शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

उल्हासनगरच्या हद्दीतील ‘त्या’ इमारती होणार नियमित; शासनाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 00:35 IST

८५५ इमारतींना दिलासा; पालिका आयुक्तांना सर्वाधिकार

उल्हासनगर : राज्य शासनाच्या नोटिफिकेशननुसार धोकादायक आणि ८५५ बेकायदा इमारतींचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली. आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह नगरविकास सचिवाकडे साकडे घातल्यावर शासनाला २००६ चा अध्यादेश डोळ्यांसमोर ठेवून नवीन अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार सर्वाधिकार महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

उल्हासनगरात धोकादायक इमारती पडून अनेकांचे बळी गेले आहेत. गेल्या महिन्यात १३ इमारती रिकाम्या केल्या असून शेकडो कुटुंबे बेघर झाली. त्यांच्यावर घर देता का घर, असे म्हणण्याची वेळ आली आहे. महेक इमारतीतील रहिवाशांसह इतरांनी ३१ आॅगस्टपासून साखळी उपोषण सुरू केले. धोकादायक इमारतींबाबत दिलासा देणारा तोडगा काढण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, ज्योती कलानी, पंचम कलानी, शिवसेना-भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसह नगरविकास सचिव करीर यांच्याकडे साकडे घालून पाठपुरावा सुरू केला. अखेर, ९ सप्टेंबरला राज्य शासनाने अधिसूचना काढून धोकादायक व बेकायदा ८५५ इमारतींमधील शेकडो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

शहरातील ८५५ इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने २००६ मध्ये विशेष अध्यादेश शहरासाठी काढला होता. काही अटी व शर्तींवर दंडात्मक रक्कम आकारून बांधकामे नियमित करण्यास सुरुवात झाली. दंडात्मक रक्कम जास्त असल्याने २२ हजारांपेक्षा जास्त प्रस्ताव पालिकेकडे येऊ नही १०० बांधकामे नियमित झाली, तर काहींना डी फॉर्म देण्यात आले. १०० बांधकामे अधिकृत झाल्याने पालिकेला साडेसात कोटींचे उत्पन्न मिळाले. तज्ज्ञ समितीकडून प्रस्तावाची छाननी झाल्यानंतर अंतिम सही जिल्हाधिकाऱ्यांची होत होती. जिल्हाधिकाऱ्यांना सर्वाधिकार दिले होते; मात्र जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष न दिल्याने राज्य शासनाने नव्या अधिसूचनेद्वारे सर्वाधिकार पालिका आयुक्तांना दिल्याने धोकादायक व ८५५ इमारतींचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.‘निकषांची माहिती घेऊ ’धोकादायक व ८५५ इमारतींप्रकरणी राज्य शासनाने काढलेली अधिसूचना मिळाली असून त्यामध्ये अनेक सुधारणा आहेत. नवीन डीसी रूलनुसार चटईक्षेत्र, अटी-शर्ती व दंडात्मक रकमेत शिथिलता आदींबाबत नियम बाकी असून शहरातील धोकादायक व ८५५ बेकायदा इमारतींचा प्रश्न निकाली निघणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर