शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव; एकनाथ शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टिका

By अजित मांडके | Updated: January 11, 2024 15:34 IST

शिवसेना खरी ही आमची असल्याचेही हे स्पष्ट झाले असून बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची असल्यावरही शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे : लोकशाही मध्ये मेरीटला महत्व असते. लोकसभेत, विधानसभेत आणि पक्ष संघटना बांधणीतही आमचे बहुमत असल्याचे स्पष्ट झाल्यानेच अध्यक्षांनी दिलेला निकाल हा लोकशाहीचा विजय असून घराणेशाहीचा पराभव असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली. तसेच शिवसेना खरी ही आमची असल्याचेही हे स्पष्ट झाले असून बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची असल्यावरही शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना कुणाची याबाबत दिलेल्या निकालानंतर गुरुवारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर सडतोड टिका केली. निकालामुळे आमच्याकडे बहुमत असल्याचे सिध्द झाले असून विरोधकांनी ही चपराक बसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता पक्ष चालवितांना मी पक्षाचा मालक असल्याची मनमानी आता कोणालाही करता येणार नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

लोकशाही निवडणुक एकाबरोबर लढवायची आणि निवडणुकीनंतर दुसºयाबरोबर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार स्थापन केले.  बाळासाहेबांनी कॉंग्रेसला नेहमी विरोध केला. मात्र त्यांनी कॉंग्रेसला डोक्यावर बसविले, त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले. बाळासाहेबांच्या विचार केवळ एका खुर्चीसाठी सोडले त्यांना हा निकाल एक ही मोठी चपराक असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे.

भरत गोगवले आमचे प्रतोद आहेत, त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उबाठा गटाकडे संघटनात्मक बहुमत आहे, अशा प्रकारचा कोणताही पुरावे ते देऊ शकले नाहीत. त्यात गोगावले यांनी उबाठा गटाचे आमदार अपात्र करावे ही याचिका अध्यक्षांकडे केली होती. मात्र ती का फेटाळण्यात याची कारणे आम्हाला माहित नाही. विरोधी आमदारांच्या अपात्रेबाबत आम्ही कायदेतज्ञांबरोबर चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. निकालनंतर अध्यक्षांबाबत केलेले भाष्य हे अतिशय खालच्या पातळीवरील होते.

सर्वोच्य न्यायालयाला देखील सल्ला देण्याचे काम या मंडळींनी केले. मात्र आता स्वत:च मालक म्हणून काहीही निर्णय घेता येणार नाही, एकाधिकारशाही, घराणेशाहीला आलेला निर्णय हा चपराक असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सर्व घटनेनुसार चालत होते, मात्र त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मनमानी कारभार करुन स्वत:च्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडविण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मागितले होते. मात्र उध्दव ठाकरे यांनी स्वत:चे नाव दिले यावरुन कळायला हवे त्यांनी काय पाहिजे ते असेही ते म्हणाले. शिवसेनेच्या खात्यातील पैसे मागण्याचे पापही देखील त्यांनी केला असेही ते म्हणाले. एकूणच आलेला निकाल हा एक प्रकारचा माईलस्टोन असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे