भराव टाकून वरसावे तलावाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:08 AM2019-06-21T00:08:10+5:302019-06-21T00:08:14+5:30

जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसात तक्रार; ग्रामस्थांत संताप; श्रमजीवीचीही कारवाईची मागणी

Theft of the pond by throwing water | भराव टाकून वरसावे तलावाची चोरी

भराव टाकून वरसावे तलावाची चोरी

Next

ठाणे : घोडबंदर रोडला लागून असलेल्या वरसावे गावातील सार्वजनिक तलावात अवैधरीत्या विकासकाकडून मातीचा भराव करून तो नष्ट करण्यात येत आहे. भूखंड हडप करण्याच्या उद्देशाने तो नष्ट केला जात असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी सार्वजनिक तलाव चोरीस गेल्याची लेखी तक्रारदेखील काशिमीरा पोलिसांत दाखल केली. याबाबत श्रमजीवी संघटनेनेही जिल्हाधिकाºयांना साकडे घालून या तलावाकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रित करून कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.

वरसावे गावकºयांसाठी हा सार्वजनिक तलाव वर्षानुवर्षांपासून उपयुक्त ठरत आहे. गावकºयांचा हक्क असलेल्या या तलावाची जागा हडपण्यासाठी त्यात अवैधरीत्या मातीचा भराव घालून तो बुजवण्यात येत आहे. वरसावेकºयांचा हक्क असलेल्या या तलावाची नोंद सातबारा उताºयावरदेखील आहे. या सार्वजनिक तलावाचा हक्क वरसावे गावकºयांकडे असतानाही त्यात मातीचा भराव टाकून बुजवण्यात आला आहे, असे ज्येष्ठ नागरिक रवींद्र गायकर या गावकºयाने काशिमीरा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर श्रमजीवी संघटनेनेदेखील जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करून वरसावे गावकºयांचा सार्वजनिक तलाव नष्ट केल्याचे नमूद केले आहे. यासाठी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष अशोक सापटे, सरचिटणीस बाळाराम भोईर, उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर यांनी जिल्हाधिकाºयांना लेखी तक्रार देऊन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

कठोर कारवाई करा
हा जुना सार्वजनिक तलाव नष्ट करणाºया विकासकाचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करावी. याशिवाय, अवैधरीत्या टाकलेला भराव पूर्णपणे काढून हा सार्वजनिक तलाव मोकळा करता यावा, त्याची लांबी-रुंदी-खोली वाढवण्यात यावी आदी मागण्यांसाठी श्रमजीवीने जिल्हाधिकाºयांना साकडे घालून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

तर, चोरीला गेलेल्या या तलावाचा शोध घेण्यासाठी पोलिसात लेखी तक्रार केली आहे. यानुसार, नैसर्गिक तलाव कायद्यानुसार बुजवणे गंभीर गुन्हा असतानाही जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा या तलावास नष्ट करणाºया विकासकावर काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून असल्याचे श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी लोकमतला सांगितले.

तलावावर गावकºयांचा उदरनिर्वाह : वरसावे गावामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पारंपरिक पद्धतीने येथील आदिवासी समाज या तलावात परंपरेनुसार मासेमारी करून उदरनिर्वाह करतो. पिण्याच्या पाण्यासाठी त्यातील पाण्याचा वापर केला जातो. त्यावर शेतीचे उत्पादनदेखील घेतले जात आहे. त्याचा भूखंड हडप करण्यासाठी काही राजकारणी व बड्या नेत्यांच्या कृपाशीर्वादाखाली विकासकाकडून त्यात अवैध मातीचा भराव टाकल्याचा आरोप गावकºयांकडून केला जात आहे.

Web Title: Theft of the pond by throwing water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.