शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

'मुख्यमंत्री अन् सरकारवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे'; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

By अजित मांडके | Updated: December 3, 2022 16:37 IST

'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानाचा शुभारंभ शनिवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

ठाणे : राज्यात होत असलेला विकास विरोधकांना पचत नसल्यानेच सरकारवर आणि माझ्यावर टीका टीका करण्याची स्पर्धा लागली असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे. विरोधकांना टीका करायची असेल तर त्यांनी टीका करत राहावी या सर्वाना विकासकामानेच उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई आणि ठाणे खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष अभियान घेण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानाचा शुभारंभ शनिवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. उद्योग बाहेर जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र एखादा मोठा उद्योग हा एका महिन्यात बाहेर जात नसतो मात्र सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची स्पर्धा लागली आहे कारण एकनाथ शिंदे हा पहाटे पर्यंत काम करतो म्हणून.  या आरोपांना मी कामाने उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आला काय गेला काय ही कोणाला चिंता नसते. मात्र नागरिकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. मी झोपतो कधी यांची चिंता विरोधकांनी करू नये असेही त्यांनी सांगितले. 

कॅबिनेटमध्ये सुरुवातीलाच फडणवीस आणि मी धाडसी निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आणि ते सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे असतील. सिंचनाच्या बंद पडलेल्या १६ योजना सुरु केल्या आहेत. उदयोग क्षेत्रात २० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे , त्यामुळेच राज्याचा विकास होत असल्याने त्यांना हा विकास पचत नसल्यानेच माझ्यावर टीका होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई आणि ठाणे खड्डेमुक्त करण्याचेही त्यांनी जाहीर केले.  धाडसी निर्णय घेणारा होतो म्हणून मोदी,शहा यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची संधी

मुख्यमंत्री कोण होईल याची उत्सुकता सर्वाना होती. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी मला संधी दिली मी  मी धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेणारा व्यक्ती होती हे त्यांनी ओळखले होते म्हणून. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे  सांगत बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.         

ठाण्यात येणाऱ्या आयुक्तांची  पुढची दलाने उघडी होतात

ठाणे महापालिका आयुक्त अभिजत बांगर यांनी नवी मुंबईत माझी अपेक्षा पूर्ण केली. म्हणून त्यांना ठाण्याची जबाबदारी दिली. तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना देखील राज्याच्या महत्वाचा उद्योग विभाग एमआयडीसी देण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यात जे आयुक्त म्ह्णून येतात त्यांची पुढची दालने उघडी होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार