शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमधील बाजारपेठांमध्ये होती शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:01 IST

उल्हासनगरमधील मुख्य मार्केटमध्ये अनलॉक वेळीही खरेदीदारांची नेहमी वर्दळ असते.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरात संततधार पाऊस सुरू असून कुठेही पाणी तुंबल्याची घटना घडली नाही. संततधार पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये शांतता असून नागरिक फिरकले नसल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली.

उल्हासनगरमधील मुख्य मार्केटमध्ये अनलॉक वेळीही खरेदीदारांची नेहमी वर्दळ असते. मात्र, मंगळवार रात्रीपासून संततधार सुरू असल्याने ग्राहक मार्केटमध्ये फिरकलेच नाही. आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयासमोर, कॅम्प नं-३ स्टेट बँक, मयूर हॉटेल, गुलशननगर आदी ठिकाणी काही काळ पाणी तुंबले होते.

मात्र, पावसाचा जोर नसल्याने पाण्याचा निचरा झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी बाळू नेटके यांनी दिली. तसेच उल्हास व वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली नसल्याचे ते म्हणाले.पावसामुळे चाकरमान्यांची दांडीच्अंबरनाथ / बदलापूर : मंगळवार रात्रीपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे दांडी मारण्याची वेळ आली. त्यातच बससेवेवरही पावसाचा विपरित परिणाम झाल्याने कामगारांना बसनेही कामावर जाणे शक्य झाले नाही.च्अंबरनाथ आणि बदलापूरमधील चाकरमानी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले. मात्र, लोकलसेवा विस्कळीत असल्याचे कळताच घरचा रस्ता धरला.च्दिवसभर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक नागरिकांनी घरी बसणे पसंत केले, तर बाजारपेठेतही तुरळक गर्दी दिसत होती.पावसाने नागरिकांची तारांबळच्मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये मंगळवारी रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. पावसाने नागरिकांची तारांबळ उडवलीच, पण घरात पाणी शिरल्याने त्यांचे अतिशय हाल झाले.च्मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला. अनेकांना भिजतच आपले घर गाठावे लागले. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. शहरातील सखल भाग पाण्याखाली गेला होता. मुर्धा-मोरवा गावातही अनेकांच्या घरांत पाणी शिरले. पालिकेचे कोणी मदतीसाठी फिरकले नाही की, पाणी तुंबले तेथील कचरा काढण्यासाठीही कोणी आले नाही, अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला.च्घरात पाणी शिरल्याने खालच्या भागात ठेवलेले साहित्य उचलण्याची घाई उडाली. सामान भिजल्यानेही नुकसान झाले. नागरिकांच्या जेवणाचेही हाल झाले. अनेक ठिकाणी तर बुधवार सकाळपर्यंत पाणी उतरले नव्हते. पावसाने महापालिका आणि नगरसेवक काय कामे करतात, हे पुन्हा चव्हाट्यावर आल्याचा संताप नागरिकांनी बोलून दाखवला.