शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

'मुख्यमंत्री अन् सरकारवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे'; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

By अजित मांडके | Updated: December 3, 2022 16:37 IST

'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानाचा शुभारंभ शनिवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

ठाणे : राज्यात होत असलेला विकास विरोधकांना पचत नसल्यानेच सरकारवर आणि माझ्यावर टीका टीका करण्याची स्पर्धा लागली असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे. विरोधकांना टीका करायची असेल तर त्यांनी टीका करत राहावी या सर्वाना विकासकामानेच उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई आणि ठाणे खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष अभियान घेण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानाचा शुभारंभ शनिवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. उद्योग बाहेर जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र एखादा मोठा उद्योग हा एका महिन्यात बाहेर जात नसतो मात्र सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची स्पर्धा लागली आहे कारण एकनाथ शिंदे हा पहाटे पर्यंत काम करतो म्हणून.  या आरोपांना मी कामाने उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आला काय गेला काय ही कोणाला चिंता नसते. मात्र नागरिकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. मी झोपतो कधी यांची चिंता विरोधकांनी करू नये असेही त्यांनी सांगितले. 

कॅबिनेटमध्ये सुरुवातीलाच फडणवीस आणि मी धाडसी निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आणि ते सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे असतील. सिंचनाच्या बंद पडलेल्या १६ योजना सुरु केल्या आहेत. उदयोग क्षेत्रात २० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे , त्यामुळेच राज्याचा विकास होत असल्याने त्यांना हा विकास पचत नसल्यानेच माझ्यावर टीका होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई आणि ठाणे खड्डेमुक्त करण्याचेही त्यांनी जाहीर केले.  धाडसी निर्णय घेणारा होतो म्हणून मोदी,शहा यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची संधी

मुख्यमंत्री कोण होईल याची उत्सुकता सर्वाना होती. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी मला संधी दिली मी  मी धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेणारा व्यक्ती होती हे त्यांनी ओळखले होते म्हणून. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे  सांगत बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.         

ठाण्यात येणाऱ्या आयुक्तांची  पुढची दलाने उघडी होतात

ठाणे महापालिका आयुक्त अभिजत बांगर यांनी नवी मुंबईत माझी अपेक्षा पूर्ण केली. म्हणून त्यांना ठाण्याची जबाबदारी दिली. तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना देखील राज्याच्या महत्वाचा उद्योग विभाग एमआयडीसी देण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यात जे आयुक्त म्ह्णून येतात त्यांची पुढची दालने उघडी होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार