शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

भिवंडी मनपात होणार कर्मचाऱ्यांची भरती; २५४ पदे भरण्यास राज्य शासनाची मंजुरी

By नितीन पंडित | Updated: December 1, 2022 18:10 IST

 भिवंडी मनपात २५४ पदे भरण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. 

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत २५४ पदांच्या भरतीसाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दिला असून लवकरच या पदांची भरती महापालिकेत होणार आहे. राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने बुधवारी त्या संदर्भातील अध्यादेश जारी केला असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.या भरतीमुळे मनपा अस्थापनांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होणार असून तब्बल १५ ते १७ वर्षानंतर राज्य शासनाने मनपात भरती संदर्भातील निर्णय घेतला असल्याने पालिका आस्थापनात आनंद व उत्सवाचे वातावरण पसरले आहे.

भिवंडी मनपा आस्थापनेवर ४३६३ पदे मंजूर असल्याचा मनपा प्रशासनाने शासना दिला होता.या भरती संदर्भात आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता.भिवंडी महानगरपालिकेची स्थापना दिनांक १६ डिसेंम्बर २००१ रोजी झाली असून महानगरपालिका ही ड वर्ग गटात मोडते. महानगरपालिकेचे ५ प्रभाग समिती असून सन- २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ७ लाख ९ हजार ६६५ इतकी असली तरी आजमितीस शहरातील लोकसंख्येने दहा लाखांचा आकडा पार केला आहे.सन २००५ मध्ये मनपात कर्मचारी भरती करण्यात आली होती मात्र तेव्हापासून आतापर्यंत सुमारे १५ ते १७ वर्ष पालिकेत भरती नसल्याने मनपा आस्थापनेसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडला होता. 

भिवंडी महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नवीन पदे निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती मात्र तिचा योग्य तसा पाठ पुरावा होत नव्हता आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हि मागणी लावून धरली असल्याने मुख्यमंत्र्यांनी आपली मागणी मान्य केली त्यामुळे मनपा आस्थापनेवरील ताण निश्चितच कमी होणार आहे त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानतो अशी प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीState Governmentराज्य सरकारjobनोकरी