शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

‘त्या’ मुलींचे अपहरण नव्हे, त्या स्वत:च गेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 00:55 IST

मंगळवारी रात्री अंधेरी रेल्वेस्थानकावर दोन लहान शालेय गणवेशातील मुली रेल्वे पोलिसांना दिसल्यामुळे त्यांनी त्वरित दोघींची विचारपूस केली.

भाईंदर : अंधेरी रेल्वेस्थानकात रेल्वे पोलिसांना सापडलेल्या भाईंदर पूर्वेच्या एका शाळेतील चौथीत शिकणाऱ्या दोन शालेय विद्यार्थिनींचे अपहरण झाले नव्हते, असे नवघर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून त्या स्वत:च गेल्या होत्या, असे निदर्शनास आले आहे. परंतु, या घटनेने खळबळ उडाली असून पालकांची चिंता वाढली आहे.मंगळवारी रात्री अंधेरी रेल्वेस्थानकावर दोन लहान शालेय गणवेशातील मुली रेल्वे पोलिसांना दिसल्यामुळे त्यांनी त्वरित दोघींची विचारपूस केली. त्यावेळी त्या मुलींनी शाळेतून सुटल्यावर बाहेर एका अनोळखी व्यक्तीने तुम्हाला तुमच्या आईकडे घेऊन जातो, असे सांगून रिक्षात बसवले. तसेच आई अंधेरी रेल्वेस्थानकात थांबली आहे, असे सांगून लोकलच्या महिलांच्या डब्यात बसवले, असे सांगितले. रेल्वे पोलिसांनी नवघर पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. मुलींना पालकांच्या स्वाधीन केल्यावर पोलिसांनी अपहरणाचा प्रकार म्हणून तपास सुरू केला.शाळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता विद्यार्थ्यांच्या घोळक्यात या दोघी मुलीही शाळेतून सायंकाळी बाहेर पडल्या. सीसीटीव्हीमध्ये एकीचे वडील दुचाकी घेऊन शाळेबाहेर वाट बघत थांबले होते, तेही दिसले.त्या अंधेरीला गेल्या कशा हा प्रश्न अनुत्तरीत- मुलींनी मुख्य रस्त्यावर जाऊन रिक्षा पकडली. रिक्षा पकडून त्या भार्इंदर रेल्वेस्थानकात गेल्या. स्वत: मुलींनी तिकीट काढून त्या फलाटावर पोहोचल्या. फलाटावर काही वेळ होत्या. नंतर, त्यांनी लोकल पकडली.- हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये आला असून त्यांच्यासोबत कोणी अनोळखी व्यक्ती आढळली नसल्याचे नवघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी सांगितले. परंतु, पोलिसांचा तपास सुरू असून अपहरणाचे पुरावे अजून आढळलेले नाहीत. अपहरण झाले नाही, तर मग या दोघी मुली अंधेरीला गेल्या कशाला, याचे उत्तर मात्र अजून सापडलेले नाही.- शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण किंवा पळवून नेण्याच्या घटना घडत असतात.यामुळे पालकांनीही पाल्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ते कुठे जातात, मित्रमैत्रिणी कोण याची माहिती असली पाहिजे असेही पोलिसांनी नमूद केले आहे.

टॅग्स :thaneठाणे