शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
3
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
4
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
5
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
6
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
7
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
8
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
9
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
10
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
11
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
12
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
13
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
14
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
15
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!
16
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
17
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
18
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
19
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
20
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे

ठाणेकर आणि काश्मिरी यांच्यात काही फरक वाटला नाही - शैलेंद्र मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 16:47 IST

जम्मू काश्मीर मधील कठूआ जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी काश्मीरमधील किस्से, प्रसंग सांगितले.

ठळक मुद्देठाणेकर आणि काश्मिरी यांच्यात काही फरक वाटलं नाही - शैलेंद्र मिश्रादोन्ही भाषा जवळपास सारख्याच : मिश्रामिश्रा यांनी केले ठाणे महापालिकेचे कौतुक

ठाणे : काश्मीरमध्ये माझी नियुक्ती झाली तेव्हा तेथे गेल्यावर कश्मिरी आणि ठाणेकर यांच्यात काही फरक जाणवला नाही. त्यांच्याही मागण्या त्याच आहेत. तेथील लोक मनमोकळे आहेत. सुरुवातीला मलाही वाटले आपण कसे जुळवून घेऊ पण लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत गेला. तेथील सहकाऱ्यांशी माझी चांगली मैत्री झाली. भाषेची अडचण येईल असे वाटले होते पण मराठी आणि काश्मिरी या दोन्ही भाषा जवळपास सारख्याच आहेत. त्यामुळे ती भाषा मला लवकर समजायला लागली. जेव्हा स्थानिक बोली भाषा आपल्याला समजते तेव्हा स्थानिकांच्या भावनाही समजतात असे कठूआ जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी आपले अनुभव कथन केले. 

          कश्मीर हा खूप टिपिकल विषय आहे. जिथे जास्त समस्या तिथे काम करण्याची अधिक संधी. कश्मीरमध्ये तणाव आहे पण मी त्याकडे तणाव म्हणून पाहिले नाही. भारतीय संविधानात जी शिकवण दिली त्याचाच वापर करून मी तेथे चांगल्या गोष्टी केल्या आणि तेथील लोकांनी माझ्या कामाचे कौतुक केले. आपण जे काम करतो त्याला जेव्हा लोक स्वीकारतात त्याचा आनंद वेगळा असतो. तेथील स्थानिक लोक माझ्या कामाला पसंती देत गेले. चांगले काम करत राहणे हा माझ्या तणावमुक्तीचा मार्ग आहे असेही ते म्हणाले. त्यांचे बालपण ठाण्यात गेले हे सांगताना प्रशासकीय सेवेत ते कसे आले हा प्रवास त्यांनी उलगडला. या सेवेची परीक्षा देताना माझा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचे ही मिश्रा म्हणाले.  कोरोनाचे नियंत्रण सध्या कोणाच्या हातात नसले तरी, कोरोनाची वाटणाऱ्या भीतीचे नियंत्रण आपल्या हातात आहे. आपण पोलीस, डॉक्टर याना सहकार्य केले तर आपला बचाव होईल असे सांगत त्यांनी सध्याच्या वातावरणाचा लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर केला. विद्यार्थ्यांनी पोलीस या क्षेत्रात यावे हे सांगताना ते म्हणाले, प्रत्येकाला आर्मीचा अभिमान आहे, त्यांची जीवनशैली दुरून सर्वानाच आवडते पण आर्मीचे डिसकमफॉर्ट्स कोणाला नको असतात. मात्र सुखसुविधायुक्त आयुष्य ही हवे असते. याचे मिश्रण म्हणजे पोलीस क्षेत्र. इथे नागरी जीवन आणि आर्मी सारखे प्रशिक्षण दोन्ही मिळते. प्रत्येकाने या क्षेत्राकडे नोकरी म्हणून नव्हे तर सेवा म्हणून पहावे. समाजाला जवळून पाहण्याची संधी पोलीस हे क्षेत्र देते. त्यामुळे या क्षेत्राकडे वळा असा सल्ला त्यांनी दिला

          आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिश्रा यांची मुलाखत निवेदक मकरंद जोशी यांनी घेतली. प्रा. प्रदीप ढवळ यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर, पोलीस आणि नागरिक याना वेगळे करून पाहणे बरोबर नाही. कोरोनाला घाबरू नका, सुरक्षिततेचे नियम पाळा हे सांगण्यासाठीच पोलीस आहेत असे मिश्रा पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी ठाणे महापालिकेचे कौतुक केले. ते म्हणाले स्वतःच्या बजेटमधून प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र चालविणारी ठाणे महापालिका ही एकमेव महापालिका आहे.

टॅग्स :thaneठाणेcollegeमहाविद्यालयJammu Kashmirजम्मू-काश्मीर