शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अंबरनाथच्या पाणीटंचाईबाबत शिवसेनाही मैदानात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिलं निवेदन

By पंकज पाटील | Updated: May 15, 2023 17:29 IST

शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले आहे.

अंबरनाथ - अंबरनाथ शहराचा  पश्चिम भाग गेल्या काही वर्षांपासून तहानलेला असून त्या भागाचा पाणीपुरवठा तर सुरळीत करा. पण पूर्ण शहराला जाणवणारी पाणीटंचाई त्वरित दूर करा अशी मागणी करत आज शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले आहे.

अंबरनाथच्या पूर्व आणि  पश्चिम भागाला जाणवणाऱ्या अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्यात सुधारणा करावी या मागणीसाठी शहरप्रमुख वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयावर धडक देऊन पाणी टंचाईचा जाब विचारला. कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगर यांची भेट घेऊन पाणीबाणी संपुष्टात आणण्याची मागणी त्यांनी केली. 

अंबरनाथ शहरातील पाणी समस्येबाबत वारंवार सांगूनही ठोस कारवाई केली जात नाही, मोर्चे, आंदोलने, इशारे दिले की तेवढ्यापुरती त्या भागातील पाणी समस्या दूर केली जाते, आता उडवाउडवीची उत्तरे देऊ नका ती ऐकून घेणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. पाणी पुरवठा कमी होत असून त्यामध्ये वाढ करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहेत. मात्र वाढीव पाणी देण्यास एमआयडिसीने नकार दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.     

पश्चिमेकडील बालाजी नगर , मुरलीधर मंदिर, खामकर वाडी, आदी भागात  रात्री , मध्यरात्री अनियमित पाणी पुरवठा होतो.येत्या काही दिवसांत पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईलने  आंदोलनाचा इशारा यावेळी  शहरप्रमुख वाळेकर यांनी दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, तसेच राजेश शिर्के, संभाजी कळमकर, पद्माकर दिघे. मिलिंद गान, नरेश मोरे., संजय गावडे, किशोर सोरखाते, सुप्रिया मालुसरे  आदींचा उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणीambernathअंबरनाथ