शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गहाण ठेवलेले दागिने सोडल्यावर त्यावर चोरट्यांचा डल्ला; उल्हासनगरातील घटना

By सदानंद नाईक | Updated: August 25, 2023 20:25 IST

शांती सागर हॉटेलच्या समोर मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसलेल्या तरुणाने महिलेच्या हातातील दागिन्यांची पिशवी जोरदारपणे हिसकली.

उल्हासनगर : कॅम्प नं-४, भाटिया चौकातील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये गहाण ठेवलेले दागिने सोडून रिक्षाने जात असतांना, मोटरसायकल वरून आलेल्या दोघांनी दागिने ठेवलेली पिशवी खेचून पोबारा केला. पिशवी घट्ट पकडून ठेवल्याने आशा दिनेश कोमरे धावत्या रिक्षातून पडून जखमी झाल्या आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं-४, भाटिया चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या बँकेत २ लाख ८० हजाराचे गहाण ठेवलेले दागिने आशा दिनेश कोमरे यांनी सोडून दागिने एका पिशवीत ठेवले. हातात दागिन्यांची पिशवी घेऊन त्या घरी जाण्यासाठी रिक्षात बसल्या. रिक्षा कुर्ला कॅम्प रस्त्यांनी जात असतांना रिक्षा मागून एक मोटरसायकल भरधाव वेगाने आली. शांती सागर हॉटेलच्या समोर मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसलेल्या तरुणाने महिलेच्या हातातील दागिन्यांची पिशवी जोरदारपणे हिसकली. तेंव्हा आशा कोमरे या रिक्षातून खाली पडल्या. मात्र पिशवी चोरट्यांच्या हातीं लागल्याने, त्यांनी पिशवी घेऊन पोबारा केला. रिक्षातून आशा कोमरे पडल्याने, जखमी झाल्या असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.