शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याचं तापमान वाढलं, पारा ४४.१ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 18:51 IST

हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही १४ ते १६ मार्च या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तविला होता.

ठाणे- गेल्या आठ दिवसांपासून सूर्यनारायण ठाण्यात अक्षरशः आग ओकताना दिस आहे. बुधवारी पुन्हा ठाण्याच्या तापमानाने ४४.१ अंश सेल्सिअसचा आकडा गाठला. हे तापमान पालघर आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यापेक्षा अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकंदरीत ठाण्यात साधारणपणे ३० अंशांपर्यंत तापमान दरवर्षी असते, मात्र यंदा तापमान प्रचंड वाढल्याने ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी बाहेर फिरण्यापेक्षा ऑफिस आणि घरात राहाणे नागरिकांकडून पसंत केले जात आहे. होळीच्या दिवशीही ठाणे शहराचे तापमान आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच ४५.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.

हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही १४ ते १६ मार्च या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार ठाण्याचा पारा  ३५ अंशाच्या पुढे जाऊ लागला. तो आकडा आता जवळपास ४० अंशाच्या आसपास किंवा त्याच्याही पुढे जाताना वारंवार दिसून येत आहे. हवामान खात्याने म्हटल्या प्रमाणे १६ मार्च ठाण्याचे तापमान हे ४४ अंशावर पोहोचले होते. त्यानंतर ते तापमान कमी होईल, असे वाटत असतानाच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी हे तापमान ४५.६ अंशावर गेले होते. हे आतापर्यंत ठाण्यातील सर्वाधिक तापमान असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. 

या तापमानाची तुलना विदर्भाशी केली गेली. १९ ते २२ मार्च दरम्यानचे तापमान ३५ ते ४० च्या आसपास होते. मात्र त्यातच बुधवारी अचानक तापमान ४४.१ अंशावर गेल्याचे पाहायला मिळाले. ठाणेकर नागरिकांना हा वाढता उकाडा नकोसा झाला आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत नसल्याने आणि अंगाला चटके लागत असल्याने ऑफिस आणि घरात पंख्याखाली किंवा एसीमध्ये बसने नागरिक पसंत करत आहेत. हे तापमान असेच राहिल्यास एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत जीव नकोसा होईल, अशी भीतीही ठाणेकर नागरिकांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे. 

 

टॅग्स :Temperatureतापमानthaneठाणे