शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दु:खात आम्हाला कोणीच वाली नाही; डोंबिवलीत पूरग्रस्तांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 02:33 IST

प्रशासनाची डोळेझाक होत असल्याची टीका

डोंबिवली : शहरात दोन दिवसांपूर्वी झालेला मुसळधार पाऊस व आलेल्या पुरामुळे खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. डोंबिवली रिंगरूटच्या आराखड्यात असलेला परिसर पाण्याखाली होता. त्यात रविवारी बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याने खाडीकिनारी भागात पूरसदृश परिस्थिती होती. पुराचा फटका बसलेल्या पश्चिमेतील नवीन देवीचा पाडा येथील रहिवाशांंनी मंगळवारी रस्त्यावर येत आम्हाला कोणी वाली नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात चाळी बांधण्यात आल्या आहेत. बाजारभावापेक्षा कमी किंमत घरे मिळाल्याने अनेकांनी ती खरेदी केली. खाडीकिनारी असलेल्या नवीन देवीचा पाडा, जगदंबा मंदिर, गरिबाचा वाडा, सरोवर नगर, जुनी डोंबिवली, कुंभारखाण पाडा परिसरात जोरदार पावसामुळे पाणी साचले. त्यातच बारवी धरणाचे पाणी वाढल्याने अनेकांच्या घरातील फर्निचर, टी. व्ही., गाद्या, कपडे, धान्य असे सर्व साहित्य भिजले. त्यामुळे नागरिकांनी सर्व सामान बाहेर टाकून दिले. सध्या तेथील पाणी ओसरले असले तरी घरांत चिखलाचे साम्राज्य आहेत. त्यामुळे आता राहायचे कुठे, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.निवडणुकीत आमच्याकडे हक्काचे मतदार म्हणून पाहिले जात होते. त्यावेळी अनेक जण आमची विचारपूस करत होते. परंतु, आता कोणी काळजी घेत नाही, अशी खंत रहिवासी व्यक्त करत आहेत. सरकारही आमच्या समस्येकडे कानाडोळा करत आहेत. आम्ही उद्ध्वस्त झालो आहेत. आम्हाला कोणीच वाली नाही, अशी टीका ते करत आहेत. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी कायदा मोडून बांधकामे केली त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणीही रहिवासी करत आहेत.प्रत्यक्षात पश्चिमेतील बहुतांश ठिकाणच्या पूरग्रस्तांची स्थानिक नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे, भाजपचे गटनेते नगरसेवक विकास म्हात्रे, महापालिका विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, नगरसेवक वामन म्हात्रे आदींनी आपापल्या प्रभागांत राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. परंतु, ही सुविधा तोकडी असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे महापालिकेने ठोस पावले उचलावीत, असे मत रहिवासी व्यक्त करत आहेत.चाळींमधील घरात चिखल झाला असून, त्याची स्वच्छता करणे, फवारणी करणे, साथीचे आजार होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करून वैद्यकीय आरोग्य शिबिरे भरवण्याची गरज व्यक्त होत आहे.म्हशी गेल्या पण शेणामुळे दुर्गंधीकल्याण येथील गोविंदवाडी बायपास रस्त्यावर परिसरातील गोठ्यांमधील म्हशी सुरक्षिततचेच्या कारणास्तव निवाºयासाठी आणल्या होत्या. पूरस्थिती कमी होताच त्यांना पुन्हा गोठ्यांमध्ये नेण्यात आले. परंतु, त्यामुळे मात्र त्या रस्त्यावर प्रचंड घाण झाली होती.शेण-मूत्र आदींमुळे दुर्गंधी पसरलेली होती. वाहनचालक, पादचारी, रहिवासी आदींच्या आरोग्याचा त्यामुळे प्रश्न निर्माण होऊ शकतो.त्यासंदर्भात महापालिकेचे सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी म्हणाले की, तेथेही स्वच्छता केली जाईल. बहुतांशी काम झाले आहेत, उर्वरित पूर्ण केले जाणार आहे.पूरग्रस्त घरातील खराब झालेल्या वस्तू रस्त्यावर आणून टाकत आहेत. ते उचलण्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहेत. तसेच जंतुनाशक पावडर फवारणी, धुरफवारणी अशीही कामेही केली जात आहेत.- विलास जोशी, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी.