शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

भिवंडीतील रंगायतनची खिडकी पडल्याने तीन कलाकार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:59 IST

रंगायतनच्या स्ट्रक्चरल आॅडीटची मागणी

ठळक मुद्देसन १९८८ साली कोट्यावधी रूपये खर्च करून १३०० आसनांचे अद्यावत नाट्यगृहशाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात येणाºया मान्यवरांच्या स्वागतासाठी कल्याणचे बॅण्ड पथक उभे होतेस्व.मीनाताई ठाकरे रंगायतनचे स्ट्रक्चरल आॅडीट करून ते दुरूस्त करावे,अशी नाट्यरसिकांची मागणी

भिवंडी : शहरातील एकमेव सांस्कृतीक केंद्र म्हणून प्रसिध्द असलेल्या स्व.मीनाताई ठाकरे रंगायतनच्या इमारतीची खिडकी खाली पडल्याने तीन कलाकार जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली आहे.मात्र या घटनेची तक्रार संबधितांनी न केल्याने पालिकेच्या अधिकाºयांनी देखील ही घटना गंभीरतेने घेतली नाही. त्यामुळे शहरातील संतप्त नाट्यरसिकांकडून या रंगायतनचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.शहरातील स्वामी विवेकानंद शाळेचे शनिवारी सायंकाळी वार्षिक स्नेह संमेलन होते. या संमेलनात येणाºया मान्यवरांच्या स्वागतासाठी कल्याणचे बॅण्ड पथक तेथे उभे केले होते.त्याचवेळी नाट्यगृहाच्या दुसºया मजल्यावरील मोडकळीस आलेली खिडकी अचानकपणे लोखंडी ग्रिलसहीत खाली बॅण्ड पथकातील तीन कलाकारांच्या अंगावर पडली. त्यामुळे बॅण्ड पथकातील विलास चौव्हान(२४), वृश्चिक धुमाळ (२४) व हर्ष (२९)हे तीघेजण जखमी झाले.त्यांना पाठीवर मुका मार लागला असुन खिडकीच्या तुटलेल्या काचा त्यांच्या शरिरात घुसल्या.त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याला टाके घालावे लागल्याची माहिती आॅर्बीट हॉस्पिटलचे डॉ. जयेश शेळके यांनी दिली. त्यांना ताबडतोब उपचार करून घरी पाठवून दिल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.शहरातील नागरिकांना मराठी नाटके व इतर मनोरंजनाचे कार्यक्र म पाहण्यासाठी ठाणे, मुंबई येथील नाट्यगृहात जावे लागत असल्याने शहरातील नाट्यप्रेमींनी शहरात नाट्यगृह बांधावे,अशी मागणी पालिकेकडे केली होती. त्यानुसार पालिकेने सन १९८८ साली कोट्यावधी रूपये खर्च करून १३०० आसनांचे अद्यावत नाट्यगृह बांधले आहे.परंतू पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठाकरे रंगायतनची दुर्दशा झाली आहे.अशा स्थितीत शालेय विद्यार्थ्यांचे वार्षिक संमेलन आणि काही आंबट शौकीनांसाठी होत असलेल्या नृत्यांच्या कार्यक्रमावर हे रंगायतन तग धरून आहे. रंगायतनचे पावित्र्य राखण्यासाठी व त्यामधील सोयीसवलती करण्याकडे शिवसैनिकांनी गेली २५ वर्षे धृतराष्ट्राची भूमीका घेतल्याने रंगायतनच्या इमारतीची देखील दैना झाली आहे.आंतील रंगमंच ढासळलेल्या स्थितीत आहे. मंचावरील पडदे(कल्टन)फाटलेले आहेत.खुर्च्या मोडलेल्या आहेत.ठेकेदाराने लाखो रूपये घेऊन पुरविलेला माईक-स्पिकर वर्षभरांत निकाली निघाला आहे.तर नाट्यगृहाच्या खिडक्या व तावदाने तुटलेल्या अवस्थेत आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी नाट्यगृहासाठी ३५ लाख रूपये बांधकाम विभागाकडून तर २० लाख रूपयांची तरतुद विद्युत विभागाकडून केली जाते. मात्र हा खर्च कागदावर केला जातो,असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या नाट्यगृहाची अवस्था भकास व भयाण झाली आहे. त्यामुळे शहर व परिसरांतील नाट्यरसिकांमध्ये नाराजी पसरली असुन पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन नाट्यरसिकांसाठी स्व.मीनाताई ठाकरे रंगायतनचे स्ट्रक्चरल आॅडीट करून ते दुरूस्त करावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीAccidentअपघात