शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

भिवंडीतील रंगायतनची खिडकी पडल्याने तीन कलाकार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:59 IST

रंगायतनच्या स्ट्रक्चरल आॅडीटची मागणी

ठळक मुद्देसन १९८८ साली कोट्यावधी रूपये खर्च करून १३०० आसनांचे अद्यावत नाट्यगृहशाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात येणाºया मान्यवरांच्या स्वागतासाठी कल्याणचे बॅण्ड पथक उभे होतेस्व.मीनाताई ठाकरे रंगायतनचे स्ट्रक्चरल आॅडीट करून ते दुरूस्त करावे,अशी नाट्यरसिकांची मागणी

भिवंडी : शहरातील एकमेव सांस्कृतीक केंद्र म्हणून प्रसिध्द असलेल्या स्व.मीनाताई ठाकरे रंगायतनच्या इमारतीची खिडकी खाली पडल्याने तीन कलाकार जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली आहे.मात्र या घटनेची तक्रार संबधितांनी न केल्याने पालिकेच्या अधिकाºयांनी देखील ही घटना गंभीरतेने घेतली नाही. त्यामुळे शहरातील संतप्त नाट्यरसिकांकडून या रंगायतनचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.शहरातील स्वामी विवेकानंद शाळेचे शनिवारी सायंकाळी वार्षिक स्नेह संमेलन होते. या संमेलनात येणाºया मान्यवरांच्या स्वागतासाठी कल्याणचे बॅण्ड पथक तेथे उभे केले होते.त्याचवेळी नाट्यगृहाच्या दुसºया मजल्यावरील मोडकळीस आलेली खिडकी अचानकपणे लोखंडी ग्रिलसहीत खाली बॅण्ड पथकातील तीन कलाकारांच्या अंगावर पडली. त्यामुळे बॅण्ड पथकातील विलास चौव्हान(२४), वृश्चिक धुमाळ (२४) व हर्ष (२९)हे तीघेजण जखमी झाले.त्यांना पाठीवर मुका मार लागला असुन खिडकीच्या तुटलेल्या काचा त्यांच्या शरिरात घुसल्या.त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याला टाके घालावे लागल्याची माहिती आॅर्बीट हॉस्पिटलचे डॉ. जयेश शेळके यांनी दिली. त्यांना ताबडतोब उपचार करून घरी पाठवून दिल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.शहरातील नागरिकांना मराठी नाटके व इतर मनोरंजनाचे कार्यक्र म पाहण्यासाठी ठाणे, मुंबई येथील नाट्यगृहात जावे लागत असल्याने शहरातील नाट्यप्रेमींनी शहरात नाट्यगृह बांधावे,अशी मागणी पालिकेकडे केली होती. त्यानुसार पालिकेने सन १९८८ साली कोट्यावधी रूपये खर्च करून १३०० आसनांचे अद्यावत नाट्यगृह बांधले आहे.परंतू पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठाकरे रंगायतनची दुर्दशा झाली आहे.अशा स्थितीत शालेय विद्यार्थ्यांचे वार्षिक संमेलन आणि काही आंबट शौकीनांसाठी होत असलेल्या नृत्यांच्या कार्यक्रमावर हे रंगायतन तग धरून आहे. रंगायतनचे पावित्र्य राखण्यासाठी व त्यामधील सोयीसवलती करण्याकडे शिवसैनिकांनी गेली २५ वर्षे धृतराष्ट्राची भूमीका घेतल्याने रंगायतनच्या इमारतीची देखील दैना झाली आहे.आंतील रंगमंच ढासळलेल्या स्थितीत आहे. मंचावरील पडदे(कल्टन)फाटलेले आहेत.खुर्च्या मोडलेल्या आहेत.ठेकेदाराने लाखो रूपये घेऊन पुरविलेला माईक-स्पिकर वर्षभरांत निकाली निघाला आहे.तर नाट्यगृहाच्या खिडक्या व तावदाने तुटलेल्या अवस्थेत आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी नाट्यगृहासाठी ३५ लाख रूपये बांधकाम विभागाकडून तर २० लाख रूपयांची तरतुद विद्युत विभागाकडून केली जाते. मात्र हा खर्च कागदावर केला जातो,असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या नाट्यगृहाची अवस्था भकास व भयाण झाली आहे. त्यामुळे शहर व परिसरांतील नाट्यरसिकांमध्ये नाराजी पसरली असुन पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन नाट्यरसिकांसाठी स्व.मीनाताई ठाकरे रंगायतनचे स्ट्रक्चरल आॅडीट करून ते दुरूस्त करावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीAccidentअपघात