शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बोरीवली-ठाणे बोगदा रस्ता प्रकल्पाचा मार्ग मोकळा; कंत्राटाविरोधातील जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:03 IST

या प्रकल्पाचे कंत्राट मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडला(एमईआयएल) दिले आहे. त्याला हैदराबाद येथील पत्रकार व्ही. रवी प्रकाश याने आव्हान दिले होते.  

मुंबई : बोरीवली-ठाणे बोगदा रस्ता प्रकल्पाच्या कंत्राटाविरोधात एका पत्रकाराने दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. संबंधित याचिकादाराने स्वच्छ मनाने याचिका दाखल केलेली नाही, शिवाय त्याने न्यायालयावरही अवमानकारक टिप्पण्या केल्या आहेत, असेही न्यायालयाने नमूद केले. या प्रकल्पाचे कंत्राट मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडला(एमईआयएल) दिले आहे. त्याला हैदराबाद येथील पत्रकार व्ही. रवी प्रकाश याने आव्हान दिले होते.  

‘एमईआयएल’ या कंत्राटदार कंपनीने सादर केलेल्या बँक हमीमध्ये गैरप्रकार झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे एमईआयएलला दिलेले १६,६००.४० कोटी रुपयांचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश एमएमआरडीएला द्यावेत आणि या कथित गैरप्रकाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. 

स्वच्छ मनाने आले पाहिजे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याची कानउघाडणी केली. न्यायालयात दाद मागणाऱ्या व्यक्तीने स्वच्छ हातांनीच नव्हे, तर स्वच्छ हृदय, स्वच्छ मनाने, चांगल्या उद्देशाने न्यायालयात आले पाहिजे. याचिकाकर्त्याने त्याच्या आणि कंत्राटदारामधील  प्रकरणाची माहिती  दिली नाही. न्यायालयाची बदनामी करणाऱ्या टिप्पण्या करणे याबद्दल याचिकाकर्ता दोषी ठरतो. त्यामुळे गुणवत्तेच्या निकषावर ही याचिका फेटाळली, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

समाज माध्यमांवर न्यायसंस्थेचा अवमानन्यायसंस्थेविरुद्धच्या पोस्टमुळे याचिकादाराने न्यायालयाची बदनामी केली आहे. हा प्रकार निःसंशयपणे अवमानकारक आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. तथापि, काही पोस्टस त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवल्या. म्हणून आम्ही त्यांच्याविरुद्ध कोणतीही अवमान कारवाई करीत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणे