शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

ठाण्यातील कोविड मृतांच्या नातेवाइकांची होतेय फरफट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 08:20 IST

आयसीएमआरमध्ये नोंदच नाही : सरकारी मदतीपासून अनेकजण वंचित 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  :  कोरोनाकाळात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना सरकारच्या वतीने ५० हजारांची मदत देण्यात येत आहे. त्यासाठी ठाणे महापालिका हद्दीतून शेकडो नातेवाइकांनी ऑनलाइन अर्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो भरताना ज्यांचा मृत्यू झाला, त्यांची आयसीएमआरमध्ये नोंदच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. सोमवारी याच मुद्द्यावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे दुपारी अनेकांनी जाब विचारला. परंतु, यात चूक कोणाची, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

 कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या आकडेवारीनुसार, २१२७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर केंद्राने अशा नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे करून ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून याचा लाभ घेण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार ठाण्यातील मृतांच्या अनेक नातेवाइकांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो भरताना मृत्यू झालेल्याची नोंदच आयसीएमआरकडे झाली नसल्याचा मेसेज येत असल्याने अनेक कुटुंबीय हताश झाले. तर ही वेबसाईट ओपन केल्यानंतर नोंद नसेल तर त्या ठिकाणी आणखी एक सुविधा उपलब्ध असून, त्यानुसार तेथील जीआरसीवर जाऊन क्लिक केल्यावर नातेवाइकांना अपील करण्याची संधी दिली जाते. त्यानंतर अपिलात गेलेल्यांनी सोमवारी पालिकेच्या मुख्यालयात धाव घेऊन आपली फाईल पुन्हा जमा केली. 

पालिकेने त्यांचे अपील घेतले असून, पुढील प्रक्रियेसाठी किंवा अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहे. यावर काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नेमकी चूक कोणाची आहे?

वास्तविक, एखाद्याची कोरोना चाचणी करताना त्याचा आधार कार्ड क्रमांकही घेतला जातो. त्यानुसार त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची नोंद ही आयसीएमआरकडे होत असते. तशीच नोंद मृत्यूची होणे अपेक्षित आहे. मात्र, ही चूक कोणाकडून झाली, असा सवाल आता करण्यात येत आहे. 

ज्यांचे असे इश्यु झाले असतील त्यांनी ऑनलाइन अर्ज करणे अपेक्षित असते. त्या वेळेस काही डाक्युमेंट सादर करणे अपेक्षित असते. तर काही वेळेस मृत्यूचे कारण दाखविले जात नसल्याने अशांसाठी पुन्हा एक संधी दिली जाते. त्यानुसार ते अपिलात जातात. त्यानंतर त्यांच्या फाईलनुसार महापालिकेच्या माध्यमातून अहवाल अंतिम केला जातो. - मनिष जोशी, उपायुक्त, ठामपा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या