शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

..तर महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता-अशोक समेळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 17:23 IST

माणसाने माणसाला क्षमा केली पाहिजे असे मला वाटते, असे झाले असते तर व्यासांनी लिहिलेल्या महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता

डोंबिवली- अश्र्वत्थामा हा एक आशावाद असतो. आदर्शवाद हा कधी कधी अजीर्ण होतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की ती गोष्ट विकृतीकडे वळते. तसाच अश्र्वत्थामा हा शेवटी विकृतीकडे वळला. मारणो व सूड घेणो ही वृत्ती नसावी. माणसाने माणसाला क्षमा केली पाहिजे असे मला वाटते, असे झाले असते तर व्यासांनी लिहिलेल्या महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता, असे मत लेखक अशोक समेळ यांनी व्यक्त केले.    चतुरंग प्रतिष्ठान प्रस्तुत मुक्तसंध्या या उपक्रमांतर्गत अश्र्वत्थामा या गाजलेल्या कादंबरीवर आधारीत ‘मी.अश्र्वत्थामा..चिरंजीव!’ अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी समेळ बोलत होते. हा कार्यक्रम सुयोग मंगल कार्यालयात रविवारी पार पडला. लेखक,दिग्दर्शक अभिनेता आणि निर्माता असलेले अशोक समेळ आणि संजीवनी समेळ यांनी अभिवाचन केले.     समेळ म्हणाले की, शिवाजी सावंत यांनी कल्पनेतून अश्र्वत्थामा रंगविला आहे कारण कादंबरी ही वाचनीय झाली पाहिजे. अश्र्वत्थामाचा प्रवास विलक्षण आहे. कादंबरी वाचल्यावर अश्र्वत्थामा काय आहे ते तुम्हाला समजेल. ही कादंबरी लिहीताना मी 21 वर्षे अभ्यास केला आहे. व्यासाचे 18 खंड, गाडगीळचा दस्तऐवज तसेच या विषयावर पीएचडी करणा:या स्नेहलता देशमुख यांचा प्रबंध या सगळ्य़ाचा अभ्यास केला आहे. त्यानंतर ही 700 पानांची कादंबरी लिहीली आहे. या कादंबरीत माङया कल्पनाशक्तीचा आविष्कार आहे. ही 5 हजार वर्षापूर्वीची कादंबरी आजचा वर्तमान, भाविष्य, आणि भूतकाळ वापरून ऑथेटिक करण्याचा प्रयत्न केला आहे. माङया पुस्तकांच्या पाच आवृत्ती निघाल्या आहेत. त्यांच्या प्रकाशनाला शास्त्रज्ञ डॉ. रघूनाथ माशेलकर आले होते. हे पुस्तक विज्ञानाशी संदर्भ जोडणारे आहे असे उद्गार त्यानी त्यावेळी काढले होते, असे ही त्यांनी सांगितले.    मी कधी लेखक होईन असे मला वाटले नव्हते. माङया डोक्यात क्रि केट होते. आता नवीन गुजराती नाटक येत आहे. नाटक लिहिणो हे सगळे पोटापाण्यासाठी करतो. पण ही पुस्तके वाचून प्रत्येकाला आनंद मिळावा, त्यांना त्यातून काहीतरी मिळावा हा उद्देश आहे. माङयाकडून हा ग्रंथ लिहून घेतले असल्याचे समेळ म्हणाले.    संजीवनी समेळ म्हणाल्या,  नाटक लिहीताना त्यांची पाठ दुखते अश्या तब्येतीच्या कुरकुर सुरू असतात. मात्र अश्र्वत्थामा ही कादंबरी लिहिताना ते सकाळी 9 ते रात्री 10 वाजेर्पयत बसत असत. तरीही त्यांच्या चेह:यावर उत्साह होता. अश्र्वत्थामा प्रत्यक्षात भेटला नसता तर हे शक्य झाले नसते असे मला वाटते.

टॅग्स :historyइतिहासdombivaliडोंबिवली