शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जू गावातील ते ५८ लोक अखेर तीन दिवसानंतर पोहचले स्वगृही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 19:54 IST

शनिवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील खडवडी येथील भातसा नदीला पूर आल्याने रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

- उमेश जाधव

टिटवाळा - शनिवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील खडवडी येथील भातसा नदीला पूर आल्याने रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान येथील जू देखील गावाला पूराच्या पाण्याचा वेडावला बसला. यात येतील ५८ लोक या पोरात अडकली होती. त्यांना हवाई दलाच्या हेलिकॉप्टर द्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. अखेर  तीन दिवसानंतर ते आपल्या येथील स्वगृही परतले आहेत. सध्या त्यांच्या गावात कल्याण तालुका तहसीलदार दिपक आकडे यांचे पथक पहणी करण्यासाठी दाखल झाले आहे.

कल्याण तालुक्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागाला ही मोठ्या प्रमाणात पुराचा वेढा पडला होता. यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेकडो घरे पूराच्या पाण्यात होती. अशीच परिस्थिती खडवली येथे निर्माण झाली होती. येथील जू गावात २० महिला, २५ पुरुष व १३  लहान मुलं असे ५८ लोक अडकले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांना एन डी आर एफ व वायुसेनेचे हेलिकॉप्टर यांनी रेस्क्यू करून ठाणे, बालकुम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. तीन दिवस त्यांची या ठिकाणी रहाण्या- खाण्यापिण्याची व्यवस्था पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नगरसेवक संजय भोईर यांनी. तसेच यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. पूर ओसरल्ल्या नंतर  अखेर तीन दिवसानी मंगळवारी सायंकाळी त्यांना  शासकीय वाहानाने  खडवली येथील जू  या आपल्या स्वगृही सोडण्यात आले. 

या गावात पूरात कैलास पालवी, रवींद्र रामू सवार,  विष्णू पालवी रमेश परशुराम जाधव, गणेश परशुराम जाधव, शांताराम जाधव, संतोष गाडगे, राजू सवार, आनंता मुकणे, सुवर्णा पालवी, हाली जाधव, गुली सवार, फसी मुकणे इत्यादींसह ५८ लोक अडकली होती.

बुधवारी सदर ठिकाणची परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी कल्याण तहसिलदार दिपक आकडे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जागेवर जाऊन घरांचे पंचनामे केले आहेत. तसेच बाधित लोकांशी चर्चा साधून त्यांच्या व्यथा ही जाणून घेतल्या.

या पूरात या लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोलमजुरी करणाऱ्या या आदिवासी बांधवांनी वर्षभराचे धान्य घरात साठवून ठेवले होते ते ही या पूरात वाहून गेले आहे. तसेच त्यांच्या ४० शेळ्या  देखील वाहून  गेलेल्या आहेत. येथील शेतकरी विष्णू पालवे यांची भातशेती व दुध देणाऱ्या 10  म्हशी या पूरात वाहून गेल्या आहेत.

तो दिवस आठवला की अंगाला काटा मारतो. अतिशय कठीण परिस्थितीत आम्ही काही तास पूर सदृश्य परिस्थितीत अडकलो होतो.  दैव बलवत्तर होते म्हणून आम्हाला शासकीय मदत पोहोचली आणि आमचे जिव वाचले. परंतु आमची जानावरे व शेती आम्ही वाचू शकलो नाही.

- कैलास विष्णू पालवी

 

आम्ही खूप घाबरलो होतो. आमच्या गावाच्या चारी बाजुनी पाणी आणि आम्ही मध्ये आडकलो होतो. आम्ही  तर जगण्याची आशाच सोडली होती. परंतु शासकीय यंत्रणेमुळे आम्ही वाचलो. 

 - रवींद्र रामू सवार 

आम्हाला सुरक्षित स्थळी हलवले, परंतु आमचे सगळं लक्ष आमच्या घरी लागले होते. आपल्या जनावरांचे, शेती व घराचे काय होईल याच चिंतेत होतो. मंगळवारी सायंकाळी घरी आलो तर जागेवर काहीच नाही, सर्व काही पूराच्या पाण्यात वाहून गेले आहे. जो विचार येत होता तेच घडले.

- विष्णू पालवी

टॅग्स :thaneठाणे