शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

विल्हेवाटीची सक्ती कागदावरच, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरणही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 04:35 IST

कल्याण -  कच-याची विल्हेवाट स्वत:च लावा, असे आवाहन करून नागरिकांना दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची भीती घालणा-या केडीएमसीचा १ जूनचा मुहूर्तही हुकला आहे. तसेच ओला-सुका कच-याचे वर्गीकरण कागदावरच असताना या कच-याची वाहतूक आणि त्याच्या डम्पिंगची प्रक्रिया ही एकत्रितच होत आहे. केडीएमसी प्रशासनाची मानसिकता नसल्याने ‘वर्गीकरण’ प्रक्रियेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.ओला आणि ...

कल्याण -  कच-याची विल्हेवाट स्वत:च लावा, असे आवाहन करून नागरिकांना दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची भीती घालणा-या केडीएमसीचा १ जूनचा मुहूर्तही हुकला आहे. तसेच ओला-सुका कच-याचे वर्गीकरण कागदावरच असताना या कच-याची वाहतूक आणि त्याच्या डम्पिंगची प्रक्रिया ही एकत्रितच होत आहे. केडीएमसी प्रशासनाची मानसिकता नसल्याने ‘वर्गीकरण’ प्रक्रियेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.ओला आणि सुका कचºयाचे वर्गीकरण करावे. तसेच केडीएमसी कचरा उचलणार नसल्याने १ मेपासून त्याची विल्हेवाटही नागरिकांनीच लावावी, अशी भूमिका केडीएमसीने घेतली होती. त्याचवेळी कचºयाचे वर्गीकरण न करणाºया आस्थापना व गृहनिर्माण संकुलांवर दंडात्मक कारवाई व प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला होता. मात्र, याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीही पूर्वतयारी आणि जागृती न केल्याने त्याला नागरिकांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे महापालिकेने केवळ बड्या सोसायट्यांना कचºयाच्या विल्हेवाटीची सक्ती केली. तर, उर्वरित नागरिकांना त्याची वर्गीकरण आणि विल्हेवाटीची सवय लागावी, यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली. त्यानुसार, प्रशासनाने १ जूनपासून कचरा उचलणे बंद करणे अपेक्षित होते. परंतु, १५ होऊनही वर्गीकरणाची कृती प्रशासनाने सुरू केलेली नाही.ओला आणि सुका कचºयाची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावली जाते, असे दावे वरिष्ठ अधिकाºयांकडून केले जात असले तरी कनिष्ठ अधिकाºयांची मानसिकता नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. तर, वाहनांची सुविधा नसल्याने अंमलबजावणी करणे सोयीस्कर नसल्याचे आरोग्य निरीक्षकांचे म्हणणे आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून याप्रकरणी काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी सुविधा पुरवणे गरजेचे होते, पण तशी व्यवस्था केली गेली नसल्याने कचºयाचे वर्गीकरण करूनही नागरिकांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात असल्याचेही पाहावयास मिळत आहे. बहुतांश ठिकाणी नागरिकांकडून दिल्या जात असलेल्या या स्वतंत्र कचºयाची वाहतूक एकत्रितच होत आहे. त्यामुळे त्याची विल्हेवाटही आधारवाडी डम्पिंगवरच होत आहे, ही वस्तुस्थिती आहे.दरम्यान, यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोसायट्यांमध्ये कचºयाचे वर्गीकरण दिले जाते, असा दावा केला. केवळ चाळी तसेच झोपडपट्टी वसाहतींमध्ये याची अंमलबजावणी प्रभावीपणे अद्याप सुरू झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.नियोजनाअभावी समस्या कायम : आम्ही ओला आणि सुका कचरा वेगळा करून देतो. त्याचबरोबर प्लास्टिकचा कचराही स्वतंत्रपणे दिला जातो. परंतु, पालिकेच्या घंटागाड्यांमधून ओला आणि सुका कचरा एकत्रितच नेला जात आहे. अधिक चौकशी करता त्यांच्याकडे घंटागाड्यांची पुरेशी सुविधा नाही. त्या नादुरुस्त आहेत. एकीकडे साधनांअभावी ठोस अंमलबजावणी होत नसताना दुसरीकडे नियोजनाचा अभावही दिसून येत आहे, असे कल्याण पूर्वेकडील ‘लोकवाटिका’ गृहसंकुलातील रहिवासी मंजूषा ओरपे यांनी सांगितले.ठाण्याच्या धर्तीवर कार्यवाही व्हावीनागरिकांनी कचºयाचे वर्गीकरण करावे. ओल्या कचºयापासून घरच्याघरी खत करावे. तर, सुक्या कचºयातील ८० टक्के प्लास्टिक ऊर्जा फाउंडेशनसारख्या संस्थांना द्यावे. तर, उर्वरित २० टक्के कचरा पुनर्प्रक्रियेसाठी दिल्यास शून्य कचरा मोहीम राबवणे शक्य होऊ शकते. परंतु, त्यात नागरिकांचा सहभाग असायला हवा.ठाणे महापालिकेने १०० किलोपेक्षा जास्तीच्या कचºयाची निर्मिती करणाºया तसेच पाच हजार चौरस मीटरच्या क्षेत्रातील सोसायट्यांसाठी कचºयाचे वर्गीकरण करणे आणि त्याची तेथेच विल्हेवाट लावावी, असे स्पष्ट केले आहे. केडीएमसीनेही तशी कृती करावी, असे मत पर्यावरण दक्षता मंडळाच्या समन्वयक रूपाली शाईवाले यांनी व्यक्त केले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न