होणार आहेत. तात्पुरते ओवळा (कावेसर) अग्निशमन केंद्र कायमस्वरूपी होणार आहे.आनंदनगर, माजिवडा, दिवा, रुस्तमजी, हिरानंदानी इस्टेट, देसाई गाव आदी ठिकाणीदेखील फायर स्टेशन मंजूर झाली असून, त्यांच्या कामांच्या वर्कआॅर्डर काढल्या आहेत, परंतु त्यांची कामे पावसाळ्यानंतर केली जाणार आहेत.

टॅग्स :fireआगthaneठाणे