शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बोरीवली-ठाणे बोगदा रस्ता प्रकल्पाचा मार्ग मोकळा; कंत्राटाविरोधातील जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:03 IST

या प्रकल्पाचे कंत्राट मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडला(एमईआयएल) दिले आहे. त्याला हैदराबाद येथील पत्रकार व्ही. रवी प्रकाश याने आव्हान दिले होते.  

मुंबई : बोरीवली-ठाणे बोगदा रस्ता प्रकल्पाच्या कंत्राटाविरोधात एका पत्रकाराने दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. संबंधित याचिकादाराने स्वच्छ मनाने याचिका दाखल केलेली नाही, शिवाय त्याने न्यायालयावरही अवमानकारक टिप्पण्या केल्या आहेत, असेही न्यायालयाने नमूद केले. या प्रकल्पाचे कंत्राट मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडला(एमईआयएल) दिले आहे. त्याला हैदराबाद येथील पत्रकार व्ही. रवी प्रकाश याने आव्हान दिले होते.  

‘एमईआयएल’ या कंत्राटदार कंपनीने सादर केलेल्या बँक हमीमध्ये गैरप्रकार झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे एमईआयएलला दिलेले १६,६००.४० कोटी रुपयांचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश एमएमआरडीएला द्यावेत आणि या कथित गैरप्रकाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. 

स्वच्छ मनाने आले पाहिजे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याची कानउघाडणी केली. न्यायालयात दाद मागणाऱ्या व्यक्तीने स्वच्छ हातांनीच नव्हे, तर स्वच्छ हृदय, स्वच्छ मनाने, चांगल्या उद्देशाने न्यायालयात आले पाहिजे. याचिकाकर्त्याने त्याच्या आणि कंत्राटदारामधील  प्रकरणाची माहिती  दिली नाही. न्यायालयाची बदनामी करणाऱ्या टिप्पण्या करणे याबद्दल याचिकाकर्ता दोषी ठरतो. त्यामुळे गुणवत्तेच्या निकषावर ही याचिका फेटाळली, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

समाज माध्यमांवर न्यायसंस्थेचा अवमानन्यायसंस्थेविरुद्धच्या पोस्टमुळे याचिकादाराने न्यायालयाची बदनामी केली आहे. हा प्रकार निःसंशयपणे अवमानकारक आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. तथापि, काही पोस्टस त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवल्या. म्हणून आम्ही त्यांच्याविरुद्ध कोणतीही अवमान कारवाई करीत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणे