शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

पोस्को कायद्यातंर्गत किती दिवसांत FIR नोंदवावा,यासाठी वेळेचे बंधन नाही - मनिषा तुळपुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 19:20 IST

एखाद्या मुलींवर अत्याचार झाल्यास त्यांचा गुन्हा किती दिवसात नोंदवावा यासाठी पोस्को कायद्याअंतर्गत कोणतेही वेळेच बंधन नाही. दडपणामुळे काही वेळा तक्रार उशिरा दिली जाते. गुन्ह्याच्या घडल्यानंतर काही दिवसांनी जबाब नोंदविला जातो.

कल्याण - एखाद्या मुलींवर अत्याचार झाल्यास त्यांचा गुन्हा किती दिवसात नोंदवावा यासाठी पोस्को कायद्याअंतर्गत कोणतेही वेळेच बंधन नाही. दडपणामुळे काही वेळा तक्रार उशिरा दिली जाते. गुन्ह्याच्या घडल्यानंतर काही दिवसांनी जबाब नोंदविला जातो. त्यासाठी डाक्टरांचे मत महत्त्वाचे आहे. गुन्हा नोंदविण्यास उशीर का झाले याचे योग्य ते कारण द्यावे लागते. याउलट तीन महिन्यांपर्यंत गुन्हा नोंद करावा लागतो, असे मत अॅड. मनिषा तुळपुळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग, परिवर्तन महिला संस्था आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लैंगिक अत्याचार प्रकरणी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, सामाजिक संस्था तसेच वकील यांची भूमिका व जबाबदारी’’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुळपुळे बोलत होत्या. समाजातील बालक-बालिका आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत  आहे.

त्याप्रमाणात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. गुन्हेगारांना कठोर शासन होत नसल्याने प्रवृत्तीला आळा बसण्याऐवजी या प्रकारच्या गुन्ह्याची संख्या वाढत आहे. पोस्को कायदा व पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केली आहे. त्यावर या परिसंवादात माहिती देण्यात आली.  तुळपुळे म्हणाल्या,  आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. पण त्याच बरोबर पीडितांचे पुनर्वसन होणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये समुपदेशन ,वैद्यकीय उपचार, स्वत:च्या पायावर उभे करणे आणि शिक्षण या गोष्टी पुनर्वसनात येतात. बाल लैंगिक शोषणाबाबत संवेदनशीलता, खूप वेळ आणि एका चांगल्या टीमची गरज असते. 16 ते 18 हे वय आकर्षणाचे असते. मुलं आणि मुली प्रेमात पडल्यावर आर्थिक परिस्थिती, जात, धर्म या गोष्टी मध्ये येतात.

अशावेळी मुली घरी जात नाही. त्यांना बालसुधारगृहात ठेवा आणि 18 वर्षाची झाल्यावर निर्णय घेऊ द्या. पोक्सो कायद्यातंर्गत काही प्रश्न पडल्यास त्यांवर चर्चा व शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम झाले पाहिजेत. शाळेत मुला-मुलींना जबाबदार लैंगिक वर्तन शिकविले जात नाही. मुलं यापासून वंचित राहतात. एखाद्या व्यक्तींनी चुकीची तक्रार केली व ते सिध्द झाले तर त्या व्यक्तीस शिक्षा होऊ शकते. अशी ओरड महिला आणि मुलांच्या बाबतीत वारंवार होत असते. आरोपी सज्ञान नसल्यास त्याने गुन्हा क्रिमिनल माईण्डने केला आहे का हे पाहिले जाते. चांगले जीवन जगण्याची संधी दिली जाते. समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण त्यांना दिले जाते, असे ही त्यांनी सांगितले.