शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

ठाण्यातील कोविड मृतांच्या नातेवाइकांची होतेय फरफट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 08:20 IST

आयसीएमआरमध्ये नोंदच नाही : सरकारी मदतीपासून अनेकजण वंचित 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  :  कोरोनाकाळात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना सरकारच्या वतीने ५० हजारांची मदत देण्यात येत आहे. त्यासाठी ठाणे महापालिका हद्दीतून शेकडो नातेवाइकांनी ऑनलाइन अर्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो भरताना ज्यांचा मृत्यू झाला, त्यांची आयसीएमआरमध्ये नोंदच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. सोमवारी याच मुद्द्यावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे दुपारी अनेकांनी जाब विचारला. परंतु, यात चूक कोणाची, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

 कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या आकडेवारीनुसार, २१२७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर केंद्राने अशा नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे करून ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून याचा लाभ घेण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार ठाण्यातील मृतांच्या अनेक नातेवाइकांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो भरताना मृत्यू झालेल्याची नोंदच आयसीएमआरकडे झाली नसल्याचा मेसेज येत असल्याने अनेक कुटुंबीय हताश झाले. तर ही वेबसाईट ओपन केल्यानंतर नोंद नसेल तर त्या ठिकाणी आणखी एक सुविधा उपलब्ध असून, त्यानुसार तेथील जीआरसीवर जाऊन क्लिक केल्यावर नातेवाइकांना अपील करण्याची संधी दिली जाते. त्यानंतर अपिलात गेलेल्यांनी सोमवारी पालिकेच्या मुख्यालयात धाव घेऊन आपली फाईल पुन्हा जमा केली. 

पालिकेने त्यांचे अपील घेतले असून, पुढील प्रक्रियेसाठी किंवा अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहे. यावर काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नेमकी चूक कोणाची आहे?

वास्तविक, एखाद्याची कोरोना चाचणी करताना त्याचा आधार कार्ड क्रमांकही घेतला जातो. त्यानुसार त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची नोंद ही आयसीएमआरकडे होत असते. तशीच नोंद मृत्यूची होणे अपेक्षित आहे. मात्र, ही चूक कोणाकडून झाली, असा सवाल आता करण्यात येत आहे. 

ज्यांचे असे इश्यु झाले असतील त्यांनी ऑनलाइन अर्ज करणे अपेक्षित असते. त्या वेळेस काही डाक्युमेंट सादर करणे अपेक्षित असते. तर काही वेळेस मृत्यूचे कारण दाखविले जात नसल्याने अशांसाठी पुन्हा एक संधी दिली जाते. त्यानुसार ते अपिलात जातात. त्यानंतर त्यांच्या फाईलनुसार महापालिकेच्या माध्यमातून अहवाल अंतिम केला जातो. - मनिष जोशी, उपायुक्त, ठामपा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या