शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भिवंडीत स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा; वऱ्हाळादेवी तलावावर साचले कचऱ्याचे ढीग

By नितीन पंडित | Updated: May 5, 2023 19:04 IST

भिवंडीत कचऱ्यांचे ढीग साठले आहेत.

भिवंडी: भिवंडीत स्वच्छ भारत अभियानाचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे चित्र शहरात ठीक ठिकाणी साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगांवरून पाहायला मिळत आहे. महापालिकेने स्वच्छ भारत अभियान २०२३ मध्ये भाग घेतला असून शहरात ठीक ठिकाणी पडीक भिंतींना रंग देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या भिंतीवर स्वच्छतेबाबतचे सुविचार काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सध्या महापालिका प्रशासन करत आहे. मात्र या रंगविलेल्या भिंतींच्या खालीच कचऱ्याचे ढिग साचले आहेत.

भिवंडी शहराला दोन एमएलडी पाणीपुरवठा करणाऱ्या वराळदेवी तलावाच्या बाजूला असलेल्या विसर्जन घाटाच्या परिसरात महापालिकेने स्वच्छ भारत अभियानाची माहिती देण्यासाठी माझी वसुंधरा व स्वच्छता अभियानाची माहिती देणारे भिंती रंगवले आहेत. या रंगविलेल्या भिंतींखालीच मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. स्वच्छतेकडे वाटचाल करणारे शहर म्हणून भिवंडी महापालिकेला मागील काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे मात्र पुरस्कार प्राप्त होऊनही आजही शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे.

मागील नऊ महिन्यांपासून भिवंडी महापालीकेत प्रशासकीय राजवट असून या प्रशासकीय राजवटीत शहरातील कचरा समस्या अधिक गंभीर झाली असल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ नागरिकांच्या कचरा समस्येकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. दुसरीकडे शहरात कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांवर मात्र कोट्यावधी रुपयांची उधळण मनपा प्रशासन करत आहे. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी