शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ठाण्यात रंगणार तीन दिवसीय कलात्मक नाट्य महोत्सव, संपूर्ण महोत्सव जन सहयोगाने राहणार उभा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 16:01 IST

२७ , २८, २९ मार्च रोजी प्रेक्षक सहयोगाने एक कलात्मक नाट्य महोत्सव ठाण्यात संपन्न होणार आहे.

ठळक मुद्देठाण्यात रंगणार तीन दिवसीय कलात्मक नाट्य महोत्सव २७ , २८, २९ मार्च रोजी प्रेक्षक सहयोगाने कलात्मक नाट्य महोत्सवप्रेक्षक आणि कलाकारांचा  रंगमंचावर होणार परिसंवाद

ठाणे : कला ही माणसाला समृद्ध करत असते. मानवी संवेदना जागवून माणसाला माणूस बनवण्याची ताकद ही कलेतच आहे हा विश्वास असल्याने २७ मार्च या जागतिक रंगमंच दिवशी "थिएटर ऑफ रेलेवन्स" या तत्वज्ञानाचे 'अभ्यासक कलाकार' 'कलात्मक नाट्य महोत्सव' घेऊन येत आहेत. या नाट्य महोत्सवाचे वैशिष्ठय म्हणजे हा संपूर्ण महोत्सव जन सहयोगाने उभा राहणार आहे. कलाकाराची ताकद म्हणजे त्याचे हक्काचे प्रेक्षक, हे प्रेक्षक उभे राहणार, पाठींबा देणार आणि २७ , २८, २९ मार्च रोजी प्रेक्षक सहयोगाने एक कलात्मक नाट्य महोत्सव संपन्न होणार आहे. 

     'कला उद्योजकतेच्या' जोरावर यापूर्वी तीन नाट्य महोत्सव दिल्ली, मुंबई आणि पनवेल येथे सादर झाले आहेत आणि आता हा चौथा नाट्य महोत्सव २७, २८, २९ मार्च रोजी तिन्ही दिवस सकाळी ११. ३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे होणार आहे. 

या तीनही नाटकांचे लेखन-दिग्दर्शन 'रंगचिंतक मंजुल भारद्वाज' यांनी केले असून या कलात्मक चळवळीला आपल्या कलेने मंचावर साकार करणारे कलाकार आहेत, अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के आणि बबली रावत. नाटका नंतर लगेचच रंगमंचावर प्रेक्षक आणि कलाकारांचा  परिसंवाद देखील होणार आहे. २७ मार्च हा "विश्व रंगमंच दिवस" म्हणून ओळखला जातो. विश्व आणि रंगमंच यांचं एक अनोखं नातं आहे. विश्व हेच रंगमंच आणि रंगमंच हेच विश्व असं म्हंटलं जातं. आज संपूर्ण विश्वासमोर अनेक आव्हाने आ वासून उभी आहेत आणि त्यातील सर्वात मोठं आव्हान आहे "माणुसकी वाचवणे" म्हणूनच, माणूस बनण्याची संवेदना जागवणारे नाटक "गर्भ" हे या कलात्मक महोत्सवात सादर होणारे पहिले नाटक आहे. विश्वाला माणुसकीचे भान देणारी कला आणि कलाकारच असतात आणि 'अनहद नाद' याच कलेला आणि कलाकारांना बाजारीकरणातून उन्मुक्तता देणारं रंगचिंतन आहे. भांडवलवादी व्यवस्था, खरेदी-विक्री या तत्वावर वर्षानुवर्षांपासून जे करत आली आहे, त्याविरोधात आवाज उठवणारे हे नाटक "अनहद नाद - अनहर्ड साउंड्स ऑफ युनिव्हर्स" तसेच सततचा संघर्ष आहे, न्यायसंगत समाजरचनेचा निर्माण करणे, अर्ध्या लोकसंख्येचा संदर्भ म्हणजे नाटक, "न्याय के भंवर में भंवरी". कोणताही कार्यक्रम करायचा वा नाटक उभे करायचे तर भांडवल लागतं, पैसा अनिवार्य आहे पण हा कलात्मक नाट्य महोत्सव कोणत्याही निर्मात्याची, मध्यस्थाची मदत न घेता स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे, “कला उद्योजकता” या संकल्पनेच्या जोरावर या प्रक्रियेत महोत्सवातील कलाकार स्वतः प्रेक्षकांना जाऊन भेटतात, त्यांना नाटकाची संकल्पना समजावून देतात, या प्रक्रियेने मुख्य म्हणजे कलाकार आणि प्रेक्षक यांत 'संवाद' होतो. जो संवाद आजच्या काळात अत्यन्त महत्वाची भूमिका बजावतो. आज जिथे एकमेकांकडे बघून स्मित हास्य करायला ही वेळ नाही तिथे थिएटर ऑफ रेलेवन्स चे कलाकार प्रेक्षकांना भेटून संवाद करत आहेत आणि भेट घेतली की, ही संवाद प्रक्रिया वाढीस लागते, संवादाने विचार प्रक्रिया भक्कम व्हायला लागते आणि संकल्पना आवडली तर प्रेक्षक स्वतः कलाकारांकडून सहयोग पत्र (तिकीट) घेतात आणि नाटकाची सहयोग राशी जमा करतात असे योगिनी चौक यांनी सांगितले. या नाटकाला कोणताही निर्माता किंवा स्पॉन्सरर्स नाही तसेच कोणतेही सरकारी वा नीमसरकारी अनुदानाची मदत हे नाटक घेत नाही. स्वावलंबन हे पूर्णत्वे आहे.आज जिथे एका पाकिटासाठी कलाकाराला थांबून राहावे लागते किंवा वाट पाहावी लागते तिथे 'प्रेक्षक सहयोग' हाच खरा सहयोग आहे, जो कलाकाराला खऱ्या अर्थाने भक्कम करतो. त्याच प्रमाणे माणुसकी या संकल्पनेची सुरवात ही संवादापासूनच होते. म्हणूनच जसे प्रेक्षक आणि कलाकार भेटून संवाद साधतात तशी "कला उद्योजकता" ही संकल्पना वाढीस लागते आहे. या कलात्मक संवादांना 'प्रोफेशनलिझम' म्हणतात असे रंगचिंतक मंजुल भारद्वाज म्हणाले.  

 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई