शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील रंगायतनची खिडकी पडल्याने तीन कलाकार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:59 IST

रंगायतनच्या स्ट्रक्चरल आॅडीटची मागणी

ठळक मुद्देसन १९८८ साली कोट्यावधी रूपये खर्च करून १३०० आसनांचे अद्यावत नाट्यगृहशाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात येणाºया मान्यवरांच्या स्वागतासाठी कल्याणचे बॅण्ड पथक उभे होतेस्व.मीनाताई ठाकरे रंगायतनचे स्ट्रक्चरल आॅडीट करून ते दुरूस्त करावे,अशी नाट्यरसिकांची मागणी

भिवंडी : शहरातील एकमेव सांस्कृतीक केंद्र म्हणून प्रसिध्द असलेल्या स्व.मीनाताई ठाकरे रंगायतनच्या इमारतीची खिडकी खाली पडल्याने तीन कलाकार जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली आहे.मात्र या घटनेची तक्रार संबधितांनी न केल्याने पालिकेच्या अधिकाºयांनी देखील ही घटना गंभीरतेने घेतली नाही. त्यामुळे शहरातील संतप्त नाट्यरसिकांकडून या रंगायतनचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.शहरातील स्वामी विवेकानंद शाळेचे शनिवारी सायंकाळी वार्षिक स्नेह संमेलन होते. या संमेलनात येणाºया मान्यवरांच्या स्वागतासाठी कल्याणचे बॅण्ड पथक तेथे उभे केले होते.त्याचवेळी नाट्यगृहाच्या दुसºया मजल्यावरील मोडकळीस आलेली खिडकी अचानकपणे लोखंडी ग्रिलसहीत खाली बॅण्ड पथकातील तीन कलाकारांच्या अंगावर पडली. त्यामुळे बॅण्ड पथकातील विलास चौव्हान(२४), वृश्चिक धुमाळ (२४) व हर्ष (२९)हे तीघेजण जखमी झाले.त्यांना पाठीवर मुका मार लागला असुन खिडकीच्या तुटलेल्या काचा त्यांच्या शरिरात घुसल्या.त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याला टाके घालावे लागल्याची माहिती आॅर्बीट हॉस्पिटलचे डॉ. जयेश शेळके यांनी दिली. त्यांना ताबडतोब उपचार करून घरी पाठवून दिल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.शहरातील नागरिकांना मराठी नाटके व इतर मनोरंजनाचे कार्यक्र म पाहण्यासाठी ठाणे, मुंबई येथील नाट्यगृहात जावे लागत असल्याने शहरातील नाट्यप्रेमींनी शहरात नाट्यगृह बांधावे,अशी मागणी पालिकेकडे केली होती. त्यानुसार पालिकेने सन १९८८ साली कोट्यावधी रूपये खर्च करून १३०० आसनांचे अद्यावत नाट्यगृह बांधले आहे.परंतू पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठाकरे रंगायतनची दुर्दशा झाली आहे.अशा स्थितीत शालेय विद्यार्थ्यांचे वार्षिक संमेलन आणि काही आंबट शौकीनांसाठी होत असलेल्या नृत्यांच्या कार्यक्रमावर हे रंगायतन तग धरून आहे. रंगायतनचे पावित्र्य राखण्यासाठी व त्यामधील सोयीसवलती करण्याकडे शिवसैनिकांनी गेली २५ वर्षे धृतराष्ट्राची भूमीका घेतल्याने रंगायतनच्या इमारतीची देखील दैना झाली आहे.आंतील रंगमंच ढासळलेल्या स्थितीत आहे. मंचावरील पडदे(कल्टन)फाटलेले आहेत.खुर्च्या मोडलेल्या आहेत.ठेकेदाराने लाखो रूपये घेऊन पुरविलेला माईक-स्पिकर वर्षभरांत निकाली निघाला आहे.तर नाट्यगृहाच्या खिडक्या व तावदाने तुटलेल्या अवस्थेत आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी नाट्यगृहासाठी ३५ लाख रूपये बांधकाम विभागाकडून तर २० लाख रूपयांची तरतुद विद्युत विभागाकडून केली जाते. मात्र हा खर्च कागदावर केला जातो,असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या नाट्यगृहाची अवस्था भकास व भयाण झाली आहे. त्यामुळे शहर व परिसरांतील नाट्यरसिकांमध्ये नाराजी पसरली असुन पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन नाट्यरसिकांसाठी स्व.मीनाताई ठाकरे रंगायतनचे स्ट्रक्चरल आॅडीट करून ते दुरूस्त करावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीAccidentअपघात