शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव; एकनाथ शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टिका

By अजित मांडके | Updated: January 11, 2024 15:34 IST

शिवसेना खरी ही आमची असल्याचेही हे स्पष्ट झाले असून बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची असल्यावरही शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे : लोकशाही मध्ये मेरीटला महत्व असते. लोकसभेत, विधानसभेत आणि पक्ष संघटना बांधणीतही आमचे बहुमत असल्याचे स्पष्ट झाल्यानेच अध्यक्षांनी दिलेला निकाल हा लोकशाहीचा विजय असून घराणेशाहीचा पराभव असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली. तसेच शिवसेना खरी ही आमची असल्याचेही हे स्पष्ट झाले असून बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची असल्यावरही शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना कुणाची याबाबत दिलेल्या निकालानंतर गुरुवारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर सडतोड टिका केली. निकालामुळे आमच्याकडे बहुमत असल्याचे सिध्द झाले असून विरोधकांनी ही चपराक बसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता पक्ष चालवितांना मी पक्षाचा मालक असल्याची मनमानी आता कोणालाही करता येणार नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

लोकशाही निवडणुक एकाबरोबर लढवायची आणि निवडणुकीनंतर दुसºयाबरोबर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार स्थापन केले.  बाळासाहेबांनी कॉंग्रेसला नेहमी विरोध केला. मात्र त्यांनी कॉंग्रेसला डोक्यावर बसविले, त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले. बाळासाहेबांच्या विचार केवळ एका खुर्चीसाठी सोडले त्यांना हा निकाल एक ही मोठी चपराक असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे.

भरत गोगवले आमचे प्रतोद आहेत, त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उबाठा गटाकडे संघटनात्मक बहुमत आहे, अशा प्रकारचा कोणताही पुरावे ते देऊ शकले नाहीत. त्यात गोगावले यांनी उबाठा गटाचे आमदार अपात्र करावे ही याचिका अध्यक्षांकडे केली होती. मात्र ती का फेटाळण्यात याची कारणे आम्हाला माहित नाही. विरोधी आमदारांच्या अपात्रेबाबत आम्ही कायदेतज्ञांबरोबर चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. निकालनंतर अध्यक्षांबाबत केलेले भाष्य हे अतिशय खालच्या पातळीवरील होते.

सर्वोच्य न्यायालयाला देखील सल्ला देण्याचे काम या मंडळींनी केले. मात्र आता स्वत:च मालक म्हणून काहीही निर्णय घेता येणार नाही, एकाधिकारशाही, घराणेशाहीला आलेला निर्णय हा चपराक असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सर्व घटनेनुसार चालत होते, मात्र त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मनमानी कारभार करुन स्वत:च्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडविण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मागितले होते. मात्र उध्दव ठाकरे यांनी स्वत:चे नाव दिले यावरुन कळायला हवे त्यांनी काय पाहिजे ते असेही ते म्हणाले. शिवसेनेच्या खात्यातील पैसे मागण्याचे पापही देखील त्यांनी केला असेही ते म्हणाले. एकूणच आलेला निकाल हा एक प्रकारचा माईलस्टोन असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे