शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

धमक्यांचे सत्र : कारवाई करणारी पथके फेरीवाल्यांच्या दहशतीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:49 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे फेरीवाल्यांकडून उल्लंघन होत असताना दुसरीकडे केडीएमसीची फेरीवाला पथके मुजोर फेरीवाल्यांच्या दहशतीखाली वावरत असल्याचे चित्र आहे

कल्याण : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे फेरीवाल्यांकडून उल्लंघन होत असताना दुसरीकडे केडीएमसीची फेरीवाला पथके मुजोर फेरीवाल्यांच्या दहशतीखाली वावरत असल्याचे चित्र आहे. कारवाईचा दावा जरी या पथकांकडून केला जात असला तरी कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाºयांवर विनयभंगासारखे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या फेरीवाल्यांकडून दिल्या जात असल्याचे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे.प्रसंगी हप्तेखोरीचा आळ घालू, असेही सुनावले जात असल्याने फेरीवाला हटविण्याची कारवाई करायची तरी कशी? असा सवाल कर्मचारी करत आहेत. याबाबत ते पालिका अधिकाºयांशी चर्चा करणार आहेत. मात्र या आरोपांबाबत फेरीवाल्यांच्या नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात पांढरे पट्टे मारून रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. महापालिकेने लक्ष्मण रेषा आखली असली तरी ती ओलांडून बिनदिक्कत फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरू असल्याचे कल्याण-डोंबिवलीत पहावयास मिळते. फेरीवाल्यांचा हा व्यवसाय फेरीवालाविरोधी पथकांच्या समोरच थाटला जात असल्याने पथकांचा त्याला आशीर्वाद लाभल्याचे स्पष्ट होते. त्याचवेळी फेरीवाल्यांकडून पथकातील कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या सर्रास दिल्या जात आहेत.कर्मचारी कारवाईसाठी गेला, तर विनयभंग आणि हप्तेखोरीच्या प्रकरणात अडकवू अशा प्रकारची दहशत फेरीवाल्यांकडून पसरवली जात आहे. हप्तेखोरीच्या नादात फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही, असे जरी बोलले जात असले तरी फेरीवाल्यांच्या अशाप्रकारे दहशत पसरविण्याच्या प्रकारात एखाद्या प्रामाणिक कर्मचाºयाचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयाच्या आदेशामुळे सध्या राजकीय दबाव येत नाही. परंतु फेरीवाल्यांच्या या धमक्या पाहता कारवाईवर काही प्रमाणात मर्यादा पडत आहेत.कारवाईच्या वेळी पोलीस बंदोबस्त पुरेसा मिळत नाही. पूर्वी फेरीवाला पथकामध्ये १५ कर्मचारी असायचे, सध्या हा आकडा ८ ते १० च्या आसपास आला आहे. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा वाढता विळखा पाहता ठिकठिकाणी होणाºया अतिक्रमणांना थोपवायचे तरी कसे असा यक्षप्रश्न पथकांना पडला आहे. आमच्या रोजीरोटीवर आलात तर तुमचीही नोकरीही कशी शाबूत राहते हे पाहू, अशा शब्दातही कर्मचाºयांना धमकावले जात आहे.महापालिकेच्या कारवाईमुळे स्थानिक फेरीवाल्याच्या रोजगारावर टाच आल्याचा आरोप होत असला तरी याठिकाणी भायखळा, कुर्ला, चेंबुर. मुंब्रा या ठिकाणाहून येणाºया फेरीवाल्यांच्या दहशतीचे नमुने सातत्याने पाहावयास मिळत आहेत. 

टॅग्स :hawkersफेरीवाले