शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या रेल्वे पुलावरून खाडीत पडलेली तरुणी तब्बल ७ तासांनी चौक जेट्टी जवळ सापडली 

By धीरज परब | Updated: August 8, 2022 22:57 IST

Bhayander : भाईंदरच्या रेल्वे पुलावरून  सायंकाळी खाडीत पडलेली तरुणी तब्बल ७ तासांनी चौक जेट्टी जवळील खाडी किनारी नांगरलेल्या बोटी जवळ सापडली.

- धीरज परब मीरारोड - भाईंदरच्या रेल्वे पुलावरून  सायंकाळी खाडीत पडलेली तरुणी तब्बल ७ तासांनी चौक जेट्टी जवळील खाडी किनारी नांगरलेल्या बोटी जवळ सापडली . दलदलीच्या ठिकाणी पहाटे २ च्या सुमारास महिलेचा आवाज ऐकून आधी बोटी वरील मच्छिमारांची बोबडीच वळली . परंतु नंतर ती महिला असल्याची खात्री पटल्यावर तिला बोटीत घेऊन नंतर किनाऱ्यावर आणले . 

भाईंदर खाडी वरील रेल्वे पुलावर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस व रेल्वे सुरक्षा बल कडून कमालीचे दुर्लक्ष केले जात असल्याने पुला वरून खाडीत आत्महत्या करण्याच्या व पुलावर गेले असताना खाली पडण्याच्या घटना वाढत आहेत .  काही दिवसां पूर्वीच खाडी पुला वरून खाडीत पडलेल्या एका अल्पवयीन मुलीला वाचवण्यात आले होते . तोच रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास पुला वरून रंजना विश्वकर्मा रा . संतोष भुवन , नालासोपारा हि तरुणी पुला वरून खाडीत पडली . त्यावेळी स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने नवघर पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती सापडली नाही . 

दरम्यान वादळी वारे व मुसळधार पाऊस असल्याने उत्तन - चौक भागातील मच्छीमार बोटी किनाऱ्याला आल्या असून चौक जेट्टी जवळील खाडी किनारी नांगरण्यात आल्या आहेत . हा भाग अतिशय निर्जन व दलदलीचा असून येथे कोणी चालत सुद्धा जाऊ शकत नाही . चौक जेट्टी वर जायचेच झाले तर लहान बोटीनेच ये - जा करावी लागते . हॉली स्काय बोटीचे मालक ऑलिव्हर बांड्या  व अन्य मच्छिमार , खलाशी हे बोटीवरचा झोपले असताना  रविवारी पहाटे २ च्या सुमारास अचानक एका महिलेचा आवाज येऊ लागला . आवाजाने मच्छीमार उठले व खरंच महिलेचा आवाज येतोय का ? अशी एकमेकास विचारणा करू लागले . आवाज महिलेचा असल्याची खात्री होताच आजूबाजूला लाईट पाहणी केली असता त्यांच्या लहान बोटीतून खरंच हाक मारणारी महिला दिसली . आधी तर सर्वांची भुताटकी वाटून बोबडीच वळली . 

पण नंतर धीर धरून त्या महिलेस विचारणा करत तिचे फोटो व छायाचित्रण करून मच्छिमार नेते बर्नड डिमेलो याना पाठवले . त्यांनी उत्तन सागरी पोलिसांना कळवले . मच्छीमारांनी महिलेस चहा दिला व कपडे दिले . भरती आल्यावर लहान बोटीने तिला  जेट्टीवर आणून उत्तन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले . पोलिसांनी नंतर त्या महिलेचा प्राथमिक जबाब घेऊन नवघर पोलिसां कडे सोपवले . पोलिसांनी तिला तिच्या परिचितां कडे सुपूर्द केले असून खाडीत पडल्या नंतर ती पाण्याच्या प्रवाहात वाहत नंतर खाडी किनाऱ्याच्या चिखलात अडकली . मच्छिमारांच्या बोटी वरील विजेचे दिवे पाहून ती चिखल तुडवत कशीबशी तिथे पोहचली असे सांगण्यात आले . तिचा भाऊ काही महिन्या पूर्वी खाडी पुलावरून पडून मरण पावल्याने ती मैत्रिणीसह पुलावर आली होती .  

टॅग्स :bhayandarभाइंदर