शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

तीन दिवसांनंतर जूगावातील ५८ ग्रामस्थ परतले स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:19 IST

उद्ध्वस्त संसार पाहून डोळ्यांत पाणी, तहसीलदारांकडून पाहणी

टिटवाळा : मुसळधार पावसामुळे खडवली येथील भातसा नदीला पूर येऊ न रविवारी जूगावातील ५८ ग्रामस्थ अडकले होते. गावाला अक्षरश: पाण्याचा वेढा पडल्यामुळे हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. वर्षभराचे साठवलेले धान्य, दुभत्या म्हशी, शेळ्या आणि भातशेती पाण्यात वाहून गेल्याचे पाहून मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. पुरातून जीव वाचला, पण बुडालेला संसार पुन्हा कसा उभा करायचा, याची चिंता त्यांच्या चेहऱ्यांवर उमटली होती. मंगळवारी सायंकाळी तीन दिवसांनंतर हे ग्रामस्थ स्वगृही परतले आहे. या गावात कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे पाहणी करत आहेत.कल्याण तालुक्यातील शहरी भागांसह ग्रामीण भागाला पुराचा मोठा फटका बसला. शेकडो घरे पुराच्या पाण्यात होती. खडवली येथे तर बिकट परिस्थिती निर्माण होऊ न जूगावात २० महिला, २५ पुरु ष आणि १३ लहान मुले असे ५८ लोक अडकले होते. त्यांची एनडीआरएफ आणि वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली. सुटका केलेल्या या ग्रामस्थांची बाळकुम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने संजय भोईर यांनी केली. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. पूर ओसरल्यानंतर तीन दिवसांनी हे ग्रामस्थ खडवली येथील जूगावात शासकीय वाहनाने परतले आहेत.पुरात कैलास पालवी, रवींद्र सवार, विष्णू पालवी, रमेश जाधव, गणेश जाधव, शांताराम जाधव, संतोष गाडगे, राजू सवार, अनंता मुकणे, सुवर्णा पालवी, हाली जाधव, गुली सवार, फसी मुकणे आदी ५८ ग्रामस्थ अडकले होते. बुधवारी तहसीलदार आकडे यांनी पथकासह गावात पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे केले. तसेच लोकांशी चर्चा करून त्यांची व्यथा जाणून घेतल्या. पुरामध्ये वर्षभराचे साठवून ठेवलेले धान्य, ४० शेळ्या, भातशेती तसेच १० दुभत्या म्हशी वाहून गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.आजही तो दिवस आठवला की, अंगाला काटा उभा राहतो. तो अत्यंत कठीण काळ होता. काही तास अक्षरश: मृत्यू आमच्यासमोर उभा होता. शासकीय मदत वेळेत पोहोचली म्हणूनच आमचा जीव वाचला. मात्र, आमची जनावरे, शेती वाहून गेल्याने आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत.- कैलास पालवीआमच्या गावाला चारही बाजूंनी पुराने वेढले होते. यातून आम्ही वाचू, याची आशाच सोडली होती. आमचे नशीब मोठे म्हणूनच मदत वेळेत मिळाली. - रवींद्र सवारपुरातून बाहेर काढून आम्हाला सुरक्षितस्थळी हलवले; पण आमचे लक्ष घराकडे लागले होते. आपल्या जनावरांचे, शेती आणि घरांचे काय झाले असेल, ही चिंता सतत मन पोखरत होती. मंगळवारी सायंकाळी घरी आम्ही परतलो, तेव्हा पुरात आमच्या आयुष्यभराची कमाई वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. - विष्णू पालवी