शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुर्नवसन होत नाही, तोपर्यंत जाणार नाही; श्रमजीवी संघटनेचा आक्रमक पवित्रा, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन 

By अजित मांडके | Updated: January 12, 2024 19:10 IST

ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील २०१९ पासून ५०० जणांना वेठबिगार मुक्तीचे दाखल दिले.

ठाणे: ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील २०१९ पासून ५०० जणांना वेठबिगार मुक्तीचे दाखल दिले. मात्र, त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आले नाही. त्याच्या निषेधार्थ व पुनर्वसन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शुक्रवारी आंदोलन पुकारले. यावेळी श्रमजीवी संघटनेने आक्रमक पवित्र घेत, पुर्नवसन होत नाही, तो पर्यंत जाणार नाही असा वीतरा घेतला आहे. तर, यावेळी आंदोलन कर्त्यांनी हातात व गळ्यात साखळी दंड घालून सरकारचा निषेध करीत असल्याचे दिसून आले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन सर्व मुक्त वेठबिगार त्यांचे वेठबिगार मुक्तीचे दाखले परत करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. 

ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील वेठ बिगारांचे शोध घेऊन त्यांना मुक्त करण्याची जबाबदारी कायद्याने शासनाची आहे. असे असताना, शासन विठबिगारांचा शोध घेऊन मुक्त करण्यात कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यात श्रमजीवी संघटनेच्या शोध मोहीमेतून नाशिक, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातून २५० मुक्त झालेल्या वेठबिगारांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यांना तातडीने मुक्ती नंतर तिन दिवसाच्या आत ३० हजार अर्थ सहाय्य मिळायला हवे होते. परंतू ते मिळालेले नाही. मुक्त वेठबिगारांना घरे मिळायला हवी होती ती ही मिळालेली नाहीत. त्यांच्या कायस्वरुपी पुनर्वसनासाठी जमीन, रोजगार, इत्यादी प्रकारची योजना द्यायला हवी होती ते ही दिलेले नाही. ज्या ज्या कातकरी बांधवांना घराखाली जागा नाही त्यांना चार गुंठे जागा द्या, स्थलांतरण थांबविण्याची मागणी देखील अद्यापही मान्य झालेली नाही. तसेच विट भट्टीवर किमान वेतन फलक देखील लावलेले नाहीत. 

याच्या निषेधार्थ शुक्रवार १२ जानेवारी २०२४ रोजी श्रमजीवी संघटनेच्या वतीने नाशिक, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील २०१९ पासून मुक्त झालेले वेठबिगारांना तहसिलदारांनी दिलेले मुक्तीचे दाखले मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन सर्व मुक्त वेठबिगार शासनाला परत करणार आहेत. वेठबिगारांचे पुनर्वसन करण्यास शासन कुचकामी ठरल्याने आम्हाला एखादा सावकार बघून देऊन पुन्हा आम्हाला वेठबिगारीच्या खाईत लोटावे अशी मागणी करणार असल्याची संतप्त पर्तीक्रिया संघटनेच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, श्रमजीवी संघटनेने आक्रमक पवित्र घेत, पुर्नवसन होत नाही, तो पर्यंत जाणार नाही असा वीतरा घेतला आहे. यावेळी आंदोलन कर्त्यांनी हातात व गळ्यात साखळी दंड घालून सरकारचा निषेध करीत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :thaneठाणे