शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

दिव्यातील ३२५ कुटुंबे येणार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:50 IST

खारफुटींची कत्तल करून त्यावर उभारलेल्या इमारती आणि चाळींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले होते.

ठाणे : खारफुटींची कत्तल करून त्यावर उभारलेल्या इमारती आणि चाळींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले होते. त्यानुसार, शनिवारी सुटीच्या दिवशी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये दिव्यात कारवाई केली. सुरुवातीला नागरिकांनी या कारवाईस विरोध केला. मात्र, अनेकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून त्या पाच इमारती, चाळी अशा तब्बल ३२५ कुटुंबांचे पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला. तसेच या इमारती आणि चाळींना जाणाऱ्या जलवाहिन्या काढल्या असून पंपही जप्त केले आहेत. आता या इमारतींवर मंगळवारनंतर हातोडा टाकण्यात येणार आहे.मुंब्य्रातील माहिती अधिकार कार्यकर्ते इराकी आरीफ नवाज यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी यावर सुनावणी होऊन दिवा आणि मुंब्य्रातील अशा प्रकारे खारफुटींची कत्तल करून उभारलेल्या बांधकामांवर कारवाईचे आदेश पालिकेला दिले होते.त्यानुसार, शनिवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशीच उपायुक्त मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली १८० पोलीस बंदोबस्तासह महापालिकेचे १२ अधिकारी आणि इतर पथके दिव्यात दाखल झाली. परंतु, या सर्वांना दिव्यात शिरण्यापासून संतप्त रहिवाशांनी रेल्वेफाटकाजवळच रोखले होते. त्यामुळे काही काळ वादंग निर्माण झाला होता. तो दुपारपर्यंत सुरूच होता. त्यामुळे अशांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती उपायुक्त जोशी यांनी दिली.काही काळानंतर संतप्त जमावातून मार्ग काढून पालिकेचे पथक दिव्यातील त्या पाच इमारतींच्या ठिकाणी पोहोचले़ यावेळी या पथकामार्फत या इमारतींसह खारफुटींची कत्तल करून उभारलेल्या चाळीचे पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला़ या ठिकाणी ३२५ कुटुंबांचे वास्तव्य असल्याची माहिती पालिकेने दिली.>मंगळवारनंतर बांधकामांवर पडणार हातोडाठाणे महापालिकेच्या माध्यमातून अचानकपणे शनिवारी ही कारवाई झाल्याने मोठ्या कष्टाने हक्काचे घर घेणाऱ्यांचे मात्र यामुळे चांगलेच हाल झाल्याचे दिसून आले. तर, एका स्थानिकाच्या बंगल्याचेही पाणी, वीज कनेक्शन खंडित केले आहे. दरम्यान, आता येथील रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे आवाहन केले. मंगळवारपासून या बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे.