शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पुर्नवसन होत नाही, तोपर्यंत जाणार नाही; श्रमजीवी संघटनेचा आक्रमक पवित्रा, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन 

By अजित मांडके | Updated: January 12, 2024 19:10 IST

ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील २०१९ पासून ५०० जणांना वेठबिगार मुक्तीचे दाखल दिले.

ठाणे: ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील २०१९ पासून ५०० जणांना वेठबिगार मुक्तीचे दाखल दिले. मात्र, त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आले नाही. त्याच्या निषेधार्थ व पुनर्वसन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शुक्रवारी आंदोलन पुकारले. यावेळी श्रमजीवी संघटनेने आक्रमक पवित्र घेत, पुर्नवसन होत नाही, तो पर्यंत जाणार नाही असा वीतरा घेतला आहे. तर, यावेळी आंदोलन कर्त्यांनी हातात व गळ्यात साखळी दंड घालून सरकारचा निषेध करीत असल्याचे दिसून आले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन सर्व मुक्त वेठबिगार त्यांचे वेठबिगार मुक्तीचे दाखले परत करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. 

ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील वेठ बिगारांचे शोध घेऊन त्यांना मुक्त करण्याची जबाबदारी कायद्याने शासनाची आहे. असे असताना, शासन विठबिगारांचा शोध घेऊन मुक्त करण्यात कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यात श्रमजीवी संघटनेच्या शोध मोहीमेतून नाशिक, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातून २५० मुक्त झालेल्या वेठबिगारांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यांना तातडीने मुक्ती नंतर तिन दिवसाच्या आत ३० हजार अर्थ सहाय्य मिळायला हवे होते. परंतू ते मिळालेले नाही. मुक्त वेठबिगारांना घरे मिळायला हवी होती ती ही मिळालेली नाहीत. त्यांच्या कायस्वरुपी पुनर्वसनासाठी जमीन, रोजगार, इत्यादी प्रकारची योजना द्यायला हवी होती ते ही दिलेले नाही. ज्या ज्या कातकरी बांधवांना घराखाली जागा नाही त्यांना चार गुंठे जागा द्या, स्थलांतरण थांबविण्याची मागणी देखील अद्यापही मान्य झालेली नाही. तसेच विट भट्टीवर किमान वेतन फलक देखील लावलेले नाहीत. 

याच्या निषेधार्थ शुक्रवार १२ जानेवारी २०२४ रोजी श्रमजीवी संघटनेच्या वतीने नाशिक, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील २०१९ पासून मुक्त झालेले वेठबिगारांना तहसिलदारांनी दिलेले मुक्तीचे दाखले मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन सर्व मुक्त वेठबिगार शासनाला परत करणार आहेत. वेठबिगारांचे पुनर्वसन करण्यास शासन कुचकामी ठरल्याने आम्हाला एखादा सावकार बघून देऊन पुन्हा आम्हाला वेठबिगारीच्या खाईत लोटावे अशी मागणी करणार असल्याची संतप्त पर्तीक्रिया संघटनेच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, श्रमजीवी संघटनेने आक्रमक पवित्र घेत, पुर्नवसन होत नाही, तो पर्यंत जाणार नाही असा वीतरा घेतला आहे. यावेळी आंदोलन कर्त्यांनी हातात व गळ्यात साखळी दंड घालून सरकारचा निषेध करीत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :thaneठाणे