शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

राज्यातील नवे सरकार काहींना हजम होत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 06:36 IST

आमचा काहीच अजेंडा नाही, फक्त जनतेची सेवा करायची, तिला न्याय द्यायचा आणि राज्याचा सर्वांगिण विकास, हाच आमचा अजेंडा आहे

ठाणे- 

आमचा काहीच अजेंडा नाही, फक्त जनतेची सेवा करायची, तिला न्याय द्यायचा आणि राज्याचा सर्वांगिण विकास, हाच आमचा अजेंडा आहे. मात्र, राज्यात नवे सरकार आलेय, ही गोष्ट काही लोकांना हजम होत नाही. एकनाथ शिंदे कसा डोलारा सांभाळतील, याबाबत ते शंका-कुशंका व्यक्त करतात. मात्र, बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झाले आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विरोधकांचा समाचार घेतला. 

स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शक्तिस्थळावर येऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिघे यांना अभिवादन केले. त्यानंतर दिघे यांच्या आठवणींना उजाळा देताना विरोधकांचाही समाचार घेतला. काही लोकांना राज्यातील नवे सरकार आलेय, ही गोष्ट हजम होत नाही, काहींच्या घशाखाली हे उतरत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले. त्यामुळे शिंदे हा डोला सांभाळतील किंवा कसे याबाबत ते संशय घेत आहेत. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून दोन महिन्यांत राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आमचा काहीच अजेंडा नाही, आमचा अजेंडा शून्य आहे. फक्त जनतेची सेवा, जनतेला न्याय आणि या राज्याच्या सर्वांगिण विकास हाच आमचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितलं. 

आनंद दिघे हे आपल्यात शरीराने नसले तरी मनाने आपल्या सोबत आहेत, त्याची प्रचिती येते. जिल्ह्यात त्यांनी अलौकिक कार्य केले. त्यांच्यावरील सिनेमात त्यांचा सर्व जीवनपट उलगडू शकत नाही. त्यांचा त्यात आपण पाहिला असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेबांना जे हिंदुत्व अभिप्रेत होते, ते हिंदुत्व त्यांनी तळागळात पोहोचवले आणि त्याची पोचपावती जनतेने दिल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी अखेरीस सांगितले. 

पोटात तेच ओठात- दीड महिन्यापूर्वी आम्ही कठीण अशी लढाई लढलो, ती लढाई साधी नव्हती. त्यावेळेस हितचिंतक आणि राजकारणातील मित्रांना धास्ती वाटली. - अखेर लढाई आम्ही जिंकलो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. माझ्या गुरूच्या आशीर्वादाने मी हा पल्ला गाठला. - या सरकारने दीड महिन्यात ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. आपल्या पोटात जे आहे तेच ओठात असल्याचेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे