शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

त्या १४ गावांचा नवी मुंबईत समावेश करणार; एकनाथ शिंदे यांचे गावकऱ्यांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:22 IST

नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षापूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवंलबिणा:या ठाणो, नवीमुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्याचे वेध लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : मागील दोन वेळेस नवी मुंबईतून बाहेर पडलेल्या त्या १४ गावातील रहिवाशांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश व्हावा अशी ईच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार भंडार्ली तसेच आसपासच्या १४ गावांचा नवीमुंबईत समावेश करण्याबाबत नगरविकास खात्यामार्फत सर्व तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शुक्रवारी नगरविकासमंत्री तथा ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

  भंडार्ली डम्पींगच्या मुद्यावरुन शुक्रवारी ठाणो महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात येथील गावकऱ्यांची बैठक लावण्यात आली होती. त्यावेळेस येथील रहिवाशांना नवी मुंबई महापालिकेत १४ गावांचा समावेश करावी अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. त्यानुसार शिंदे यांनी हे आश्वासन दिले आहे. येथील दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भंडार्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिरस मोरी आदी गावांचा यात समावेश आहे.

नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षापूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवंलबिणा:या ठाणो, नवीमुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्याचे वेध लागले आहेत. वास्तविक पाहता नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली त्यावेळेस या गावांचा समावेश करण्यात आला होता. परंतु आम्ही महापालिका नको म्हणून येथील रहिवाशांनी विरोध करुन बाहेर पडले होते. त्यानंतर पुन्हा या गावांचा समावेश नवी मुंबईत करण्यात आला होता. दोन वेळा समावेशानंतरही येथील रहिवाशांनी नाके मुरडली होती. आता मात्र नवी मुंबई महापालिकेत समावेशासाठी याच रहिवाशांनी आग्रही भुमिका घेतली आहे. राज्य सरकाराने आखलेल्या नवी मुंबई विमानतळ अधिसुचित क्षेत्रत (नैना) या गावांचा समावेश केल्याने पुन्हा एकदा येथील ग्रामस्थांचे पित्त खवळले होते. त्यानुसार आम्हाला महापालिकाच हवी अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.

शिळफाटा भागातून उजवीकडे वळल्यास कल्याण - तळोजा रस्त्यालगत ही गावे वसली आहेत. ठाणे महापालिका हद्दीत शीळ, डायघर अशा गावांना अगदीच खेटून ही गावे भौगोलिकदृष्टया नवी मुंबईशी संलग्न नसली तरी महापालिका स्थापनेच्या वेळेस त्यांचा महापालिकेत समावेश करण्यात आला होता. परंतु आता विकास कामे, समस्या सुटत नसल्याने या रहिवाशांनी पुन्हा महापालिकेत समावेशाची मागणी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीने हीच मागणी लावून धरली होती. त्यानंतर आता शुक्रवारी झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे