शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

खाजगी बसवर कारवाईसाठी वेळ नाही, आंदोलनानंतरही परिस्थिती जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:00 IST

ठाणे पूर्वेतून सुटणा-या खाजगी बसच्या विरोधात कोपरीत आंदोलन झाल्यानंतरही आजही त्यांचा प्रवास सुसाट सुरू आहे.

ठाणे : ठाणे पूर्वेतून सुटणा-या खाजगी बसच्या विरोधात कोपरीत आंदोलन झाल्यानंतरही आजही त्यांचा प्रवास सुसाट सुरू आहे. महापालिकेने त्यांच्यावर कारवाईसाठी आरटीओकडे बोट दाखविले असतांना आता वाहतूक पोलिसांनीदेखील आरटीओलाच जबाबदार धरले आहे. असे असले तरी या बसना लगाम कोण घालणार असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.सहा महिन्यांपूर्वीदेखील समितीने कोपरी येथून होणाºया खाजगी बसच्या विरोधात आंदोलन उभारले होते. त्यानंतर त्या काही दिवसांसाठी का होईना बंद झाल्या होत्या. वाहतूक पोलीस आणि संबंधित आरटीओ प्रशासनानेदेखील यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज आठ महिने उलटून गेल्यानंतरही त्या विरोधात कोणतीच कारवाई झालेली नाही.कोपरीमध्ये आंदोलन झाल्यानंतर या बस बंद होतील असे वाटत होते. परंतु, आजही त्या सुसाट सुरूच आहेत. टीएमटीच्या बस थांब्यावर त्या उभ्या करू नका म्हणून परिवहनतर्फे कर्मचारी नेमले आहेत. तरी त्यांच्याशी हुज्जत घालून त्या थेट बसथांब्यावर उभ्या राहत आहेत.कॅडबरी ब्रीज, नितीन कंपनी आणि तीनहातनाक्याजवळील ब्रीजच्या चढणीवर आणि उताराला रस्त्याच्या मधोमध त्या उभ्या केल्या जात आहे. अचानक त्या उभ्या राहत असल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.हायवेला सर्वच वाहने सुसाट असतात, परंतु अशा पद्धतीने कुठेही कसेही प्रवासी घेणे आणि उतरविणे यामुळे इतर वाहन चालकांबरोबर प्रवाशांचा जीवदेखील धोक्यात घालण्याचा प्रकार त्यांच्याकडून होत आहे.दरम्यान, या बसेसवर कारवाई व्हावी म्हणून परिवहनच्या बैठकीत देखील चर्चा झाली होती. परंतु, आरटीओकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देऊन परिवहन प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचे अधिकारही त्यांनाच असल्याचे सांगितले होते. तरीही या प्रकरणात काहीच होताना दिसत नाही.