शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

तीन दिवसांनंतर जूगावातील ५८ ग्रामस्थ परतले स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:19 IST

उद्ध्वस्त संसार पाहून डोळ्यांत पाणी, तहसीलदारांकडून पाहणी

टिटवाळा : मुसळधार पावसामुळे खडवली येथील भातसा नदीला पूर येऊ न रविवारी जूगावातील ५८ ग्रामस्थ अडकले होते. गावाला अक्षरश: पाण्याचा वेढा पडल्यामुळे हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. वर्षभराचे साठवलेले धान्य, दुभत्या म्हशी, शेळ्या आणि भातशेती पाण्यात वाहून गेल्याचे पाहून मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. पुरातून जीव वाचला, पण बुडालेला संसार पुन्हा कसा उभा करायचा, याची चिंता त्यांच्या चेहऱ्यांवर उमटली होती. मंगळवारी सायंकाळी तीन दिवसांनंतर हे ग्रामस्थ स्वगृही परतले आहे. या गावात कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे पाहणी करत आहेत.कल्याण तालुक्यातील शहरी भागांसह ग्रामीण भागाला पुराचा मोठा फटका बसला. शेकडो घरे पुराच्या पाण्यात होती. खडवली येथे तर बिकट परिस्थिती निर्माण होऊ न जूगावात २० महिला, २५ पुरु ष आणि १३ लहान मुले असे ५८ लोक अडकले होते. त्यांची एनडीआरएफ आणि वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली. सुटका केलेल्या या ग्रामस्थांची बाळकुम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने संजय भोईर यांनी केली. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. पूर ओसरल्यानंतर तीन दिवसांनी हे ग्रामस्थ खडवली येथील जूगावात शासकीय वाहनाने परतले आहेत.पुरात कैलास पालवी, रवींद्र सवार, विष्णू पालवी, रमेश जाधव, गणेश जाधव, शांताराम जाधव, संतोष गाडगे, राजू सवार, अनंता मुकणे, सुवर्णा पालवी, हाली जाधव, गुली सवार, फसी मुकणे आदी ५८ ग्रामस्थ अडकले होते. बुधवारी तहसीलदार आकडे यांनी पथकासह गावात पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे केले. तसेच लोकांशी चर्चा करून त्यांची व्यथा जाणून घेतल्या. पुरामध्ये वर्षभराचे साठवून ठेवलेले धान्य, ४० शेळ्या, भातशेती तसेच १० दुभत्या म्हशी वाहून गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.आजही तो दिवस आठवला की, अंगाला काटा उभा राहतो. तो अत्यंत कठीण काळ होता. काही तास अक्षरश: मृत्यू आमच्यासमोर उभा होता. शासकीय मदत वेळेत पोहोचली म्हणूनच आमचा जीव वाचला. मात्र, आमची जनावरे, शेती वाहून गेल्याने आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत.- कैलास पालवीआमच्या गावाला चारही बाजूंनी पुराने वेढले होते. यातून आम्ही वाचू, याची आशाच सोडली होती. आमचे नशीब मोठे म्हणूनच मदत वेळेत मिळाली. - रवींद्र सवारपुरातून बाहेर काढून आम्हाला सुरक्षितस्थळी हलवले; पण आमचे लक्ष घराकडे लागले होते. आपल्या जनावरांचे, शेती आणि घरांचे काय झाले असेल, ही चिंता सतत मन पोखरत होती. मंगळवारी सायंकाळी घरी आम्ही परतलो, तेव्हा पुरात आमच्या आयुष्यभराची कमाई वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. - विष्णू पालवी