शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

दिव्यातील ३२५ कुटुंबे येणार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:50 IST

खारफुटींची कत्तल करून त्यावर उभारलेल्या इमारती आणि चाळींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले होते.

ठाणे : खारफुटींची कत्तल करून त्यावर उभारलेल्या इमारती आणि चाळींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले होते. त्यानुसार, शनिवारी सुटीच्या दिवशी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये दिव्यात कारवाई केली. सुरुवातीला नागरिकांनी या कारवाईस विरोध केला. मात्र, अनेकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून त्या पाच इमारती, चाळी अशा तब्बल ३२५ कुटुंबांचे पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला. तसेच या इमारती आणि चाळींना जाणाऱ्या जलवाहिन्या काढल्या असून पंपही जप्त केले आहेत. आता या इमारतींवर मंगळवारनंतर हातोडा टाकण्यात येणार आहे.मुंब्य्रातील माहिती अधिकार कार्यकर्ते इराकी आरीफ नवाज यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी यावर सुनावणी होऊन दिवा आणि मुंब्य्रातील अशा प्रकारे खारफुटींची कत्तल करून उभारलेल्या बांधकामांवर कारवाईचे आदेश पालिकेला दिले होते.त्यानुसार, शनिवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशीच उपायुक्त मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली १८० पोलीस बंदोबस्तासह महापालिकेचे १२ अधिकारी आणि इतर पथके दिव्यात दाखल झाली. परंतु, या सर्वांना दिव्यात शिरण्यापासून संतप्त रहिवाशांनी रेल्वेफाटकाजवळच रोखले होते. त्यामुळे काही काळ वादंग निर्माण झाला होता. तो दुपारपर्यंत सुरूच होता. त्यामुळे अशांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती उपायुक्त जोशी यांनी दिली.काही काळानंतर संतप्त जमावातून मार्ग काढून पालिकेचे पथक दिव्यातील त्या पाच इमारतींच्या ठिकाणी पोहोचले़ यावेळी या पथकामार्फत या इमारतींसह खारफुटींची कत्तल करून उभारलेल्या चाळीचे पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला़ या ठिकाणी ३२५ कुटुंबांचे वास्तव्य असल्याची माहिती पालिकेने दिली.>मंगळवारनंतर बांधकामांवर पडणार हातोडाठाणे महापालिकेच्या माध्यमातून अचानकपणे शनिवारी ही कारवाई झाल्याने मोठ्या कष्टाने हक्काचे घर घेणाऱ्यांचे मात्र यामुळे चांगलेच हाल झाल्याचे दिसून आले. तर, एका स्थानिकाच्या बंगल्याचेही पाणी, वीज कनेक्शन खंडित केले आहे. दरम्यान, आता येथील रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे आवाहन केले. मंगळवारपासून या बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे.