शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

केडीएमसीचे तीन अधिकारी ‘गायब’? प्रशासनाकडे माहिती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 01:07 IST

सरकारकडे पाठवला अहवाल

कल्याण : राज्य सरकारकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरसकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार आणि महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालय आणि शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त नितीन नार्वेकर हे तीन अधिकारी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाला काहीच न सांगता ‘गायब’ झाले आहेत. अन्य कोणत्या ठिकाणी त्यांची बदली झाली का, ते तेथे रुजू झाले का, याची माहिती केडीएमसी प्रशासनाकडे नाही, तसेच त्यांनीही प्रशासनाला याबाबत कळवलेले नाही. त्यामुळे महापालिकेने या तिघांचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे.

२०१६ मध्ये राज्य सरकारकडून तोरसकर महापालिकेत आले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त पदाचा पदभार त्यांच्याकडे होता. महापालिकेत आल्यापासून त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे काम योग्य प्रकारे केले नाही, अशी टीका नगरसेवकांनी वारंवार केली. २०१८ मध्ये त्यांची गडचिरोली येथे बदली झाली होती. मात्र, तेथील पदभार घेण्याऐवजी त्यांनी महापालिकेत राहणे पसंत केले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी निरीक्षक म्हणून भूमिका बजावली. मात्र, तेव्हापासून ते महापालिकेत आलेले नाहीत. ते रजेवरही गेलेले नाहीत. मग ते गेले कुठे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. आपण कुठे जात आहोत, याबाबतही त्यांनी आयुक्त तसेच महापालिका प्रशासनाला काहीच कळवलेले नाही. ते प्रतिनियुक्तीवरील अधिकारी असल्याने त्यांच्या विरोधात कारवाईचा अधिकार महापालिका आयुक्तांना नाही. त्यामुळे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मारुती खोडके यांनी सरकारला तसा अहवाल पाठविला आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने तोरसकर यांच्याकडील पदभार अमित पंडित यांच्याकडे दिला आहे.महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त पगार हे देखील एप्रिलपासून महापालिकेत आलेले नाहीत. मुलगा आजारी असल्याने आपण गैरहजर राहत असल्याचे त्यांनी सुरुवातीला कळवले होते. मात्र, त्यानंतर ते कामावर आलेले नाहीत. त्यांची कुठे बदली झाली का, त्यांनी तेथे पदभार घेतला का, याबाबत काहीच माहिती महापालिका प्रशासनाला त्यांनी कळविलेलीनाही.

जुलै २०१८ पासून महापालिका आयुक्त कार्यालय आणि शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त नार्वेकर हेही गायब आहेत. रजेचे कारण देत ते वर्षभरापासून कामावर आलेच नाहीत. त्यांनी देखील पुढे काय झाले, याची माहिती महापालिकेस कळविलेली नाही. राज्य सरकारला त्यांच्याबाबतही माहिती देण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून कारवाई अपेक्षिततोरसकर, पगार व नार्वेकर हे तिन्ही अधिकारी प्रतिनियुक्तीवरील असल्याने त्यांच्याविरोधातील कारवाई राज्य सरकारकडून होणे अपेक्षित आहे. प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना शहरांच्या समस्यांविषयी काही देणे घेणे नसते. त्यामुळे ते योग्य प्रकारे काम करत नाहीत. कामाचे अपयश लपविण्यासाठी ते काढता पाय घेतात, अशी टीका नगरसेवकांकडून नेहमीच होते.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका