शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमधील बाजारपेठांमध्ये होती शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:01 IST

उल्हासनगरमधील मुख्य मार्केटमध्ये अनलॉक वेळीही खरेदीदारांची नेहमी वर्दळ असते.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरात संततधार पाऊस सुरू असून कुठेही पाणी तुंबल्याची घटना घडली नाही. संततधार पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये शांतता असून नागरिक फिरकले नसल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली.

उल्हासनगरमधील मुख्य मार्केटमध्ये अनलॉक वेळीही खरेदीदारांची नेहमी वर्दळ असते. मात्र, मंगळवार रात्रीपासून संततधार सुरू असल्याने ग्राहक मार्केटमध्ये फिरकलेच नाही. आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयासमोर, कॅम्प नं-३ स्टेट बँक, मयूर हॉटेल, गुलशननगर आदी ठिकाणी काही काळ पाणी तुंबले होते.

मात्र, पावसाचा जोर नसल्याने पाण्याचा निचरा झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी बाळू नेटके यांनी दिली. तसेच उल्हास व वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली नसल्याचे ते म्हणाले.पावसामुळे चाकरमान्यांची दांडीच्अंबरनाथ / बदलापूर : मंगळवार रात्रीपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे दांडी मारण्याची वेळ आली. त्यातच बससेवेवरही पावसाचा विपरित परिणाम झाल्याने कामगारांना बसनेही कामावर जाणे शक्य झाले नाही.च्अंबरनाथ आणि बदलापूरमधील चाकरमानी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले. मात्र, लोकलसेवा विस्कळीत असल्याचे कळताच घरचा रस्ता धरला.च्दिवसभर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक नागरिकांनी घरी बसणे पसंत केले, तर बाजारपेठेतही तुरळक गर्दी दिसत होती.पावसाने नागरिकांची तारांबळच्मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये मंगळवारी रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. पावसाने नागरिकांची तारांबळ उडवलीच, पण घरात पाणी शिरल्याने त्यांचे अतिशय हाल झाले.च्मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला. अनेकांना भिजतच आपले घर गाठावे लागले. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. शहरातील सखल भाग पाण्याखाली गेला होता. मुर्धा-मोरवा गावातही अनेकांच्या घरांत पाणी शिरले. पालिकेचे कोणी मदतीसाठी फिरकले नाही की, पाणी तुंबले तेथील कचरा काढण्यासाठीही कोणी आले नाही, अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला.च्घरात पाणी शिरल्याने खालच्या भागात ठेवलेले साहित्य उचलण्याची घाई उडाली. सामान भिजल्यानेही नुकसान झाले. नागरिकांच्या जेवणाचेही हाल झाले. अनेक ठिकाणी तर बुधवार सकाळपर्यंत पाणी उतरले नव्हते. पावसाने महापालिका आणि नगरसेवक काय कामे करतात, हे पुन्हा चव्हाट्यावर आल्याचा संताप नागरिकांनी बोलून दाखवला.