शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

मग भाजपाचा टेकू घेतलाच का?

By admin | Updated: October 30, 2015 23:55 IST

डाळींचे भाव वधारले, राज्यात दुष्काळासह गरीबीमुळे आत्महत्या होत आहेत. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची बोंब आहे. या सा-याला काय केवळ भाजप सरकार जबाबदार आहे का?

डोंबिवली : डाळींचे भाव वधारले, राज्यात दुष्काळासह गरीबीमुळे आत्महत्या होत आहेत. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची बोंब आहे. या सा-याला काय केवळ भाजप सरकार जबाबदार आहे का? असे असेल तर केंद्रात आणि राज्याच्या सत्तेत शिवसेनेची भूमिका काय? असा सवाल डोंबिवलीकरांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला आहे. नेहमीच टिका-टिपण्णी करायची आणि याला त्याला नावे ठेवायची ही या पक्षाची भूमिका आहे. जर गेली पाच वर्षे केडीमएसीत भाजपने केवळ बघ्याची भूमिका घेतली होती, शांत राहीले होते तर त्यांना वेळीच बाजूला का केले नाही. त्यांच्या टेकूचा आधार घेत सत्ता का उपभोगली? केवळ महापौर आणि स्टॅडींग-सत्तेच्या चाव्या हाताळता याव्यात यासाठीच का? असा सूरही नागरिकांमध्ये आहे.केडीएसमीत बरेच काही केले तरी अद्यापही कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या कायम का आहे? २४ तास पेयजल पुरविण्याची योजना कागदावरच का राहीली, पाण्याचे नियोजन का केले नाही, ३० टक्के पाणी कपात का लादण्यात आली, अद्यापही सुसज्ज पार्कींग स्टँड का नाही, महावितरणची वीज खंडीत समस्या कायम का आहे? पुरेशा स्वच्छतागृहांचा आभाव का आहे. अद्ययावत शैक्षणिक सुविधा का नाहीत. ज्या ग्रामीण भागाबाबत शिवसेना बोलत आहे त्या ठिकाणच्या ग्रामपंचायती-झेडपी सेनेकडेच होत्या तरीही तेथे आरोग्य, गृह, पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसह पायाभूत सुविधांची एैशीतैशी का आहे. शहरांतर्गत रस्ते अरुंद का आहेत. जेथे काँक्रीटीकरणाचे काम झाले ते अर्धवट का आहे, मानपाड्याच्या ठिकाणी रस्त्याला भेगा का पडल्या. शहरांमधील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत का चालला आहे? डम्पिग ग्राऊंडची समस्या का निर्माण झाली. हायकोर्टाने का ताशेरे ओढले. प्रदूषणाची समस्या जैसे थे किंबहुना त्याहून अधिक वाढलेली आहे. परिणामी नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. समांतर रस्ता भिजत घोंगडे, ठाकुर्ली उड्डाणपुल प्रश्न जैसे थे, भाजी मंडयांची दुरावस्था, मच्छीमार्केट अद्ययावत नाही. रिक्षा स्टँड (अधिकृत नाहीत), कायदा सुव्यस्था धाब्यावर, खाडी किनारे असुरक्षित, बेसुमार रेती उपसा, कल्याणातील एैतिहासीक वास्तुंची दुरावस्था, श्रीमलंग गडावरील समस्या जैसे थे, अद्ययावत रुग्णालयांचा आभाव, जे आहेत त्या शासकीय रुग्णालयांमध्ये प्रचंड गैरसोयी. रुग्णवाहीका जाण्यासाठी स्पीड झोन नाही. ग्रीन झोनचा आभाव, करमणुकीची साधने नाहीत. मनोरंजन दूरच राहीले. उद्याने-क्रिडांगणे नाहीत. धार्मिक स्थळांच्या पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे. ज्येष्ठांच्या समस्या वाढतच आहेत. महिला असुरक्षित दैनंदिन चेन स्रॅचिंगच्या प्रमाणात वाढ. यासह जीवन जगण्यासाठी किमा सुविधांचा आभाव असल्याने ही परीपुर्ण महापालिका आहे का? ज्यावर विशेषत्वाने शिवसेनेने अनेक वर्षे राज्य केले असे नानाविध सवाल कल्याण-डोंबिवलीकरांना आहेत. (प्रतिनिधी)