शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उल्हासनगरमधील बाजारपेठांमध्ये होती शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:01 IST

उल्हासनगरमधील मुख्य मार्केटमध्ये अनलॉक वेळीही खरेदीदारांची नेहमी वर्दळ असते.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरात संततधार पाऊस सुरू असून कुठेही पाणी तुंबल्याची घटना घडली नाही. संततधार पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये शांतता असून नागरिक फिरकले नसल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली.

उल्हासनगरमधील मुख्य मार्केटमध्ये अनलॉक वेळीही खरेदीदारांची नेहमी वर्दळ असते. मात्र, मंगळवार रात्रीपासून संततधार सुरू असल्याने ग्राहक मार्केटमध्ये फिरकलेच नाही. आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयासमोर, कॅम्प नं-३ स्टेट बँक, मयूर हॉटेल, गुलशननगर आदी ठिकाणी काही काळ पाणी तुंबले होते.

मात्र, पावसाचा जोर नसल्याने पाण्याचा निचरा झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी बाळू नेटके यांनी दिली. तसेच उल्हास व वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली नसल्याचे ते म्हणाले.पावसामुळे चाकरमान्यांची दांडीच्अंबरनाथ / बदलापूर : मंगळवार रात्रीपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे दांडी मारण्याची वेळ आली. त्यातच बससेवेवरही पावसाचा विपरित परिणाम झाल्याने कामगारांना बसनेही कामावर जाणे शक्य झाले नाही.च्अंबरनाथ आणि बदलापूरमधील चाकरमानी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले. मात्र, लोकलसेवा विस्कळीत असल्याचे कळताच घरचा रस्ता धरला.च्दिवसभर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक नागरिकांनी घरी बसणे पसंत केले, तर बाजारपेठेतही तुरळक गर्दी दिसत होती.पावसाने नागरिकांची तारांबळच्मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये मंगळवारी रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. पावसाने नागरिकांची तारांबळ उडवलीच, पण घरात पाणी शिरल्याने त्यांचे अतिशय हाल झाले.च्मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला. अनेकांना भिजतच आपले घर गाठावे लागले. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. शहरातील सखल भाग पाण्याखाली गेला होता. मुर्धा-मोरवा गावातही अनेकांच्या घरांत पाणी शिरले. पालिकेचे कोणी मदतीसाठी फिरकले नाही की, पाणी तुंबले तेथील कचरा काढण्यासाठीही कोणी आले नाही, अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला.च्घरात पाणी शिरल्याने खालच्या भागात ठेवलेले साहित्य उचलण्याची घाई उडाली. सामान भिजल्यानेही नुकसान झाले. नागरिकांच्या जेवणाचेही हाल झाले. अनेक ठिकाणी तर बुधवार सकाळपर्यंत पाणी उतरले नव्हते. पावसाने महापालिका आणि नगरसेवक काय कामे करतात, हे पुन्हा चव्हाट्यावर आल्याचा संताप नागरिकांनी बोलून दाखवला.