शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

मग भाजपाचा टेकू घेतलाच का?

By admin | Updated: October 30, 2015 23:55 IST

डाळींचे भाव वधारले, राज्यात दुष्काळासह गरीबीमुळे आत्महत्या होत आहेत. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची बोंब आहे. या सा-याला काय केवळ भाजप सरकार जबाबदार आहे का?

डोंबिवली : डाळींचे भाव वधारले, राज्यात दुष्काळासह गरीबीमुळे आत्महत्या होत आहेत. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची बोंब आहे. या सा-याला काय केवळ भाजप सरकार जबाबदार आहे का? असे असेल तर केंद्रात आणि राज्याच्या सत्तेत शिवसेनेची भूमिका काय? असा सवाल डोंबिवलीकरांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला आहे. नेहमीच टिका-टिपण्णी करायची आणि याला त्याला नावे ठेवायची ही या पक्षाची भूमिका आहे. जर गेली पाच वर्षे केडीमएसीत भाजपने केवळ बघ्याची भूमिका घेतली होती, शांत राहीले होते तर त्यांना वेळीच बाजूला का केले नाही. त्यांच्या टेकूचा आधार घेत सत्ता का उपभोगली? केवळ महापौर आणि स्टॅडींग-सत्तेच्या चाव्या हाताळता याव्यात यासाठीच का? असा सूरही नागरिकांमध्ये आहे.केडीएसमीत बरेच काही केले तरी अद्यापही कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या कायम का आहे? २४ तास पेयजल पुरविण्याची योजना कागदावरच का राहीली, पाण्याचे नियोजन का केले नाही, ३० टक्के पाणी कपात का लादण्यात आली, अद्यापही सुसज्ज पार्कींग स्टँड का नाही, महावितरणची वीज खंडीत समस्या कायम का आहे? पुरेशा स्वच्छतागृहांचा आभाव का आहे. अद्ययावत शैक्षणिक सुविधा का नाहीत. ज्या ग्रामीण भागाबाबत शिवसेना बोलत आहे त्या ठिकाणच्या ग्रामपंचायती-झेडपी सेनेकडेच होत्या तरीही तेथे आरोग्य, गृह, पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसह पायाभूत सुविधांची एैशीतैशी का आहे. शहरांतर्गत रस्ते अरुंद का आहेत. जेथे काँक्रीटीकरणाचे काम झाले ते अर्धवट का आहे, मानपाड्याच्या ठिकाणी रस्त्याला भेगा का पडल्या. शहरांमधील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत का चालला आहे? डम्पिग ग्राऊंडची समस्या का निर्माण झाली. हायकोर्टाने का ताशेरे ओढले. प्रदूषणाची समस्या जैसे थे किंबहुना त्याहून अधिक वाढलेली आहे. परिणामी नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. समांतर रस्ता भिजत घोंगडे, ठाकुर्ली उड्डाणपुल प्रश्न जैसे थे, भाजी मंडयांची दुरावस्था, मच्छीमार्केट अद्ययावत नाही. रिक्षा स्टँड (अधिकृत नाहीत), कायदा सुव्यस्था धाब्यावर, खाडी किनारे असुरक्षित, बेसुमार रेती उपसा, कल्याणातील एैतिहासीक वास्तुंची दुरावस्था, श्रीमलंग गडावरील समस्या जैसे थे, अद्ययावत रुग्णालयांचा आभाव, जे आहेत त्या शासकीय रुग्णालयांमध्ये प्रचंड गैरसोयी. रुग्णवाहीका जाण्यासाठी स्पीड झोन नाही. ग्रीन झोनचा आभाव, करमणुकीची साधने नाहीत. मनोरंजन दूरच राहीले. उद्याने-क्रिडांगणे नाहीत. धार्मिक स्थळांच्या पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे. ज्येष्ठांच्या समस्या वाढतच आहेत. महिला असुरक्षित दैनंदिन चेन स्रॅचिंगच्या प्रमाणात वाढ. यासह जीवन जगण्यासाठी किमा सुविधांचा आभाव असल्याने ही परीपुर्ण महापालिका आहे का? ज्यावर विशेषत्वाने शिवसेनेने अनेक वर्षे राज्य केले असे नानाविध सवाल कल्याण-डोंबिवलीकरांना आहेत. (प्रतिनिधी)