शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

'मुख्यमंत्री अन् सरकारवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे'; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

By अजित मांडके | Updated: December 3, 2022 16:37 IST

'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानाचा शुभारंभ शनिवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

ठाणे : राज्यात होत असलेला विकास विरोधकांना पचत नसल्यानेच सरकारवर आणि माझ्यावर टीका टीका करण्याची स्पर्धा लागली असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे. विरोधकांना टीका करायची असेल तर त्यांनी टीका करत राहावी या सर्वाना विकासकामानेच उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई आणि ठाणे खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष अभियान घेण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानाचा शुभारंभ शनिवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. उद्योग बाहेर जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र एखादा मोठा उद्योग हा एका महिन्यात बाहेर जात नसतो मात्र सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची स्पर्धा लागली आहे कारण एकनाथ शिंदे हा पहाटे पर्यंत काम करतो म्हणून.  या आरोपांना मी कामाने उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आला काय गेला काय ही कोणाला चिंता नसते. मात्र नागरिकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. मी झोपतो कधी यांची चिंता विरोधकांनी करू नये असेही त्यांनी सांगितले. 

कॅबिनेटमध्ये सुरुवातीलाच फडणवीस आणि मी धाडसी निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आणि ते सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे असतील. सिंचनाच्या बंद पडलेल्या १६ योजना सुरु केल्या आहेत. उदयोग क्षेत्रात २० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे , त्यामुळेच राज्याचा विकास होत असल्याने त्यांना हा विकास पचत नसल्यानेच माझ्यावर टीका होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई आणि ठाणे खड्डेमुक्त करण्याचेही त्यांनी जाहीर केले.  धाडसी निर्णय घेणारा होतो म्हणून मोदी,शहा यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची संधी

मुख्यमंत्री कोण होईल याची उत्सुकता सर्वाना होती. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी मला संधी दिली मी  मी धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेणारा व्यक्ती होती हे त्यांनी ओळखले होते म्हणून. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे  सांगत बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.         

ठाण्यात येणाऱ्या आयुक्तांची  पुढची दलाने उघडी होतात

ठाणे महापालिका आयुक्त अभिजत बांगर यांनी नवी मुंबईत माझी अपेक्षा पूर्ण केली. म्हणून त्यांना ठाण्याची जबाबदारी दिली. तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना देखील राज्याच्या महत्वाचा उद्योग विभाग एमआयडीसी देण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यात जे आयुक्त म्ह्णून येतात त्यांची पुढची दालने उघडी होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार