शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

‘त्या’ मुलींचे अपहरण नव्हे, त्या स्वत:च गेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 00:55 IST

मंगळवारी रात्री अंधेरी रेल्वेस्थानकावर दोन लहान शालेय गणवेशातील मुली रेल्वे पोलिसांना दिसल्यामुळे त्यांनी त्वरित दोघींची विचारपूस केली.

भाईंदर : अंधेरी रेल्वेस्थानकात रेल्वे पोलिसांना सापडलेल्या भाईंदर पूर्वेच्या एका शाळेतील चौथीत शिकणाऱ्या दोन शालेय विद्यार्थिनींचे अपहरण झाले नव्हते, असे नवघर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून त्या स्वत:च गेल्या होत्या, असे निदर्शनास आले आहे. परंतु, या घटनेने खळबळ उडाली असून पालकांची चिंता वाढली आहे.मंगळवारी रात्री अंधेरी रेल्वेस्थानकावर दोन लहान शालेय गणवेशातील मुली रेल्वे पोलिसांना दिसल्यामुळे त्यांनी त्वरित दोघींची विचारपूस केली. त्यावेळी त्या मुलींनी शाळेतून सुटल्यावर बाहेर एका अनोळखी व्यक्तीने तुम्हाला तुमच्या आईकडे घेऊन जातो, असे सांगून रिक्षात बसवले. तसेच आई अंधेरी रेल्वेस्थानकात थांबली आहे, असे सांगून लोकलच्या महिलांच्या डब्यात बसवले, असे सांगितले. रेल्वे पोलिसांनी नवघर पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. मुलींना पालकांच्या स्वाधीन केल्यावर पोलिसांनी अपहरणाचा प्रकार म्हणून तपास सुरू केला.शाळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता विद्यार्थ्यांच्या घोळक्यात या दोघी मुलीही शाळेतून सायंकाळी बाहेर पडल्या. सीसीटीव्हीमध्ये एकीचे वडील दुचाकी घेऊन शाळेबाहेर वाट बघत थांबले होते, तेही दिसले.त्या अंधेरीला गेल्या कशा हा प्रश्न अनुत्तरीत- मुलींनी मुख्य रस्त्यावर जाऊन रिक्षा पकडली. रिक्षा पकडून त्या भार्इंदर रेल्वेस्थानकात गेल्या. स्वत: मुलींनी तिकीट काढून त्या फलाटावर पोहोचल्या. फलाटावर काही वेळ होत्या. नंतर, त्यांनी लोकल पकडली.- हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये आला असून त्यांच्यासोबत कोणी अनोळखी व्यक्ती आढळली नसल्याचे नवघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी सांगितले. परंतु, पोलिसांचा तपास सुरू असून अपहरणाचे पुरावे अजून आढळलेले नाहीत. अपहरण झाले नाही, तर मग या दोघी मुली अंधेरीला गेल्या कशाला, याचे उत्तर मात्र अजून सापडलेले नाही.- शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण किंवा पळवून नेण्याच्या घटना घडत असतात.यामुळे पालकांनीही पाल्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ते कुठे जातात, मित्रमैत्रिणी कोण याची माहिती असली पाहिजे असेही पोलिसांनी नमूद केले आहे.

टॅग्स :thaneठाणे