शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांची’ ही वेतनाअभावी होतेय परवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 19:41 IST

कल्याण: एकिकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचा-यांचे वेतन वेळेवर होत नसताना सुरक्षा विभागातील बोर्डाच्या कर्मचा-यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. परिवहन कर्मचा-यांपाठोपाठ आता बोर्डाच्या कर्मचा-यांचीही वेतनाअभावी परवड सुरू झाली आहे. परिवहन कर्मचा-यांप्रमाणे वेतनाविना घर चालवायचे तरी कसे अशी म्हणण्याची वेळ संबंधित सुरक्षा कर्मचा-यांवर देखील ओढावली आहे.

ठळक मुद्देसुरक्षा बोर्डाचे कर्मचारी दोन महिने वेतनविना

कल्याण: एकिकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचा-यांचे वेतन वेळेवर होत नसताना सुरक्षा विभागातील बोर्डाच्या कर्मचा-यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. परिवहन कर्मचा-यांपाठोपाठ आता बोर्डाच्या कर्मचा-यांचीही वेतनाअभावी परवड सुरू झाली आहे. परिवहन कर्मचा-यांप्रमाणे वेतनाविना घर चालवायचे तरी कसे अशी म्हणण्याची वेळ संबंधित सुरक्षा कर्मचा-यांवर देखील ओढावली आहे.केडीएमटी कर्मचा-यांचे वेतन विलंबाने मिळणे हि तर नित्याचीच बाब आहे. महिन्याचे वेतन हे दुस-या महिन्याच्या अखेरीस मिळते काहीवेळेस त्याच्याहून अधिक कालावधी लागतो. हे नेहमीचे झाले असताना नुकतेच याप्रकरणी कर्मचा-यांनी चककाजाम आंदोलन छेडले होते. त्यानंतर लागलीच वेतन महापालिकेकडून अदा केले गेले. परिवहन उपक्रमातील वेतन हे सर्वस्वी केडीएमसीच्या अनुदानावर अवलंबुन आहे. यात उपक्रमातील वाहक-चालक आणि कर्मचा-यांची परवड होत असताना महापालिकेला सुरक्षाविभागासाठी घेतलेल्या बोर्डाच्या कर्मचा-यांचे वेतन वेळेवर देणे दुरापस्त झाले आहे. महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे ३४ कर्मचारी केडीएमसीने घेतले आहेत. महापालिका क्षेत्रात ते कर्मचारी सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. परंतू जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे वेतन त्यांना मार्च महिना उजाडला तरी मिळालेले नाही. या बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना २० हजाराच्या वर वेतन मिळत असलेतरी त्यांच्या हातात १४ ते १५ हजारापर्यंतच वेतन पडते. मात्र गेले दोन महिने हे कर्मचारी वेतनविना आहेत. विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या सुरक्षा कर्मचा-यांना फेब्रुवारीचे वेतन देखील मार्च महिन्याच्या दुस-या आठवडयात मिळाले आहे. वेतन उशीराने मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जातेय. दरम्यान बोर्डाच्या सुरक्षारक्षकांच्या वेतनाबाबतची फाईल ही लेखाविभागाकडे पाठविल्याचे सुरक्षा विभागाकडून सांगितले जात असलेतरी याची अंमलबजावणी होणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.यासंदर्भात केडीएमसीचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता त्यांनी वेतन दोन महिने मिळालेले नाही हे वास्तव असून त्यांच्या वेतनासंदर्भातील फाईल लेखाविभागाकडे पाठविली आहे. आपल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन देखील आताच झाले असून बोर्डाच्या सुरक्षारक्षकांचे वेतनपण लवकरच दिले जातील असे सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली