शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकर आणि काश्मिरी यांच्यात काही फरक वाटला नाही - शैलेंद्र मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 16:47 IST

जम्मू काश्मीर मधील कठूआ जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी काश्मीरमधील किस्से, प्रसंग सांगितले.

ठळक मुद्देठाणेकर आणि काश्मिरी यांच्यात काही फरक वाटलं नाही - शैलेंद्र मिश्रादोन्ही भाषा जवळपास सारख्याच : मिश्रामिश्रा यांनी केले ठाणे महापालिकेचे कौतुक

ठाणे : काश्मीरमध्ये माझी नियुक्ती झाली तेव्हा तेथे गेल्यावर कश्मिरी आणि ठाणेकर यांच्यात काही फरक जाणवला नाही. त्यांच्याही मागण्या त्याच आहेत. तेथील लोक मनमोकळे आहेत. सुरुवातीला मलाही वाटले आपण कसे जुळवून घेऊ पण लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत गेला. तेथील सहकाऱ्यांशी माझी चांगली मैत्री झाली. भाषेची अडचण येईल असे वाटले होते पण मराठी आणि काश्मिरी या दोन्ही भाषा जवळपास सारख्याच आहेत. त्यामुळे ती भाषा मला लवकर समजायला लागली. जेव्हा स्थानिक बोली भाषा आपल्याला समजते तेव्हा स्थानिकांच्या भावनाही समजतात असे कठूआ जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी आपले अनुभव कथन केले. 

          कश्मीर हा खूप टिपिकल विषय आहे. जिथे जास्त समस्या तिथे काम करण्याची अधिक संधी. कश्मीरमध्ये तणाव आहे पण मी त्याकडे तणाव म्हणून पाहिले नाही. भारतीय संविधानात जी शिकवण दिली त्याचाच वापर करून मी तेथे चांगल्या गोष्टी केल्या आणि तेथील लोकांनी माझ्या कामाचे कौतुक केले. आपण जे काम करतो त्याला जेव्हा लोक स्वीकारतात त्याचा आनंद वेगळा असतो. तेथील स्थानिक लोक माझ्या कामाला पसंती देत गेले. चांगले काम करत राहणे हा माझ्या तणावमुक्तीचा मार्ग आहे असेही ते म्हणाले. त्यांचे बालपण ठाण्यात गेले हे सांगताना प्रशासकीय सेवेत ते कसे आले हा प्रवास त्यांनी उलगडला. या सेवेची परीक्षा देताना माझा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचे ही मिश्रा म्हणाले.  कोरोनाचे नियंत्रण सध्या कोणाच्या हातात नसले तरी, कोरोनाची वाटणाऱ्या भीतीचे नियंत्रण आपल्या हातात आहे. आपण पोलीस, डॉक्टर याना सहकार्य केले तर आपला बचाव होईल असे सांगत त्यांनी सध्याच्या वातावरणाचा लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर केला. विद्यार्थ्यांनी पोलीस या क्षेत्रात यावे हे सांगताना ते म्हणाले, प्रत्येकाला आर्मीचा अभिमान आहे, त्यांची जीवनशैली दुरून सर्वानाच आवडते पण आर्मीचे डिसकमफॉर्ट्स कोणाला नको असतात. मात्र सुखसुविधायुक्त आयुष्य ही हवे असते. याचे मिश्रण म्हणजे पोलीस क्षेत्र. इथे नागरी जीवन आणि आर्मी सारखे प्रशिक्षण दोन्ही मिळते. प्रत्येकाने या क्षेत्राकडे नोकरी म्हणून नव्हे तर सेवा म्हणून पहावे. समाजाला जवळून पाहण्याची संधी पोलीस हे क्षेत्र देते. त्यामुळे या क्षेत्राकडे वळा असा सल्ला त्यांनी दिला

          आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिश्रा यांची मुलाखत निवेदक मकरंद जोशी यांनी घेतली. प्रा. प्रदीप ढवळ यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर, पोलीस आणि नागरिक याना वेगळे करून पाहणे बरोबर नाही. कोरोनाला घाबरू नका, सुरक्षिततेचे नियम पाळा हे सांगण्यासाठीच पोलीस आहेत असे मिश्रा पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी ठाणे महापालिकेचे कौतुक केले. ते म्हणाले स्वतःच्या बजेटमधून प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र चालविणारी ठाणे महापालिका ही एकमेव महापालिका आहे.

टॅग्स :thaneठाणेcollegeमहाविद्यालयJammu Kashmirजम्मू-काश्मीर