शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

पुनर्विकासासाठी टीडीआर नाही : आयुक्त जयस्वाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 02:47 IST

पालिकेच्या टीडीआर धोरणावरून भाजपाचे नगरसेवक आक्रमक झालेले असताना यापुढे धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट (टीडीआर) देता येणार नाही, अशी घोषणा ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी महासभेत केली. त्यामुळे जुन्या ठाण्याच्या विकासावर विपरित परिणाम होण्याची चर्चा आहे.

ठाणे : पालिकेच्या टीडीआर धोरणावरून भाजपाचे नगरसेवक आक्रमक झालेले असताना यापुढे धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट (टीडीआर) देता येणार नाही, अशी घोषणा ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी महासभेत केली. त्यामुळे जुन्या ठाण्याच्या विकासावर विपरित परिणाम होण्याची चर्चा आहे.भाजपा नगरसेवकांनी टीडीआरच्या मुद्यावरून शुक्रवारी प्रशासनाला कात्रीत पकडल्यावर जयस्वाल यांनी ही घोषणा केली. सरकारच्या नव्या धोरणानुसार पुनर्विकासाकरिता टीडीआर देता येणार नाही, असे ते म्हणाले. तीनहातनाका येथील ‘न्यू वंदना’ सोसायटीच्या पुनर्विकासाचा मुद्दा काही दिवसांपासून गाजत आहे. या कामाचे प्रस्ताव मंजूर करताना पालिकेने २०० कोटींचा टीडीआर घोटाळा केल्याचा आरोप भाजपाचे विभागीय अध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी केला होता. भाजपाचे नगरसेवक नारायण पवार आणि सुनेश जोशी यांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. गुरुवारच्या महासभेत प्रभारी आयुक्त सुनील चव्हाण यांनी या आरोपांना उत्तर दिले होते. त्यामुळे या विषयावर पुन्हा चर्चा करायला हवी का, असा सवाल भाजपाच्या नगरसेवकांनी केला. त्यानंतर अतिरिक्त माहिती देणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्याला राष्टÑवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. भाजपा नगरसेवकांनी आक्षेप घेतला असतानाही आयुक्तांनी याविषयी आपली मते मांडली आणि पालिकेने या प्रकरणात चूक केलेली नसल्याचा खुलासा केला. ज्या काही मंजुºया दिल्या आहेत, त्या नियमानुसार दिल्या असून संबंधित विकासाला टीडीआर दिला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. घोटाळ्याचे आरोप अर्धवट माहितीच्या आधारे केले जात असून यापुढे पुनर्विकासाकरिता टीडीआर का देता येणार नाही, हेसुद्धा स्पष्ट केले.धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी परवानगी देताना मूळ एक एफएसआय आणि ०.५० इतका प्रोत्साहनपर एफएसआय पालिकेकडून दिला जातो. त्याशिवाय, रस्त्याच्या रुंदीनुसार टीडीआर दिला जात होता. त्यानंतरही पुनर्विकास होत नसल्याने शेकडो रहिवाशांची कोंडी सुरू आहे. या पुनर्विकासासाठी वाढीव एफएसआय मिळावा, असा ठरावसुद्धा पालिकेने केला असून तो राज्य सरकारने मंजूर करावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, २० जानेवारी २०१६ ला राज्य सरकारने टीडीआर कुठे वापरायचा आणि कुठे वापरू नये, याच्या धोरणात स्पष्टता आणली आहे. त्यात धोकादायक इमारतींसाठी टीडीआर द्यावा, अशी कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे आजवर धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकरिता जो टीडीआर दिला जात होता, तो यापुढे देता येणार नाही, असे जयस्वाल यांनी जाहीर केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका