शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

..तर आम्हालाही आत्महत्या करण्याची वेळ येईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागण्याचे संकेत ...

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागण्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत व्यापारी आणि त्यावर अवलंबून असलेला नोकरदार वर्ग आधीच हवालदिल झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या लॉकडाऊनचे उभे राहिलेले संकट पाहता त्यांच्यापुढची चिंता अधिकच वाढली आहे. व्यापारी कमावतील तेव्हाच ते आम्हाला वेतन देऊ शकतील ना. त्यांचाच व्यवसाय बंद राहिला तर ते आम्हाला कसे वेतन देऊ शकतील. आधीच व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असताना दुसरा लॉकडाऊन लागला तर वेतनाअभावी उपासमारीला सामोरे जावे लागेल. परिणामी, शेतकऱ्यांप्रमाणे आम्हालाही आत्महत्या करावी लागेल, अशी भीती नोकरदार वर्ग व्यक्त करत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोणतीही आगाऊ पूर्वसूचना न देता लॉकडाऊन जाहीर झाल्याने परराज्यात राहणाऱ्या नोकरदारांचे स्थानिक पातळीवर माेठे हाल झाले. लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतूकही बंद झाल्याने पायपीट करत मजुरांना गावे गाठावी लागली. २२ मार्च ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चाललेला लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. ज्यांची दुकाने भाड्याने चालत होती त्यांचे भाडे थकले. हप्ते वाढल्याने व्यवसाय बंद करावे लागले. तर दुसरीकडे ज्यांच्या मालकीची दुकाने होती, त्यांना मालमत्ता कर आणि विजेची बिले भरताना नाकीनव आले. लॉकडाऊननंतरच्या अनलॉकमध्येही चालू झालेल्या व्यवसायांना नियमांचे बंधन कायम राहिल्याने सणासुदीत व्यवसायांवर परिणाम झाला. वर्षभर ही कसरत चालू असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसागणिक रुग्णांचे वाढते प्रमाण देशासाठी चिंतेची बाब ठरली आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे आठ ते पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे वीकेंड लॉकडाऊन लागू केला असताना आठवडाभर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. डोंबिवलीतील काही व्यापाऱ्यांनी या निर्णयाविरोधात घरातच उपोषणाचा मार्ग अवलंबून निषेध नोंदवला आहे. या एकूणच परिस्थितीमुळे व्यापारी हतबल झाले आहेत, तर नोकरदार लॉकडाऊनच्या भीतीने गावाकडे निघू लागला आहे.

नाेकरदार पुन्हा देशाेधडीला

काही व्यापाऱ्यांनी नोकरदारांना वाऱ्यावर साेडलेले नाही. व्यवसाय बंद असला तरी त्यांना वेतन देण्यात येत आहे, तर काही ठिकाणी भाडे परवडत नसल्याने व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे येथील नोकरदार देशोधडीला लागल्याचे चित्र आहे. वर्षभर तारेवरची कसरत सुरू असताना एकामागोमाग येत असलेल्या कोरोनाच्या लाटांमध्ये जीवन जगायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. राज्य सरकारनेच यामध्ये तोडगा काढून दिलासा द्यावा, याकडे लक्ष वेधले जात आहे.