शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
3
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
4
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
5
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
6
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
7
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
8
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
9
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
10
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
11
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
12
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
13
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
14
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
15
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
16
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
17
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
18
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
19
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
20
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र

‘त्या’ १४ गावांत पाणीटंचाई; केमिकल मिश्रित पाण्याकडे जि.प.चे दुर्लक्ष :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:16 IST

नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळलेली १४ गांवे ठाणे जिल्हा परिषदेत (जि.प.) समाविष्ट केलीे. मात्र, त्यांना सध्या अत्यावश्यक सोयीसुविधांसह तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळलेली १४ गांवे ठाणे जिल्हा परिषदेत (जि.प.) समाविष्ट केलीे. मात्र, त्यांना सध्या अत्यावश्यक सोयीसुविधांसह तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बोअरिंगमध्ये केमिकल झिरपल्यामुळे गावकऱ्यांवर केमिकल मिश्रित पाणी पिण्याचा प्रसंग ओढावला. पाण्याच्या नावाखाली साडेसहा कोटींची उधळपट्टी करणाºया जिल्हा परिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याच्या वृत्तास जि.प. सदस्य रमेश पाटील यांनी दुजोरा दिला.केमिकल कंपन्यांमधील भंगार, ड्रम हे कुर्ला, कल्याण आणि उल्हासनगर येथील भंगारवाले विकत घेतात. त्यातील केमिकल ते परिसरातच ओतत आहेत. मोठ्याप्रमाणात टाकण्यात येत असलेले केमिकल बोअरिंगमध्ये झिरपले आहे. यामुळे तिचे पाणी केमिकल मिश्रित झाले. या विषारी पाण्याचा सामना करणाºया १४ गावातील नारिकांना तीव्र पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील या गावांना महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाव्दारे(एमजेपी) पाणीपुरवठा होतो. एमजेपीच्या या प्रशासनाकडून खासदार -आमदारांची शाबासकी मिळवण्यासाठी तात्पुरते एमआयडीसीच्या पाण्याचे पाणी सोडले जाते. एमआयडीसीचा व्हॉल्व खोलून सुरळीत पाणीपुरवठा असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एका कार्यक्रमाव्दारे भासवल्याच्या वृत्तासही पाटील यांनी दुजोरा दिला. एमजेपीच्या नियंत्रणात साडेसहा कोटी रूपये जिल्हा परिषदेने खर्च केल्याचे दिसून येत आहे. त्याव्दारे अर्धवट बांधलेल्या पाण्याच्या टाक्या आणि तुटलेली पाइपलाइन दिसत आहे. सुमारे २०१४ मध्ये मंजूर झालेल्या या साडेसहा कोटींच्या कामातून तांब्याभर पाणीदेखील १४ गावांना आजपर्यंत मिळालेले नाही. २७ महिन्यात काम पूर्ण करायचे होते. मात्र, ते आजपर्यंतही पूर्ण झाले नाही. संबंधीत ठेकेदार कंपनीला जिल्हा परिषद व एमजेपी पाठिशी घालून गावकºयांना पाणीटंचाईच्या झळा सोसायला भाग पाडत आहे.साडेसहा कोटी खर्चाचे काम दाखवण्यासाठी नवी मुंबईच्या जुन्या पाइपलाइनला व्हॉल्व लावून ती गृहीत धरण्याचा पराक्रमही प्रशासनाने केला. जुन्या लाइनमुळे ती सतत फूटत आहे. प्रेशरने पाणी सोडता येत नाही. यामुळे १४ गावातील नागरिकांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या निदर्शनात आणून दिली. पण त्यावर काहीच केले जात नसल्याची खंत त्यांनी लोकमतकडे व्यक्त केली.लोकप्रतिनिधींबद्दल ग्रामस्थांमध्ये संतापसुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुन्हा साडेबारा कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याचे सांगितले जात आहे. पण आधीच्या साडेसहा कोटींच्या खर्चाचे मात्र कोणी ऐकूणच घ्यायला मागत नाही. या परिसरात १९ गावांचा समावेश आहे. त्यातील वडवली, शिरडोण, खानिवडे आदी गावांना बºयापैकी पाणी मिळते. पण खोणी, अंतरर्ली, पागड्याचापाडा, दहिसर, पिंपरी, दहिसर मोरी, मोकाशीपाडा, भंडार्ली, उत्तरशीव, गोठेघर, नारिवली, बाळे आणि वाकळण आदीं गावकºयांना गंभीर पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. या तीव्र संतापातून नागावला कृषीचा कार्यक्रम महिलांनी घेऊ दिला नाही. तीन महिन्यात पाणी समस्या दूर करण्याचे आश्वासन देऊनही लोकप्रतिनिधींनी काम केले नसल्याचा संताप या गावकºयांमध्ये धगधगत आहे.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणेwater shortageपाणीटंचाई