शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पुर्नवसन होत नाही, तोपर्यंत जाणार नाही; श्रमजीवी संघटनेचा आक्रमक पवित्रा, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन 

By अजित मांडके | Updated: January 12, 2024 19:10 IST

ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील २०१९ पासून ५०० जणांना वेठबिगार मुक्तीचे दाखल दिले.

ठाणे: ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील २०१९ पासून ५०० जणांना वेठबिगार मुक्तीचे दाखल दिले. मात्र, त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आले नाही. त्याच्या निषेधार्थ व पुनर्वसन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शुक्रवारी आंदोलन पुकारले. यावेळी श्रमजीवी संघटनेने आक्रमक पवित्र घेत, पुर्नवसन होत नाही, तो पर्यंत जाणार नाही असा वीतरा घेतला आहे. तर, यावेळी आंदोलन कर्त्यांनी हातात व गळ्यात साखळी दंड घालून सरकारचा निषेध करीत असल्याचे दिसून आले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन सर्व मुक्त वेठबिगार त्यांचे वेठबिगार मुक्तीचे दाखले परत करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. 

ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील वेठ बिगारांचे शोध घेऊन त्यांना मुक्त करण्याची जबाबदारी कायद्याने शासनाची आहे. असे असताना, शासन विठबिगारांचा शोध घेऊन मुक्त करण्यात कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यात श्रमजीवी संघटनेच्या शोध मोहीमेतून नाशिक, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातून २५० मुक्त झालेल्या वेठबिगारांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यांना तातडीने मुक्ती नंतर तिन दिवसाच्या आत ३० हजार अर्थ सहाय्य मिळायला हवे होते. परंतू ते मिळालेले नाही. मुक्त वेठबिगारांना घरे मिळायला हवी होती ती ही मिळालेली नाहीत. त्यांच्या कायस्वरुपी पुनर्वसनासाठी जमीन, रोजगार, इत्यादी प्रकारची योजना द्यायला हवी होती ते ही दिलेले नाही. ज्या ज्या कातकरी बांधवांना घराखाली जागा नाही त्यांना चार गुंठे जागा द्या, स्थलांतरण थांबविण्याची मागणी देखील अद्यापही मान्य झालेली नाही. तसेच विट भट्टीवर किमान वेतन फलक देखील लावलेले नाहीत. 

याच्या निषेधार्थ शुक्रवार १२ जानेवारी २०२४ रोजी श्रमजीवी संघटनेच्या वतीने नाशिक, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील २०१९ पासून मुक्त झालेले वेठबिगारांना तहसिलदारांनी दिलेले मुक्तीचे दाखले मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन सर्व मुक्त वेठबिगार शासनाला परत करणार आहेत. वेठबिगारांचे पुनर्वसन करण्यास शासन कुचकामी ठरल्याने आम्हाला एखादा सावकार बघून देऊन पुन्हा आम्हाला वेठबिगारीच्या खाईत लोटावे अशी मागणी करणार असल्याची संतप्त पर्तीक्रिया संघटनेच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, श्रमजीवी संघटनेने आक्रमक पवित्र घेत, पुर्नवसन होत नाही, तो पर्यंत जाणार नाही असा वीतरा घेतला आहे. यावेळी आंदोलन कर्त्यांनी हातात व गळ्यात साखळी दंड घालून सरकारचा निषेध करीत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :thaneठाणे