शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

आरटीओ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा उत्पन्नावर परिणाम नाही; अधिकाऱ्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:05 IST

दलालांची संख्या घटल्याने शुकशुकाट; नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अधिकारी तैनात

ठाणे : कर्मचाºयांचा आकृतीबंध पूर्ण करावा, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने शुक्रवारी राज्यव्यापी लेखणीबंद आंदोलन केले. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात कर्मचाºयांनी निदर्शने केली. तर, आंदोलनामुळे आरटीओच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही. येणाºया नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी काही अधिकारी तैनात केल्याचे आरटीओ अधिकाºयांनी सांगितले. मात्र, येथे दिसणारा दलालांचा दररोजचा वावर शुक्रवारच्या आंदोलनामुळे कमी झाल्याने कार्यालयासह आजूबाजूच्या परिसरात शुकशुकाट पाहण्यास मिळाला.ठाणे प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत एकूण चार उपप्रादेशिक कार्यालये आहेत. तेथील वेगवेगळ्या १० विभागांत सुमारे ३०० ते ३५० कर्मचारी आहेत. त्यांनी शुक्रवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठीही निदर्शने केली. मोटार वाहन विभागातील कर्मचाºयांचा कर्मचारी आकृतीबंद व कार्यालयीन रचना या समान महत्त्वाच्या अनेक मागण्या प्रशासनस्तरावर अकारण प्रलंबित आहेत. परिवहन विभागातील वर्ग-३ कर्मचाºयांच्या भवितव्यास त्यामुळे मोठा धोका उत्पन्न झाला आहे. त्यात मोटार वाहन विभागातील कर्मचाºयांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारी धोरणेच रेटण्याचा प्रयत्न शासनाने सुरू केला. त्याच्या विरोधात शुक्र वारी मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेच्या वतीने लेखणीबंद आंदोलन केले.ऑनलाइनमुळे फटका नाहीआरटीओचा बºयापैकी कारभार हा आॅनलाइन सुरू झालेला आहे. या लेखणीबंद आंदोलनामुळे आरटीओच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही.पण, वाहन हस्तांतरण पेपर आणि परवान्यांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी चार अधिकारी नेमले होते, अशी माहिती ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली.चौघांना केले होते तैनातवाहन हस्तांतरणाची कागदपत्रे आणि परवाना यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहासमोर आणि मर्फी येथील आरटीओ कार्यालयात प्रत्येकी दोनदोन अधिकारी तैनात केले होते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसthaneठाणेStrikeसंप