शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

दु:खात आम्हाला कोणीच वाली नाही; डोंबिवलीत पूरग्रस्तांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 02:33 IST

प्रशासनाची डोळेझाक होत असल्याची टीका

डोंबिवली : शहरात दोन दिवसांपूर्वी झालेला मुसळधार पाऊस व आलेल्या पुरामुळे खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. डोंबिवली रिंगरूटच्या आराखड्यात असलेला परिसर पाण्याखाली होता. त्यात रविवारी बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याने खाडीकिनारी भागात पूरसदृश परिस्थिती होती. पुराचा फटका बसलेल्या पश्चिमेतील नवीन देवीचा पाडा येथील रहिवाशांंनी मंगळवारी रस्त्यावर येत आम्हाला कोणी वाली नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात चाळी बांधण्यात आल्या आहेत. बाजारभावापेक्षा कमी किंमत घरे मिळाल्याने अनेकांनी ती खरेदी केली. खाडीकिनारी असलेल्या नवीन देवीचा पाडा, जगदंबा मंदिर, गरिबाचा वाडा, सरोवर नगर, जुनी डोंबिवली, कुंभारखाण पाडा परिसरात जोरदार पावसामुळे पाणी साचले. त्यातच बारवी धरणाचे पाणी वाढल्याने अनेकांच्या घरातील फर्निचर, टी. व्ही., गाद्या, कपडे, धान्य असे सर्व साहित्य भिजले. त्यामुळे नागरिकांनी सर्व सामान बाहेर टाकून दिले. सध्या तेथील पाणी ओसरले असले तरी घरांत चिखलाचे साम्राज्य आहेत. त्यामुळे आता राहायचे कुठे, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.निवडणुकीत आमच्याकडे हक्काचे मतदार म्हणून पाहिले जात होते. त्यावेळी अनेक जण आमची विचारपूस करत होते. परंतु, आता कोणी काळजी घेत नाही, अशी खंत रहिवासी व्यक्त करत आहेत. सरकारही आमच्या समस्येकडे कानाडोळा करत आहेत. आम्ही उद्ध्वस्त झालो आहेत. आम्हाला कोणीच वाली नाही, अशी टीका ते करत आहेत. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी कायदा मोडून बांधकामे केली त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणीही रहिवासी करत आहेत.प्रत्यक्षात पश्चिमेतील बहुतांश ठिकाणच्या पूरग्रस्तांची स्थानिक नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे, भाजपचे गटनेते नगरसेवक विकास म्हात्रे, महापालिका विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, नगरसेवक वामन म्हात्रे आदींनी आपापल्या प्रभागांत राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. परंतु, ही सुविधा तोकडी असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे महापालिकेने ठोस पावले उचलावीत, असे मत रहिवासी व्यक्त करत आहेत.चाळींमधील घरात चिखल झाला असून, त्याची स्वच्छता करणे, फवारणी करणे, साथीचे आजार होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करून वैद्यकीय आरोग्य शिबिरे भरवण्याची गरज व्यक्त होत आहे.म्हशी गेल्या पण शेणामुळे दुर्गंधीकल्याण येथील गोविंदवाडी बायपास रस्त्यावर परिसरातील गोठ्यांमधील म्हशी सुरक्षिततचेच्या कारणास्तव निवाºयासाठी आणल्या होत्या. पूरस्थिती कमी होताच त्यांना पुन्हा गोठ्यांमध्ये नेण्यात आले. परंतु, त्यामुळे मात्र त्या रस्त्यावर प्रचंड घाण झाली होती.शेण-मूत्र आदींमुळे दुर्गंधी पसरलेली होती. वाहनचालक, पादचारी, रहिवासी आदींच्या आरोग्याचा त्यामुळे प्रश्न निर्माण होऊ शकतो.त्यासंदर्भात महापालिकेचे सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी म्हणाले की, तेथेही स्वच्छता केली जाईल. बहुतांशी काम झाले आहेत, उर्वरित पूर्ण केले जाणार आहे.पूरग्रस्त घरातील खराब झालेल्या वस्तू रस्त्यावर आणून टाकत आहेत. ते उचलण्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहेत. तसेच जंतुनाशक पावडर फवारणी, धुरफवारणी अशीही कामेही केली जात आहेत.- विलास जोशी, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी.