शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

मुंबईसाठी काय केले याचा हिशोब जनतेचा मागणार; एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरे यांना टोला

By अजित मांडके | Updated: January 21, 2023 19:59 IST

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजप, बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, येथे जगभरातून फिरायला लोक येत असतात. त्यामुळे मागील सहा महिन्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार आल्यानंतर आम्ही येथे अनेक विकासाची कामे केली आहे, मुंबईकरांना खड्डेमुक्त प्रवास दिला जाणार आहे. परंतु तुम्ही काय केले, याचा हिशोब आता जनता मागणार आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. तर काही लोक हे आरोप करीत असतात, टिका करीत असतात. मात्र टिका करणारे लोक नागरीकांना आवडत नाहीत. तर काम करणारे लोक नागरीकांना आवडतात. त्यामुळे तुम्ही टिका करीत रहा आम्ही काम करत राहू अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजप, बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आमच्याकडे देखील चांगले गुण होते, मात्र आम्हाला संधी दिली गेली नाही, आम्हाला सतत दाबण्याचा प्रयत्न झाला. आता संधी आली आणि आम्ही चमत्कार करुन दाखवला असेही ते म्हणाले. शिक्षक आमदार निवडणुकीत मागच्या वेळेस युती नव्हती. मात्र आतून तुमची युती होती, असे सांगत त्यांनी वामन म्हात्रेंची शाळा घेतली. मात्र आता आपली उघड युती आहे, त्यामुळे आपला विजय हा मोठा असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षक हे आपले भविष्यातील घडी आहे, आणि विद्याथ्र्याना घडविण्याचे काम हे शिक्षक करीत असतो. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही शिक्षकच उमेदवार दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा मुद्दा देखील लवकरच मार्गी लावला जाईल असेही त्यांनी सांगितले.

मागील सहा महिन्यात राज्याच्या विकासाच्या दृष्टीने पावले उचलली गेली आहे. समृध्दी महामार्गामुळे पुढील सहा महिन्यात ठाणो ते शिर्डी हा प्रवास अवघ्या दिड ते पावणो दोन तासात होणार आहे. विरार ते वर्सोवा असा सी लिंक तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विकासाची अनेक कामे हाती घेतली आहेत. मात्र मागील अडीच वर्षात हाच विकास थांबला होता. परंतु आम्ही वाटेतील स्पीड ब्रेकर आता काढून टाकली आहेत. आता सर्वसामान्यांचे सरकार आले आहे, आपले सरकार आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेना - भाजप युती व्हावी ही बाळासाहेबांची इच्छा होती, त्यानुसार उध्दव ठाकरे यांना मी सुध्दा सांगितले होते, की काही तरी गडबड होईल परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यांनी नको तेच केले आणि मग शिंदे यांनी देखील त्यांना जे नको होते, तेच केले. त्यांची ही आधीपासूनची खदखद होती, ती बाहेर आली. माझा पक्ष छोटो आहे, मात्र हाच पक्ष योग्य वेळी काटा काढण्याचे काम करीत आहे.(रामदास आठवले - केंद्रीय राज्यमंत्री)

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना