शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

..तर आम्हालाही आत्महत्या करण्याची वेळ येईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागण्याचे संकेत ...

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागण्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत व्यापारी आणि त्यावर अवलंबून असलेला नोकरदार वर्ग आधीच हवालदिल झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या लॉकडाऊनचे उभे राहिलेले संकट पाहता त्यांच्यापुढची चिंता अधिकच वाढली आहे. व्यापारी कमावतील तेव्हाच ते आम्हाला वेतन देऊ शकतील ना. त्यांचाच व्यवसाय बंद राहिला तर ते आम्हाला कसे वेतन देऊ शकतील. आधीच व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असताना दुसरा लॉकडाऊन लागला तर वेतनाअभावी उपासमारीला सामोरे जावे लागेल. परिणामी, शेतकऱ्यांप्रमाणे आम्हालाही आत्महत्या करावी लागेल, अशी भीती नोकरदार वर्ग व्यक्त करत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोणतीही आगाऊ पूर्वसूचना न देता लॉकडाऊन जाहीर झाल्याने परराज्यात राहणाऱ्या नोकरदारांचे स्थानिक पातळीवर माेठे हाल झाले. लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतूकही बंद झाल्याने पायपीट करत मजुरांना गावे गाठावी लागली. २२ मार्च ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चाललेला लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. ज्यांची दुकाने भाड्याने चालत होती त्यांचे भाडे थकले. हप्ते वाढल्याने व्यवसाय बंद करावे लागले. तर दुसरीकडे ज्यांच्या मालकीची दुकाने होती, त्यांना मालमत्ता कर आणि विजेची बिले भरताना नाकीनव आले. लॉकडाऊननंतरच्या अनलॉकमध्येही चालू झालेल्या व्यवसायांना नियमांचे बंधन कायम राहिल्याने सणासुदीत व्यवसायांवर परिणाम झाला. वर्षभर ही कसरत चालू असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसागणिक रुग्णांचे वाढते प्रमाण देशासाठी चिंतेची बाब ठरली आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे आठ ते पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे वीकेंड लॉकडाऊन लागू केला असताना आठवडाभर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. डोंबिवलीतील काही व्यापाऱ्यांनी या निर्णयाविरोधात घरातच उपोषणाचा मार्ग अवलंबून निषेध नोंदवला आहे. या एकूणच परिस्थितीमुळे व्यापारी हतबल झाले आहेत, तर नोकरदार लॉकडाऊनच्या भीतीने गावाकडे निघू लागला आहे.

नाेकरदार पुन्हा देशाेधडीला

काही व्यापाऱ्यांनी नोकरदारांना वाऱ्यावर साेडलेले नाही. व्यवसाय बंद असला तरी त्यांना वेतन देण्यात येत आहे, तर काही ठिकाणी भाडे परवडत नसल्याने व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे येथील नोकरदार देशोधडीला लागल्याचे चित्र आहे. वर्षभर तारेवरची कसरत सुरू असताना एकामागोमाग येत असलेल्या कोरोनाच्या लाटांमध्ये जीवन जगायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. राज्य सरकारनेच यामध्ये तोडगा काढून दिलासा द्यावा, याकडे लक्ष वेधले जात आहे.