शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘त्यांची’ ही वेतनाअभावी होतेय परवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 19:41 IST

कल्याण: एकिकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचा-यांचे वेतन वेळेवर होत नसताना सुरक्षा विभागातील बोर्डाच्या कर्मचा-यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. परिवहन कर्मचा-यांपाठोपाठ आता बोर्डाच्या कर्मचा-यांचीही वेतनाअभावी परवड सुरू झाली आहे. परिवहन कर्मचा-यांप्रमाणे वेतनाविना घर चालवायचे तरी कसे अशी म्हणण्याची वेळ संबंधित सुरक्षा कर्मचा-यांवर देखील ओढावली आहे.

ठळक मुद्देसुरक्षा बोर्डाचे कर्मचारी दोन महिने वेतनविना

कल्याण: एकिकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचा-यांचे वेतन वेळेवर होत नसताना सुरक्षा विभागातील बोर्डाच्या कर्मचा-यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. परिवहन कर्मचा-यांपाठोपाठ आता बोर्डाच्या कर्मचा-यांचीही वेतनाअभावी परवड सुरू झाली आहे. परिवहन कर्मचा-यांप्रमाणे वेतनाविना घर चालवायचे तरी कसे अशी म्हणण्याची वेळ संबंधित सुरक्षा कर्मचा-यांवर देखील ओढावली आहे.केडीएमटी कर्मचा-यांचे वेतन विलंबाने मिळणे हि तर नित्याचीच बाब आहे. महिन्याचे वेतन हे दुस-या महिन्याच्या अखेरीस मिळते काहीवेळेस त्याच्याहून अधिक कालावधी लागतो. हे नेहमीचे झाले असताना नुकतेच याप्रकरणी कर्मचा-यांनी चककाजाम आंदोलन छेडले होते. त्यानंतर लागलीच वेतन महापालिकेकडून अदा केले गेले. परिवहन उपक्रमातील वेतन हे सर्वस्वी केडीएमसीच्या अनुदानावर अवलंबुन आहे. यात उपक्रमातील वाहक-चालक आणि कर्मचा-यांची परवड होत असताना महापालिकेला सुरक्षाविभागासाठी घेतलेल्या बोर्डाच्या कर्मचा-यांचे वेतन वेळेवर देणे दुरापस्त झाले आहे. महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे ३४ कर्मचारी केडीएमसीने घेतले आहेत. महापालिका क्षेत्रात ते कर्मचारी सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. परंतू जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे वेतन त्यांना मार्च महिना उजाडला तरी मिळालेले नाही. या बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना २० हजाराच्या वर वेतन मिळत असलेतरी त्यांच्या हातात १४ ते १५ हजारापर्यंतच वेतन पडते. मात्र गेले दोन महिने हे कर्मचारी वेतनविना आहेत. विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या सुरक्षा कर्मचा-यांना फेब्रुवारीचे वेतन देखील मार्च महिन्याच्या दुस-या आठवडयात मिळाले आहे. वेतन उशीराने मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जातेय. दरम्यान बोर्डाच्या सुरक्षारक्षकांच्या वेतनाबाबतची फाईल ही लेखाविभागाकडे पाठविल्याचे सुरक्षा विभागाकडून सांगितले जात असलेतरी याची अंमलबजावणी होणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.यासंदर्भात केडीएमसीचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता त्यांनी वेतन दोन महिने मिळालेले नाही हे वास्तव असून त्यांच्या वेतनासंदर्भातील फाईल लेखाविभागाकडे पाठविली आहे. आपल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन देखील आताच झाले असून बोर्डाच्या सुरक्षारक्षकांचे वेतनपण लवकरच दिले जातील असे सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली