शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

धसई गाव 100 टक्के कॅशलेस होईल असा दावा केला नव्हता-रणजीत सावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 21:15 IST

भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहिर केल्यावर कॅशलेश इंडियाच्या दृष्टाने पाऊले उचलली गेली.

ऑनलाइन लोकमत कल्याण- भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहिर केल्यावर कॅशलेश इंडियाच्या दृष्टाने पाऊले उचलली गेली. मुरबाड तालुक्यातील धसई हे गाव देशातील पहिले कॅशलेस गाव ठरले. मात्र काही कालवाधीनंतर कॅशलेस धसई गावचा दावा फोल ठरल्याच्या बातम्याही आल्या. प्रत्यक्षात धसई गाव हे 100 टक्के कॅशलेस होईल असा दावा केला नव्हता. तसेच कोणतेच गाव कॅशलेस होऊ शकत नाही, असे वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी येथे केले.    

कल्याण सुभेदार वाडा कट्टातर्फे ‘नोटबंदीनंतरची कॅशलेश इंडिया’ या विषयावर व्याख्याते सावरकर यांचे व्याख्यान आज सायंकाळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी सावरकर यांनी उपरोक्त वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, धसई गावात 1क्क् टक्के व्यवहार हा कॅशलेस होईल असे म्हटले गेले होते. मात्र तसे झालेले नाही. तसा दावाही केला गेला नव्हता. गावात आजही व्यापारी डेबिट कार्डचा वापर करतात. जवळपास 8क्क् तरुणांना डेबिट कार्ड प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामुळे कॅशलेश इंडियाच्या संकल्पनेत धसई हे गाव हे आजही मिनी इंडियाच आहे. ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना डेबिट कार्ड देण्यामागचे धोकेही पंतप्रधान मोदी यांनी त्याचवेळी स्पष्ट केले होते. आजही ग्रामीण भागातील अदिवासी माणसाला डेबिट कार्ड घेण्यासाठी पदरचे 200 रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे त्याला डेबिट कार्ड परवडत नाही. त्यामुळे आदीवासी डेबीट कार्ड व बँक व्यवहाराच्या भानगडीत पडत नाही. याकडे सावरकर यांनी लक्ष्य वेधले.

सावरकर म्हणाले की, नोटबंदीनंतर लगेच रुपये कार्ड आले होते. आता भीम हे कार्ड सामान्य वापरतात. तसेच पेटीएम हे हे वॉलेट वापरले जाते. त्यात पैसे टाकावे लागतात. वापरलेले पैसे संपले की, पैसे टाकावे लागतात. भीम कार्डाचा वापर केल्यास त्यातून लगेच पैसे ट्रान्सफर होतात. त्याला 20 हजार रुपयांचे लिमीट आहे. समोरच्याकडे हे कार्ड नसल्यास तरी त्याचा वापर करता येतो. भीम कार्डाच्या वापराचे नोटिफिकेशन लगेच ग्राहकाला मिळते. त्यामुळे पालकांनी अशी एक भिती असते त्यांची मुले त्यांनी दिलेल्या पैशाचा वापर योग्य प्रकारे करतात की नाही. भीम कार्डाद्वारे त्यांच्या मुलांनी कुठे व कधी व कसा पैसा वापरला आहे. त्याच्या नोटिफिकेशनद्वारे कळून येईल. त्यामुळे पालकांना पाल्याकडून होणा:या आर्थिक व्यवहाराची चिंता सतावणार नाही. त्यामुळे भीम कार्ड जास्त वापरणो सोयीचे ठरेल. आत्ता मोबाईल व बँक खाते आधार लिंक असल्याने भविष्यात आधार कार्डद्वारेही पैसे काढता येतील अशी सोय येईल असे भाकित सावकर यांनी यावेळी व्यक्त केले.

केंद्रात व राज्यात भाजप सरकार आले. भाजप सरकारने नोटबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. भारतातील काळा पैसा बाहेर येईल. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने अच्छे दिन येतील असा दावा करीत त्याच आश्वासनावर सत्तेचा सोपान गाठला. मात्र पाच वर्षात कसे काय अच्चे दिन येतील त्यासाठी सातत्याने सत्ता भाजपच्या हाती द्या असे आवाहन केले. नोटबंदीनंतर धसई गाव हे 100 टक्के कॅशलेस होईल असा दावा केला होता. या दावावर रणजीत सावरकर यांनी धसई शंभर टक्के कॅशलेस होईल असा दावा नव्हता असे वक्तव्य करुन अच्छे दिनच्याच उक्तीचा पुन: प्रत्यय नागरीकांना घडविला आहे.