शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

कल्याण-कसारा मार्गावर वाढीव लोकलफेऱ्या नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:28 IST

अधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती : आजचे आंदोलन स्थगित

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील तिसºया रेल्वेमार्गिकेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असले, तरीही त्या मार्गाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तोपर्यंत त्या मार्गावर एकही नवी लोकलफेरी देता येणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण सहवाणिज्य अधिकारी रॉबिन कालिया यांनी गुरुवारी दिले. अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर उद्या (शुक्रवारी) करण्यात येणारे आंदोलन प्रवासी संघटनेने स्थगित केले.

कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन या प्रवासी संघटनेच्या पदाधिकाºयांसमवेत बुधवारी मुंबई रेल्वे अधिकाºयांची बैठक झाली. दि. १ मार्च रोजी करण्यात येणारे आंदोलन संघटनेने मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच त्यानिमित्ताने प्रवासी संघटनेने केलेल्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. परिचालन विभागाचे अधिकारी शिवाजी सुतार हेही उपस्थित होते. कल्याण-कसारा मार्गावर तांत्रिक मुद्यांमुळे अनेक कामे प्रलंबित आहेत. एमआरव्हीसीकडे त्या लाइनचे काम असून संघटनांनी त्यांच्याकडेही पाठपुरावा करावा, असे आवाहन सुतार यांनी केल्याचे संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र विशे यांनी सांगितले. संघटनेच्या सल्लागार अनिता झोपे, प्रसिद्धिप्रमुख शैलेश राऊत यांच्यासमवेत अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.

आसनगाव स्थानकातील जुन्या पादचारी पुलाची डागडुजी अलीकडेच करण्यात आली असली, तरी त्यात तांत्रिक चुका झाल्याकडे विशे यांनी लक्ष वेधले. त्यावर अधिकाºयांनी सांगितले की, पुलाच्या कामामध्ये काही चुका नाहीत, पण पूर्वेकडील भागामध्ये लँडिंगदरम्यान तांत्रिक अडचणी आल्या असून त्याची पूर्तता लवकरच करण्यात येणार आहे. तसेच स्थानकात मुंबई दिशेकडे आणखी एक नवा पादचारी पूल बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून त्यासंदर्भातही काही सूचना असतील, तर त्या सांगाव्यात. त्याचा विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

आसनगाव स्थानकातून कल्याण व मुंबईच्या दिशेने जाणाºया लोकलफेºयांच्या वेळा सुधाराव्यात, गर्दीच्यावेळी काही लोकलफेºया द्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली. त्यावर अभ्यास सुरू असून आगामी काळात गांभीर्याने विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले. लोकलची वेळ बदलण्यासंदर्भात प्रशासन सकारात्मक असून लवकरच बदल करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. याच मार्गावरील टिटवाळा, खडवली, आंबिवली, कसारा, खर्डी स्थानकांमधील प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातही चर्चा झाली. स्थानकांमधील पाणपोया, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही कॅमेºयांची गरज आदी बाबींवर चर्चा झाली. प्रवाशांनीही सतर्क राहावे, स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे व त्यासाठी प्रवासी संघटनेने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले. या चर्चेअंती शुक्रवारी करण्यात येणारे आंदोलन मागे घेण्यात आले.उंबरमाळी, तानशेत थांब्यांना स्थानकाचा दर्जा देण्यात आल्यानंतरही त्या स्थानकांमध्ये सोयीसुविधा मात्र देण्यात आलेल्या नाहीत. त्यातच एका रेल्वे तिकीट तपासनिसाचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झाला, ही गंभीर बाब असल्याचे प्रवासी संघटनेने निदर्शनास आणले. त्या ठिकाणची बहुतांश कामे मे २०१९ पर्यंत पूर्ण केली जातील, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केल्याचे विशे यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने ही कामे पूर्ण करावीत अन्यथा आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले. वरील दोन्ही स्थानकांवर तातडीने सुविधा द्याव्यात अशी मागणीही केली आहे.