शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आॅफ लााईन धान्य वितरण होणाऱ्या शिधावाटप दुकानांची कसून तपासणी; भिवंडीतील २० दुकानांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:28 IST

जिल्ह्यात ५९० शिधावाटप दुकानांना ई पॉस यंत्रे देऊन त्यां दुकानदारांना प्रशिक्षित ही करण्यात आले. यामुळे या ईपॉस यंत्राव्दारे ग्राहकाना देखील धान्याची उचल केली जात असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंग वळवी यांनी सांगितले. मात्र २५ टक्यांपेक्षा जास्त धान्याची उचल ई पॉसचा वापर न करता २० दुकानामध्ये केल्याचे आढळून आले. यास आळा घालण्यासाठी त्यातील ग्राहकांची काटेकोर व्यापक तपासणी

ठळक मुद्देआॅफ लाईन धान्य घेणा-या व्यक्तींची राज्यव्यापी सर्व्हेक्षण मोहीमई पॉसचा वापर न करता भिवंडीतील २० दुकानांमध्ये धान्य वितरणकमीतकमी २० ग्राहकाना व्यक्तिश: बोलावून त्याना देखील विचारणा

ठाणे : शिधावाटपाचे काम संगणकीकृत झाले आहे, मात्र अद्यापही आॅफ लाईन म्हणजे ई पॉस यंत्राशिवाय धान्याचे वितरण सुरू आहे. सुमारे २५ टक्क्यांपेक्षा जास्त धान्याची उचल ई पॉसचा वापर न करता भिवंडीतील २० दुकानांमध्ये धान्य वितरण झाल्याचे आढळून आले. यामुळे या दुकानांची १८ व १९ सप्टेंबर रोजी कडक तापासणी होणार आहे.

या आॅफ लाईन धान्य घेणा-या व्यक्तींची राज्यव्यापी सर्व्हेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामधील २० शिधावाटप दुकानांची देखील सलग दोन दिवस तपासणी केली जाईल. जिल्ह्यात ५९० शिधावाटप दुकानांना ई पॉस यंत्रे देऊन त्यां दुकानदारांना प्रशिक्षित ही करण्यात आले. यामुळे या ईपॉस यंत्राव्दारे ग्राहकाना देखील धान्याची उचल केली जात असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंग वळवी यांनी सांगितले. मात्र २५ टक्यांपेक्षा जास्त धान्याची उचल ई पॉसचा वापर न करता २० दुकानामध्ये केल्याचे आढळून आले. यास आळा घालण्यासाठी त्यातील ग्राहकांची काटेकोर व्यापक तपासणी करण्यात येणार असल्याचे वळवी यांनी सांगितले.या तपासणीमध्ये धान्य ई पॉसच्या माध्यमातून का देण्यात आले नाही, त्याचा अहवाल तयार करण्यात येणारा आहे. जेणेकरून यामागील कारण कळेल व ती समस्या दूर करणे शक्य होईल. यानंतरच १०० टक्के आॅनलाईन व्यवहार शिधावाटप दुकानांवर करणे शक्य होणार आहे. यासाठी संबंधीत २० दुकानांचे सर्वेक्षण करून तपासणी हाती घेतली आहे. ही तपासणी आॅगस्ट महिन्यात झालेल्या धान्याच्या विक्रीवर आधारित होईल. यासाठी भिवंडी तहसीलदार, नायब तहसीलदार , पुरवठा निरीक्षक आदी जबाबदार अधिकाºयांचे पथक १८ सप्टेंबरला दोन आणि १९ ला दोन अशा चार दुकानांना भेटी देऊन ते सर्व व्यवहार तपासणी करणार आहे. यासाठी त्याना शासनाने विवरणपत्र दिले असून त्यात विविध कारणेही नमूद केलेली आहेत. त्यानुसार तपासण करण्यात येईल.पथकाव्दारे पहिल्या दिवशी भिवंडी तालुक्यातील खोणी एक, खोणी दोन, काटई दोन, खोणी पाच, पडघा एक, पडघा दोन, कुशिवली, लाप, भवाळे, देवळी या रास्त भाव शिधावाटप दुकानांची तपासणी करण्यात येईल . यानंतर दुसºया दिवशी खोणी तीन , खोणी चार , आवळे, पिळझे खु, धामणगाव दोन , भोईरगाव, लोनाड, नांदकर, कशिवली, नेवाडे येथील शिधावाटप रास्तभाव दुकानांची तपासणी येईल. या निश्चित केलेल्या दुकानांतील कमीतकमी २० ग्राहकाना व्यक्तिश: बोलावून त्याना देखील विचारणा करून बोलते करण्यात येणार आहे. ई पॉस मशीनमध्ये नाव नसणे, दुकानांमध्ये नेटवर्क नसणे, आधार सीडिंग न होणे, सर्व्हरला माहिती अद्ययावत न होणे, संबंधित तहसील कार्यालयाकडून योग्य ते सहकार्य न मिळणे अशी काही कारणे देखील यावेळी तपासण्यात येणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी