शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

दिव्यातील ३२५ कुटुंबे येणार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:50 IST

खारफुटींची कत्तल करून त्यावर उभारलेल्या इमारती आणि चाळींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले होते.

ठाणे : खारफुटींची कत्तल करून त्यावर उभारलेल्या इमारती आणि चाळींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले होते. त्यानुसार, शनिवारी सुटीच्या दिवशी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये दिव्यात कारवाई केली. सुरुवातीला नागरिकांनी या कारवाईस विरोध केला. मात्र, अनेकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून त्या पाच इमारती, चाळी अशा तब्बल ३२५ कुटुंबांचे पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला. तसेच या इमारती आणि चाळींना जाणाऱ्या जलवाहिन्या काढल्या असून पंपही जप्त केले आहेत. आता या इमारतींवर मंगळवारनंतर हातोडा टाकण्यात येणार आहे.मुंब्य्रातील माहिती अधिकार कार्यकर्ते इराकी आरीफ नवाज यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी यावर सुनावणी होऊन दिवा आणि मुंब्य्रातील अशा प्रकारे खारफुटींची कत्तल करून उभारलेल्या बांधकामांवर कारवाईचे आदेश पालिकेला दिले होते.त्यानुसार, शनिवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशीच उपायुक्त मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली १८० पोलीस बंदोबस्तासह महापालिकेचे १२ अधिकारी आणि इतर पथके दिव्यात दाखल झाली. परंतु, या सर्वांना दिव्यात शिरण्यापासून संतप्त रहिवाशांनी रेल्वेफाटकाजवळच रोखले होते. त्यामुळे काही काळ वादंग निर्माण झाला होता. तो दुपारपर्यंत सुरूच होता. त्यामुळे अशांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती उपायुक्त जोशी यांनी दिली.काही काळानंतर संतप्त जमावातून मार्ग काढून पालिकेचे पथक दिव्यातील त्या पाच इमारतींच्या ठिकाणी पोहोचले़ यावेळी या पथकामार्फत या इमारतींसह खारफुटींची कत्तल करून उभारलेल्या चाळीचे पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला़ या ठिकाणी ३२५ कुटुंबांचे वास्तव्य असल्याची माहिती पालिकेने दिली.>मंगळवारनंतर बांधकामांवर पडणार हातोडाठाणे महापालिकेच्या माध्यमातून अचानकपणे शनिवारी ही कारवाई झाल्याने मोठ्या कष्टाने हक्काचे घर घेणाऱ्यांचे मात्र यामुळे चांगलेच हाल झाल्याचे दिसून आले. तर, एका स्थानिकाच्या बंगल्याचेही पाणी, वीज कनेक्शन खंडित केले आहे. दरम्यान, आता येथील रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे आवाहन केले. मंगळवारपासून या बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे.