शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना लेखी उत्तरे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:40 IST

वर्षानुवर्षे टाळाटाळ : केडीएमसी प्रशासन धारेवर

कल्याण : केडीएमसीतील महासभेत नगरसेवक प्रशासनाला विचारत असलेल्या जनहिताच्या प्रश्नांची लेखी उत्तरे वर्षानुवर्षे मिळत नसल्याची बाब शुक्रवारच्या महासभेत उघडकीस आली. त्यामुळे नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

सभेच्या पटलावरील विषय पुकारण्याआधीच मी प्रशासनाचे अभिनंदन करते, असे उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी सांगितले. प्रशासनाने यापूर्वी नगरसेवकांच्या प्रश्नाला कधी वेळेवर उत्तरे दिलेली नाहीत. आज प्रथमच सभेतील बहुतांशी प्रश्नांना प्रशासनाने उत्तरे दिली आहेत. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करू द्या, अशी विनंती त्यांनी केली. प्रशासनाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाही, याकडे मनसेचे नगरसेवक पवन भोसले यांनी लक्ष वेधले. उत्तरे देण्यात अधिकाऱ्यांना कोणतेच स्वारस्य नसते. याचे कारण आयुक्त त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे त्यांना कारवाईचे भय नाही, असे ते म्हणाले.

शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे म्हणाले, ‘मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे उशिराने दिली जातात. अनेक प्रश्नांवर समर्थन दिले जात नाही. मनसे हा विरोधी पक्ष असला, तरी त्याचे अस्तित्वच नाही. परंतु, त्यांनी काही आव्हानात्मक प्रश्नांवर मला साथ द्यावी.’ त्यावर एखाद्या प्रश्नाचे उत्तर किती दिवसांत दिले पाहिजे, याला काही मर्यादा आहे का, असा सवालही नगरसेवकांनी केला. त्यावर उत्तर किती कालमर्यादेत द्यावे, असे नियमात नमूद नसल्याचे सचिव संजय जाधव यांनी सांगितले.

स्थायी समिती सभापती राहुल दामले म्हणाले, माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी नियमाप्रमाणे ३० दिवसांमध्ये माहिती देतात. मात्र, हीच माहिती न दिल्यास अर्जदार अपिलात जातो. त्याला तेथे माहिती मिळते. परंतु, नगरसेवकांना माहिती दिली जात नाही. विधिमंडळाकडून एखादी माहिती अथवा प्रश्न महापालिकेच्या संदर्भात उपस्थित झाला, तर त्याची माहिती अधिकारी रातोरात तयार करून त्याचे उत्तर पाठवतात. तेथे विधिमंडळात हक्कभंगाची कारवाई होईल, या भीतीपोटी अधिकारी लगेच माहिती देतात. या माहितीविषयी आयुक्तही आग्रही आणि गंभीर असतात. मात्र, नगरसेवकांनी विचारेल्या माहितीविषयी ही तत्परता दिसत नाही. एखाद्या प्रश्नाचे उत्तर किती कालमर्यादेत मिळावे, याची नियमावली हवी.’दरम्यान, त्यावर आयुक्तांनी याविषयी एक समिती नेमण्यात येईल. ही समिती एका महिन्यात कालमर्यादा ठरवण्याचे काम करेल, असे स्पष्ट केले.‘तर अधिकाऱयांवर कारवाई व्हावी’मागील व चालू टर्ममध्ये ५१ प्रश्नांपैकी केवळ २० प्रश्नांची उत्तरे दिली गेली आहेत. अद्याप ३१ प्रश्नांची उत्तरे देणे बाकी आहे.काही नगरसेवकांनी प्रश्न विचारला असला, तरी त्यांचे समाधान झाल्याचे त्यांनी कळवल्याने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलेली नाहीत, हा खुलासा सचिव जाधव यांनी केला.मात्र, हा नागरिकांचा जाहीरनामा आहे. त्यानुसार, किती दिवसांत कोणता अर्ज निकाली काढावा, असे त्यावर नमूद आहे. त्याचीही अंमलबजावणी होत नाही. नगरसेवकांना उत्तरे न देऊन त्यांचा अवमान करण्यात अधिकारी धन्यता मानतात. त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी केली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका