शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

उल्हासनगरातील रस्त्याला शहर विकास आराखड्याचे वावडे, रस्ते बनत आहेत जैसे थे

By सदानंद नाईक | Updated: April 26, 2024 16:13 IST

उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याने, शहरात वाहतूक कोंडीसह अन्य समस्या उभ्या ठाकल्या आहेत.

उल्हासनगर : शहर विकास आराखड्यानुसार रस्स्त्याची पुनर्बांधणी होण्या ऐवजी जैसे थे होत असल्याचे चित्र शहरात आहे. डीपीनुसार रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या घरे, दुकाने व इमारतीला मार्किंग देण्यात आली मात्र अपवाद वगळता पाडकाम कारवाई नाही.

उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याने, शहरात वाहतूक कोंडीसह अन्य समस्या उभ्या ठाकल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी शहर विकास आराखड्यानुसार रस्त्याची पुनर्बांधणी महापालिका बांधकाम विभागाने सुरू केली. असे महापालिका प्रशासनाचे मत आहे. एमएमआरडीए अंतर्गत मुख्य ७ रस्त्यासाठी १५० कोटी, याशिवाय मूलभूत सुखसुविधा अंतर्गत पहिल्या टप्प्यात ४५ कोटी व नंतर २९ कोटीचा निधी शासनाने महापालिकेला दिला. गेल्या एका वर्षांपासून त्यातील मुख्य ७ रस्त्यासह इतर रस्त्याचे काम सुरू झाले. रस्ता पुनर्बांधणीच्या आड येणाऱ्या दुकानदार, इमारती व घरांना बांधकाम विभागाने नोटिसा दिल्या. मात्र काही अपवाद वगळता कोणत्याच बांधकामावर पाडकाम कारवाई केली नाही. 

शहर विकास आराखड्यानुसार कोणत्याच रस्त्याची पुनर्बांधणी होत नसल्याने, महापालिका कारभारावर सर्वस्तरातून टीका होत आहे. शहर आराखड्या विना रस्त्याची पुनर्बांधणी झाल्यास, शहराचे भविष्य धोक्यात आल्याचे बोलले जाते. डीपीनुसार रस्ता बांधणी करण्याची मागणी सामाजिक संघटना, समाजसेवक यांच्याकडून होत आहे. रस्ता रुंदीकरण्याच्या आड येणाऱ्या घरे, दुकाने व इमारतीला नोटीसा दिल्याने, त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र दुसरीकडे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने दिलासाही मिळाला आहे. जैसे थे रस्ता बांधणीवर मात्र सर्वस्तरातून टीकेची झोळ उठली आहे. पवई चौक, हिराघाट व नेताजी चौक येथील फक्त काही दुकाने व घरावर पाडकाम कारवाई झाली. इतर रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या शेकडो बांधकामांना अप्रत्यक्ष पाठीसी।घालण्याचे काम महापालिकेने केल्याची टीका होत आहे. 

रस्त्याची पुनर्बांधणी डीपीनुसार...शहर अभियंता संदीप जाधव शहरात बांधण्यात येत असलेल्या रस्त्याची बांधणी शहर विकास आराखड्यानुसार होत आहे. रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या असंख्य इमारती, घरे व दुकानांना नोटिसा दिल्या आहेत. रस्ता बांधणीवेळी वाद निर्माण होऊन रस्त्याचे काम ठप्प पडून निधी परत जाऊ नये. म्हणून काही ठिकाणी महापालिकेने लवचिक भूमिका घेतली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर