शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

कॅरम खेळू न दिल्यानेच ठाण्यातील जळीतकांड?, कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:55 IST

कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार १४ सप्टेंबर रोजी घडला होता. कॅरम खेळू न दिल्याने, त्याच सोसायटीमधील काही तरुणांनी ती लावल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. यातील संशयितांना सोमवारी पोलिसांनी नोटीस बजाविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे : कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार १४ सप्टेंबर रोजी घडला होता. कॅरम खेळू न दिल्याने, त्याच सोसायटीमधील काही तरुणांनी ती लावल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. यातील संशयितांना सोमवारी पोलिसांनी नोटीस बजाविल्याची माहिती सूत्रांनी दिली.सुरुवातीला या आगीबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे सुब्रमण्यम मुदलीयार आणि योगेश कार्ले यांनी सांगितले होते. नंतर मात्र त्यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या सोसायटीतील मंदार साटम (२०) आणि शांतीनगर येथील अनिकेत शिंदे (२२) या दोघांनी कॅरम खेळण्यासाठी सोसायटीच्या व्यायामशाळेची चावी मागितली होती. मात्र, व्यायामशाळेचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे, त्यांनी चावी देण्यास नकार दिला. यातूनच या दोघांनी रहिवाशांना जमा करून, काही काळ गोंधळही घातला होता. त्यांनीच आग लावून गाड्या जाळल्याचा संशय सुब्रमण्यम मुदलीयार यांनी या तक्रारीमध्ये व्यक्त केला आहे. त्यानुसार, आता साटम आणि शिंदे या दोघा संशयितांकडे चौकशी सुरू असल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली. गुरुवारी पहाटे २.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.