शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

कल्याण-कसारा मार्गावर वाढीव लोकलफेऱ्या नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:28 IST

अधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती : आजचे आंदोलन स्थगित

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील तिसºया रेल्वेमार्गिकेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असले, तरीही त्या मार्गाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तोपर्यंत त्या मार्गावर एकही नवी लोकलफेरी देता येणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण सहवाणिज्य अधिकारी रॉबिन कालिया यांनी गुरुवारी दिले. अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर उद्या (शुक्रवारी) करण्यात येणारे आंदोलन प्रवासी संघटनेने स्थगित केले.

कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन या प्रवासी संघटनेच्या पदाधिकाºयांसमवेत बुधवारी मुंबई रेल्वे अधिकाºयांची बैठक झाली. दि. १ मार्च रोजी करण्यात येणारे आंदोलन संघटनेने मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच त्यानिमित्ताने प्रवासी संघटनेने केलेल्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. परिचालन विभागाचे अधिकारी शिवाजी सुतार हेही उपस्थित होते. कल्याण-कसारा मार्गावर तांत्रिक मुद्यांमुळे अनेक कामे प्रलंबित आहेत. एमआरव्हीसीकडे त्या लाइनचे काम असून संघटनांनी त्यांच्याकडेही पाठपुरावा करावा, असे आवाहन सुतार यांनी केल्याचे संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र विशे यांनी सांगितले. संघटनेच्या सल्लागार अनिता झोपे, प्रसिद्धिप्रमुख शैलेश राऊत यांच्यासमवेत अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.

आसनगाव स्थानकातील जुन्या पादचारी पुलाची डागडुजी अलीकडेच करण्यात आली असली, तरी त्यात तांत्रिक चुका झाल्याकडे विशे यांनी लक्ष वेधले. त्यावर अधिकाºयांनी सांगितले की, पुलाच्या कामामध्ये काही चुका नाहीत, पण पूर्वेकडील भागामध्ये लँडिंगदरम्यान तांत्रिक अडचणी आल्या असून त्याची पूर्तता लवकरच करण्यात येणार आहे. तसेच स्थानकात मुंबई दिशेकडे आणखी एक नवा पादचारी पूल बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून त्यासंदर्भातही काही सूचना असतील, तर त्या सांगाव्यात. त्याचा विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

आसनगाव स्थानकातून कल्याण व मुंबईच्या दिशेने जाणाºया लोकलफेºयांच्या वेळा सुधाराव्यात, गर्दीच्यावेळी काही लोकलफेºया द्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली. त्यावर अभ्यास सुरू असून आगामी काळात गांभीर्याने विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले. लोकलची वेळ बदलण्यासंदर्भात प्रशासन सकारात्मक असून लवकरच बदल करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. याच मार्गावरील टिटवाळा, खडवली, आंबिवली, कसारा, खर्डी स्थानकांमधील प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातही चर्चा झाली. स्थानकांमधील पाणपोया, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही कॅमेºयांची गरज आदी बाबींवर चर्चा झाली. प्रवाशांनीही सतर्क राहावे, स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे व त्यासाठी प्रवासी संघटनेने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले. या चर्चेअंती शुक्रवारी करण्यात येणारे आंदोलन मागे घेण्यात आले.उंबरमाळी, तानशेत थांब्यांना स्थानकाचा दर्जा देण्यात आल्यानंतरही त्या स्थानकांमध्ये सोयीसुविधा मात्र देण्यात आलेल्या नाहीत. त्यातच एका रेल्वे तिकीट तपासनिसाचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झाला, ही गंभीर बाब असल्याचे प्रवासी संघटनेने निदर्शनास आणले. त्या ठिकाणची बहुतांश कामे मे २०१९ पर्यंत पूर्ण केली जातील, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केल्याचे विशे यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने ही कामे पूर्ण करावीत अन्यथा आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले. वरील दोन्ही स्थानकांवर तातडीने सुविधा द्याव्यात अशी मागणीही केली आहे.