शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

अंबरनाथच्या पाणीटंचाईबाबत शिवसेनाही मैदानात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिलं निवेदन

By पंकज पाटील | Updated: May 15, 2023 17:29 IST

शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले आहे.

अंबरनाथ - अंबरनाथ शहराचा  पश्चिम भाग गेल्या काही वर्षांपासून तहानलेला असून त्या भागाचा पाणीपुरवठा तर सुरळीत करा. पण पूर्ण शहराला जाणवणारी पाणीटंचाई त्वरित दूर करा अशी मागणी करत आज शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले आहे.

अंबरनाथच्या पूर्व आणि  पश्चिम भागाला जाणवणाऱ्या अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्यात सुधारणा करावी या मागणीसाठी शहरप्रमुख वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयावर धडक देऊन पाणी टंचाईचा जाब विचारला. कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगर यांची भेट घेऊन पाणीबाणी संपुष्टात आणण्याची मागणी त्यांनी केली. 

अंबरनाथ शहरातील पाणी समस्येबाबत वारंवार सांगूनही ठोस कारवाई केली जात नाही, मोर्चे, आंदोलने, इशारे दिले की तेवढ्यापुरती त्या भागातील पाणी समस्या दूर केली जाते, आता उडवाउडवीची उत्तरे देऊ नका ती ऐकून घेणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. पाणी पुरवठा कमी होत असून त्यामध्ये वाढ करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहेत. मात्र वाढीव पाणी देण्यास एमआयडिसीने नकार दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.     

पश्चिमेकडील बालाजी नगर , मुरलीधर मंदिर, खामकर वाडी, आदी भागात  रात्री , मध्यरात्री अनियमित पाणी पुरवठा होतो.येत्या काही दिवसांत पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईलने  आंदोलनाचा इशारा यावेळी  शहरप्रमुख वाळेकर यांनी दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, तसेच राजेश शिर्के, संभाजी कळमकर, पद्माकर दिघे. मिलिंद गान, नरेश मोरे., संजय गावडे, किशोर सोरखाते, सुप्रिया मालुसरे  आदींचा उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणीambernathअंबरनाथ