शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विल्हेवाटीची सक्ती कागदावरच, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरणही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 04:35 IST

कल्याण -  कच-याची विल्हेवाट स्वत:च लावा, असे आवाहन करून नागरिकांना दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची भीती घालणा-या केडीएमसीचा १ जूनचा मुहूर्तही हुकला आहे. तसेच ओला-सुका कच-याचे वर्गीकरण कागदावरच असताना या कच-याची वाहतूक आणि त्याच्या डम्पिंगची प्रक्रिया ही एकत्रितच होत आहे. केडीएमसी प्रशासनाची मानसिकता नसल्याने ‘वर्गीकरण’ प्रक्रियेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.ओला आणि ...

कल्याण -  कच-याची विल्हेवाट स्वत:च लावा, असे आवाहन करून नागरिकांना दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची भीती घालणा-या केडीएमसीचा १ जूनचा मुहूर्तही हुकला आहे. तसेच ओला-सुका कच-याचे वर्गीकरण कागदावरच असताना या कच-याची वाहतूक आणि त्याच्या डम्पिंगची प्रक्रिया ही एकत्रितच होत आहे. केडीएमसी प्रशासनाची मानसिकता नसल्याने ‘वर्गीकरण’ प्रक्रियेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.ओला आणि सुका कचºयाचे वर्गीकरण करावे. तसेच केडीएमसी कचरा उचलणार नसल्याने १ मेपासून त्याची विल्हेवाटही नागरिकांनीच लावावी, अशी भूमिका केडीएमसीने घेतली होती. त्याचवेळी कचºयाचे वर्गीकरण न करणाºया आस्थापना व गृहनिर्माण संकुलांवर दंडात्मक कारवाई व प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला होता. मात्र, याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीही पूर्वतयारी आणि जागृती न केल्याने त्याला नागरिकांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे महापालिकेने केवळ बड्या सोसायट्यांना कचºयाच्या विल्हेवाटीची सक्ती केली. तर, उर्वरित नागरिकांना त्याची वर्गीकरण आणि विल्हेवाटीची सवय लागावी, यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली. त्यानुसार, प्रशासनाने १ जूनपासून कचरा उचलणे बंद करणे अपेक्षित होते. परंतु, १५ होऊनही वर्गीकरणाची कृती प्रशासनाने सुरू केलेली नाही.ओला आणि सुका कचºयाची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावली जाते, असे दावे वरिष्ठ अधिकाºयांकडून केले जात असले तरी कनिष्ठ अधिकाºयांची मानसिकता नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. तर, वाहनांची सुविधा नसल्याने अंमलबजावणी करणे सोयीस्कर नसल्याचे आरोग्य निरीक्षकांचे म्हणणे आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून याप्रकरणी काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी सुविधा पुरवणे गरजेचे होते, पण तशी व्यवस्था केली गेली नसल्याने कचºयाचे वर्गीकरण करूनही नागरिकांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात असल्याचेही पाहावयास मिळत आहे. बहुतांश ठिकाणी नागरिकांकडून दिल्या जात असलेल्या या स्वतंत्र कचºयाची वाहतूक एकत्रितच होत आहे. त्यामुळे त्याची विल्हेवाटही आधारवाडी डम्पिंगवरच होत आहे, ही वस्तुस्थिती आहे.दरम्यान, यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोसायट्यांमध्ये कचºयाचे वर्गीकरण दिले जाते, असा दावा केला. केवळ चाळी तसेच झोपडपट्टी वसाहतींमध्ये याची अंमलबजावणी प्रभावीपणे अद्याप सुरू झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.नियोजनाअभावी समस्या कायम : आम्ही ओला आणि सुका कचरा वेगळा करून देतो. त्याचबरोबर प्लास्टिकचा कचराही स्वतंत्रपणे दिला जातो. परंतु, पालिकेच्या घंटागाड्यांमधून ओला आणि सुका कचरा एकत्रितच नेला जात आहे. अधिक चौकशी करता त्यांच्याकडे घंटागाड्यांची पुरेशी सुविधा नाही. त्या नादुरुस्त आहेत. एकीकडे साधनांअभावी ठोस अंमलबजावणी होत नसताना दुसरीकडे नियोजनाचा अभावही दिसून येत आहे, असे कल्याण पूर्वेकडील ‘लोकवाटिका’ गृहसंकुलातील रहिवासी मंजूषा ओरपे यांनी सांगितले.ठाण्याच्या धर्तीवर कार्यवाही व्हावीनागरिकांनी कचºयाचे वर्गीकरण करावे. ओल्या कचºयापासून घरच्याघरी खत करावे. तर, सुक्या कचºयातील ८० टक्के प्लास्टिक ऊर्जा फाउंडेशनसारख्या संस्थांना द्यावे. तर, उर्वरित २० टक्के कचरा पुनर्प्रक्रियेसाठी दिल्यास शून्य कचरा मोहीम राबवणे शक्य होऊ शकते. परंतु, त्यात नागरिकांचा सहभाग असायला हवा.ठाणे महापालिकेने १०० किलोपेक्षा जास्तीच्या कचºयाची निर्मिती करणाºया तसेच पाच हजार चौरस मीटरच्या क्षेत्रातील सोसायट्यांसाठी कचºयाचे वर्गीकरण करणे आणि त्याची तेथेच विल्हेवाट लावावी, असे स्पष्ट केले आहे. केडीएमसीनेही तशी कृती करावी, असे मत पर्यावरण दक्षता मंडळाच्या समन्वयक रूपाली शाईवाले यांनी व्यक्त केले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न