शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

...तर डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली छोटी राज्ये निर्माण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:43 IST

कल्याण: देशाच्या विकासासाठी छोटया छोटया राज्यांची निर्मिती झाली पाहीजे अशी संकल्पना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची होती. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात सत्तेवर आली तर आम्ही विदर्भ, मराठवाडासह कोकण आणि खानदेश अशा चार छोटया राज्यांची निर्मिती करू असे प्रतिपादन बसपा नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश साखरे यांनी रविवारी कल्याणात केले.छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत रोहीदास ...

ठळक मुद्देबसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांचे प्रतिपादन

कल्याण: देशाच्या विकासासाठी छोटया छोटया राज्यांची निर्मिती झाली पाहीजे अशी संकल्पना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची होती. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात सत्तेवर आली तर आम्ही विदर्भ, मराठवाडासह कोकण आणि खानदेश अशा चार छोटया राज्यांची निर्मिती करू असे प्रतिपादन बसपा नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश साखरे यांनी रविवारी कल्याणात केले.छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत रोहीदास महाराज, गाडगे महाराज आणि माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून कल्याणमधील गिरीजा सभागृहात बसपाच्या वतीने कल्याण व भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे संमेलन पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून साखरे उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर प्रदेश महाप्रभारी प्रा. नामदेव खंदारे, महासचिव प्रशांत इंगळे, प्रदेश सचिव दयानंद किरतकर, सुनिल खांबे आणि अशोक सिंग आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी साखरे पुढे म्हणाले. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले भाजप सरकार हे पुरते अपयशी ठरले आहे. सत्तेत येण्याआधी विदर्भ वेगळा करण्याची भाषा करणारी भाजपा सत्तेत आल्यावर गप्प का? असा सवाल त्यांनी केला. राज्यात शेतकरी कर्जबाजरी झाल्याने आत्महत्या करत असताना आता मंत्रालयातही आत्महत्या होताना दिसतात. भाजप सरकारने जनतेला दिलेली आश्वासन पूर्ण केलेली नाहीत. देशात भ्रष्टाचार होत असल्याचे कारण पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी नोटबंदी केली. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला मात्र भाजपाच्या नेत्यांवर नोटाबंदीचा काहीही परिमाण झाला नाही. भारत देशात सर्वात जास्त जीएसटी लागू केली आहे. नोटाबंदी ते जीएसटी या काळात महाराष्ट्रात खूप उद्योगधंदे बंद पडल्याने परिणामी बेरोजगारी वाढली. म्हणून हे सरकार पुर्णत: अपयशी ठरल्याचे साखरे म्हणाले. भाजप सरकार खोटे बोलते. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला ४ वर्षे झाली मात्र अद्याप नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रु पये जमा झाले नसल्याकडे साखरे यांनी लक्ष वेधले. आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात जिल्हानिहाय कार्यकर्ता मेळावा घेत असतो. आमचे संघटन विधानसभा क्षेत्रात मजबूत झाले आहे. महाराष्ट्रात भाईचारा कमीटी स्थापन करून सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन आम्ही राज्यात काम करणार आहोत. तसेच राज्यात ओबीसी मेळावे आणि परिषदा घेणार आहोत असेही साखरे म्हणाले. तर नविनर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांचे संघटन कौशल्य फार चांगले असल्याने आता आमचा विश्वास वाढला आहे. येणा-या निवडणुकीत बहुजन पार्टीचे विधानसभेत आणी लोकसभेत मोठया संख्येने सदस्य असतील असा विश्वास प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी