शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

..तर आम्हालाही आत्महत्या करण्याची वेळ येईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागण्याचे संकेत ...

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागण्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत व्यापारी आणि त्यावर अवलंबून असलेला नोकरदार वर्ग आधीच हवालदिल झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या लॉकडाऊनचे उभे राहिलेले संकट पाहता त्यांच्यापुढची चिंता अधिकच वाढली आहे. व्यापारी कमावतील तेव्हाच ते आम्हाला वेतन देऊ शकतील ना. त्यांचाच व्यवसाय बंद राहिला तर ते आम्हाला कसे वेतन देऊ शकतील. आधीच व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असताना दुसरा लॉकडाऊन लागला तर वेतनाअभावी उपासमारीला सामोरे जावे लागेल. परिणामी, शेतकऱ्यांप्रमाणे आम्हालाही आत्महत्या करावी लागेल, अशी भीती नोकरदार वर्ग व्यक्त करत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोणतीही आगाऊ पूर्वसूचना न देता लॉकडाऊन जाहीर झाल्याने परराज्यात राहणाऱ्या नोकरदारांचे स्थानिक पातळीवर माेठे हाल झाले. लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतूकही बंद झाल्याने पायपीट करत मजुरांना गावे गाठावी लागली. २२ मार्च ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चाललेला लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. ज्यांची दुकाने भाड्याने चालत होती त्यांचे भाडे थकले. हप्ते वाढल्याने व्यवसाय बंद करावे लागले. तर दुसरीकडे ज्यांच्या मालकीची दुकाने होती, त्यांना मालमत्ता कर आणि विजेची बिले भरताना नाकीनव आले. लॉकडाऊननंतरच्या अनलॉकमध्येही चालू झालेल्या व्यवसायांना नियमांचे बंधन कायम राहिल्याने सणासुदीत व्यवसायांवर परिणाम झाला. वर्षभर ही कसरत चालू असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसागणिक रुग्णांचे वाढते प्रमाण देशासाठी चिंतेची बाब ठरली आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे आठ ते पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे वीकेंड लॉकडाऊन लागू केला असताना आठवडाभर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. डोंबिवलीतील काही व्यापाऱ्यांनी या निर्णयाविरोधात घरातच उपोषणाचा मार्ग अवलंबून निषेध नोंदवला आहे. या एकूणच परिस्थितीमुळे व्यापारी हतबल झाले आहेत, तर नोकरदार लॉकडाऊनच्या भीतीने गावाकडे निघू लागला आहे.

नाेकरदार पुन्हा देशाेधडीला

काही व्यापाऱ्यांनी नोकरदारांना वाऱ्यावर साेडलेले नाही. व्यवसाय बंद असला तरी त्यांना वेतन देण्यात येत आहे, तर काही ठिकाणी भाडे परवडत नसल्याने व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे येथील नोकरदार देशोधडीला लागल्याचे चित्र आहे. वर्षभर तारेवरची कसरत सुरू असताना एकामागोमाग येत असलेल्या कोरोनाच्या लाटांमध्ये जीवन जगायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. राज्य सरकारनेच यामध्ये तोडगा काढून दिलासा द्यावा, याकडे लक्ष वेधले जात आहे.