शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

तीन वाहनचालकांना २० वर्षांनंतर पुन्हा कामावर घेण्यास दिला नकार; पालिकेचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 23:31 IST

हायकाेर्टाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात

- नितीन पंडितभिवंडी : सुरेश शांताराम दिवेकर, विनोद पांडुरंग पाटील व जितेंद्र विठ्ठल काबाडी या भिवंडी महापालिकेतील तीन कामगारांनी अगोदर औद्योगिक न्यायालय व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय असा तब्बल २० वर्षे संघर्ष केल्यानंतर, त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय होऊनही महापालिका प्रशासन त्या आदेशांची अंमलबजावणी करीत नाही. प्रशासनाच्या आडमुठ्या कारभारामुळे या कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबतचा अर्ज त्यांनी दिला आहे. मात्र, त्यावर प्रशासनाने कुठलाच निर्णय घेतला नसल्याचे या कामगारांनी सांगितले. दिवेकर, पाटील, काबाडी हे तिघे भिवंडी नगरपालिकेत वाहनचालक पदावर काम करीत होते. २००१ साली नगरपरिषदचे महापालिकेत रूपांतर झाले. त्यानंतर, २० ते २५ कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले होते. यापैकी काही कामगारांनी औद्योगिक न्यायालय धाव घेऊन महापालिका प्रशासनाविरोधात दावा दाखल केला. औद्योगिक न्यायालयाने या कामगारांच्या बाजूने निर्णय देऊन त्यांना कामावर घेण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. महापालिकेने काही वाहनचालकांना कामावर रुजू करून घेतले. मात्र, दिवेकर, पाटील, काबाडी या तीन वाहनचालकांच्या विरोधात महापालिका प्रशासन मुंबई उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयानेही या तिन्ही कामगारांच्या बाजूने निकाल देत, त्यांना कामावर रुजू करण्याचे आदेश वर्षभरापूर्वी दिले. मात्र, प्रशासन न्यायालयाच्या आदेशाचे अद्याप पालन करीत नाही, अशी या तिघांची तक्रार आहे.भिवंडी महापालिकेच्या स्थायी समितीने १५ जून, २०१० रोजी ठराव पारित करून, या तिघांना कामावर रुजू करून घेण्याचे पालिका आयुक्तांना निर्देश दिले. मात्र, स्थायी समितीच्या ठरवालाही प्रशासनाने केराची टोपली दाखविली. भिवंडीचे आमदार महेश चौघुले यांनीही उच्च न्यायालय व स्थायी समितीने मंजूर केलेल्या अहवालानुसार, या कामगारांना कामावर रुजू करण्याबाबत पत्राद्वारे पालिका आयुक्तांना कळविले. मात्र, आमदारांच्या पत्राचीही पालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. यामुळे महापालिकेच्या कामकाजाबाबत आमदारांनी नाराजी व्यक्त करीत, नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. पालिकेचे विधी अधिकारी अनिल प्रधान म्हणाले की, तीन कामगारांना कामावर घेण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात पालिका प्रशासन सर्वोच्च न्ययालयात गेले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा प्रश्नच येत नाही. महापालिकेच्या या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांवर अन्यायाची भावना आहे.भिवंडी महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असतानाही, तीन वाहनचालकांविरोधात कायदेशीर लढाई लढण्याकरिता प्रशासन वर्षानुवर्षे वकिलांची महागडी फी देण्याचा पर्याय स्वीकारते, याबाबत कामगार व लोकप्रतिनिधींनी आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, या संदर्भात महापालिका आयुक्तांशी मोबाइलवर संपर्क केला असता, त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.