शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

अंबरनाथच्या पाणीटंचाईबाबत शिवसेनाही मैदानात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिलं निवेदन

By पंकज पाटील | Updated: May 15, 2023 17:29 IST

शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले आहे.

अंबरनाथ - अंबरनाथ शहराचा  पश्चिम भाग गेल्या काही वर्षांपासून तहानलेला असून त्या भागाचा पाणीपुरवठा तर सुरळीत करा. पण पूर्ण शहराला जाणवणारी पाणीटंचाई त्वरित दूर करा अशी मागणी करत आज शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले आहे.

अंबरनाथच्या पूर्व आणि  पश्चिम भागाला जाणवणाऱ्या अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्यात सुधारणा करावी या मागणीसाठी शहरप्रमुख वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयावर धडक देऊन पाणी टंचाईचा जाब विचारला. कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगर यांची भेट घेऊन पाणीबाणी संपुष्टात आणण्याची मागणी त्यांनी केली. 

अंबरनाथ शहरातील पाणी समस्येबाबत वारंवार सांगूनही ठोस कारवाई केली जात नाही, मोर्चे, आंदोलने, इशारे दिले की तेवढ्यापुरती त्या भागातील पाणी समस्या दूर केली जाते, आता उडवाउडवीची उत्तरे देऊ नका ती ऐकून घेणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. पाणी पुरवठा कमी होत असून त्यामध्ये वाढ करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहेत. मात्र वाढीव पाणी देण्यास एमआयडिसीने नकार दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.     

पश्चिमेकडील बालाजी नगर , मुरलीधर मंदिर, खामकर वाडी, आदी भागात  रात्री , मध्यरात्री अनियमित पाणी पुरवठा होतो.येत्या काही दिवसांत पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईलने  आंदोलनाचा इशारा यावेळी  शहरप्रमुख वाळेकर यांनी दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, तसेच राजेश शिर्के, संभाजी कळमकर, पद्माकर दिघे. मिलिंद गान, नरेश मोरे., संजय गावडे, किशोर सोरखाते, सुप्रिया मालुसरे  आदींचा उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणीambernathअंबरनाथ