शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

उल्हासनगरातील रस्त्याला शहर विकास आराखड्याचे वावडे, रस्ते बनत आहेत जैसे थे

By सदानंद नाईक | Updated: April 26, 2024 16:13 IST

उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याने, शहरात वाहतूक कोंडीसह अन्य समस्या उभ्या ठाकल्या आहेत.

उल्हासनगर : शहर विकास आराखड्यानुसार रस्स्त्याची पुनर्बांधणी होण्या ऐवजी जैसे थे होत असल्याचे चित्र शहरात आहे. डीपीनुसार रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या घरे, दुकाने व इमारतीला मार्किंग देण्यात आली मात्र अपवाद वगळता पाडकाम कारवाई नाही.

उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याने, शहरात वाहतूक कोंडीसह अन्य समस्या उभ्या ठाकल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी शहर विकास आराखड्यानुसार रस्त्याची पुनर्बांधणी महापालिका बांधकाम विभागाने सुरू केली. असे महापालिका प्रशासनाचे मत आहे. एमएमआरडीए अंतर्गत मुख्य ७ रस्त्यासाठी १५० कोटी, याशिवाय मूलभूत सुखसुविधा अंतर्गत पहिल्या टप्प्यात ४५ कोटी व नंतर २९ कोटीचा निधी शासनाने महापालिकेला दिला. गेल्या एका वर्षांपासून त्यातील मुख्य ७ रस्त्यासह इतर रस्त्याचे काम सुरू झाले. रस्ता पुनर्बांधणीच्या आड येणाऱ्या दुकानदार, इमारती व घरांना बांधकाम विभागाने नोटिसा दिल्या. मात्र काही अपवाद वगळता कोणत्याच बांधकामावर पाडकाम कारवाई केली नाही. 

शहर विकास आराखड्यानुसार कोणत्याच रस्त्याची पुनर्बांधणी होत नसल्याने, महापालिका कारभारावर सर्वस्तरातून टीका होत आहे. शहर आराखड्या विना रस्त्याची पुनर्बांधणी झाल्यास, शहराचे भविष्य धोक्यात आल्याचे बोलले जाते. डीपीनुसार रस्ता बांधणी करण्याची मागणी सामाजिक संघटना, समाजसेवक यांच्याकडून होत आहे. रस्ता रुंदीकरण्याच्या आड येणाऱ्या घरे, दुकाने व इमारतीला नोटीसा दिल्याने, त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र दुसरीकडे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने दिलासाही मिळाला आहे. जैसे थे रस्ता बांधणीवर मात्र सर्वस्तरातून टीकेची झोळ उठली आहे. पवई चौक, हिराघाट व नेताजी चौक येथील फक्त काही दुकाने व घरावर पाडकाम कारवाई झाली. इतर रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या शेकडो बांधकामांना अप्रत्यक्ष पाठीसी।घालण्याचे काम महापालिकेने केल्याची टीका होत आहे. 

रस्त्याची पुनर्बांधणी डीपीनुसार...शहर अभियंता संदीप जाधव शहरात बांधण्यात येत असलेल्या रस्त्याची बांधणी शहर विकास आराखड्यानुसार होत आहे. रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या असंख्य इमारती, घरे व दुकानांना नोटिसा दिल्या आहेत. रस्ता बांधणीवेळी वाद निर्माण होऊन रस्त्याचे काम ठप्प पडून निधी परत जाऊ नये. म्हणून काही ठिकाणी महापालिकेने लवचिक भूमिका घेतली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर