शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना लेखी उत्तरे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:40 IST

वर्षानुवर्षे टाळाटाळ : केडीएमसी प्रशासन धारेवर

कल्याण : केडीएमसीतील महासभेत नगरसेवक प्रशासनाला विचारत असलेल्या जनहिताच्या प्रश्नांची लेखी उत्तरे वर्षानुवर्षे मिळत नसल्याची बाब शुक्रवारच्या महासभेत उघडकीस आली. त्यामुळे नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

सभेच्या पटलावरील विषय पुकारण्याआधीच मी प्रशासनाचे अभिनंदन करते, असे उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी सांगितले. प्रशासनाने यापूर्वी नगरसेवकांच्या प्रश्नाला कधी वेळेवर उत्तरे दिलेली नाहीत. आज प्रथमच सभेतील बहुतांशी प्रश्नांना प्रशासनाने उत्तरे दिली आहेत. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करू द्या, अशी विनंती त्यांनी केली. प्रशासनाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाही, याकडे मनसेचे नगरसेवक पवन भोसले यांनी लक्ष वेधले. उत्तरे देण्यात अधिकाऱ्यांना कोणतेच स्वारस्य नसते. याचे कारण आयुक्त त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे त्यांना कारवाईचे भय नाही, असे ते म्हणाले.

शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे म्हणाले, ‘मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे उशिराने दिली जातात. अनेक प्रश्नांवर समर्थन दिले जात नाही. मनसे हा विरोधी पक्ष असला, तरी त्याचे अस्तित्वच नाही. परंतु, त्यांनी काही आव्हानात्मक प्रश्नांवर मला साथ द्यावी.’ त्यावर एखाद्या प्रश्नाचे उत्तर किती दिवसांत दिले पाहिजे, याला काही मर्यादा आहे का, असा सवालही नगरसेवकांनी केला. त्यावर उत्तर किती कालमर्यादेत द्यावे, असे नियमात नमूद नसल्याचे सचिव संजय जाधव यांनी सांगितले.

स्थायी समिती सभापती राहुल दामले म्हणाले, माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी नियमाप्रमाणे ३० दिवसांमध्ये माहिती देतात. मात्र, हीच माहिती न दिल्यास अर्जदार अपिलात जातो. त्याला तेथे माहिती मिळते. परंतु, नगरसेवकांना माहिती दिली जात नाही. विधिमंडळाकडून एखादी माहिती अथवा प्रश्न महापालिकेच्या संदर्भात उपस्थित झाला, तर त्याची माहिती अधिकारी रातोरात तयार करून त्याचे उत्तर पाठवतात. तेथे विधिमंडळात हक्कभंगाची कारवाई होईल, या भीतीपोटी अधिकारी लगेच माहिती देतात. या माहितीविषयी आयुक्तही आग्रही आणि गंभीर असतात. मात्र, नगरसेवकांनी विचारेल्या माहितीविषयी ही तत्परता दिसत नाही. एखाद्या प्रश्नाचे उत्तर किती कालमर्यादेत मिळावे, याची नियमावली हवी.’दरम्यान, त्यावर आयुक्तांनी याविषयी एक समिती नेमण्यात येईल. ही समिती एका महिन्यात कालमर्यादा ठरवण्याचे काम करेल, असे स्पष्ट केले.‘तर अधिकाऱयांवर कारवाई व्हावी’मागील व चालू टर्ममध्ये ५१ प्रश्नांपैकी केवळ २० प्रश्नांची उत्तरे दिली गेली आहेत. अद्याप ३१ प्रश्नांची उत्तरे देणे बाकी आहे.काही नगरसेवकांनी प्रश्न विचारला असला, तरी त्यांचे समाधान झाल्याचे त्यांनी कळवल्याने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलेली नाहीत, हा खुलासा सचिव जाधव यांनी केला.मात्र, हा नागरिकांचा जाहीरनामा आहे. त्यानुसार, किती दिवसांत कोणता अर्ज निकाली काढावा, असे त्यावर नमूद आहे. त्याचीही अंमलबजावणी होत नाही. नगरसेवकांना उत्तरे न देऊन त्यांचा अवमान करण्यात अधिकारी धन्यता मानतात. त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी केली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका