शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

Mira Bhayander: वरसावे येथील खाडीवरचा नवीन ५ पदरी उडडाणपूल फेब्रुवारी-मार्चमध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता

By धीरज परब | Updated: November 30, 2022 14:24 IST

Mira Bhayander: गेल्या अनेक वर्षां पासून काशीमीराच्या वरसावे नाका येथील खाडीवर असलेल्या जुन्या पुलां मुळे होणारी जाचक वाहतूक कोंडी पुढील वर्षी सुटणार आहे .

 - धीरज परब 

मीरारोड - गेल्या अनेक वर्षां पासून काशीमीराच्या वरसावे नाका येथील खाडीवर असलेल्या जुन्या पुलां मुळे होणारी जाचक वाहतूक कोंडी पुढील वर्षी सुटणार आहे . खाडी वरील मुंबई कडून वसई - सुरत कडे जाणारा नवीन ५ पदरी उड्डाणपूलचे काम बहुतांश झाले असून पुढील वर्षात फेब्रुवारी अखेर किंवा मार्च मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

वसई खाडी वर दोन पूल आहेत . एक जुना पूल कमकुवत झाला असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी पूल बंद ठेवावा लागत होता . त्यावरून अवजड वाहनांना मनाई केली गेली तर धीम्या गतीने वाहने जात असल्याने मोठी वाहनकोंडी होऊ लागली . पावसाळ्यात जुन्या पुलांवर खड्डे पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत .  देशाच्या मुख्य राष्ट्रीय महामार्गची अशी बिकट परिस्थिती झाल्याने संताप व्यक्त होत होता.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ५ पदरी नवीन पूल बांधण्यासाठी डिसेंबर २०१६ ला निविदा काढून मार्च २०१७ ला कार्यादेश दिले .  मात्र महत्वाच्या परवानग्या घेतल्या नव्हत्या त्यामुळे आणि नंतर २०२० सालात कोरोना लागल्याने पुलाचे काम रखडले . पुलाचे काम रखडल्याने येथील वाहतूक कोंडी मुळे नागरिक मात्र रडकुंडीला आले आहेत.

ह्या ठिकाणी नवीन पूल पाच पदरी असल्याने त्या नव्या पुलावरून मुंबई - मीरा भाईंदर कडून  वसई व पुढे गुजरात  दिशेला जाणारी वाहनं जातील . तर सध्याचा जुना व दुसरा सुमारे १७ वर्षां पूर्वी बांधलेल्या पुला वरून मुंबई - ठाणे कडे जाणारी वाहनं धावतील . मुंबई - मीरा भाईंदर वरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहनं हि उड्डाणपुलाखालून जातील . त्याच प्रमाणे ठाण्या वरून वसई - गुजरात कडे जाणारी वाहनं नवीन उडडाणपुलाला जोडणाऱ्या पुला वरून  जातील.

सध्या केवळ नवीन ५ पदरी पूल हा फेब्रुवारी - मार्च दरम्यान पूर्ण होऊन तो आधी वाहनांसाठी खुला केला जाणार आहे . त्या पुलावरून मुंबई - मीरा भाईंदर कडून येणारी व वसई - गुजरात दिशेला जाणारी वाहनं जाणार आहेत . त्यामुळे सध्या वरसावे नाका येथे एकाच जुन्या पुलावरून वसई दिशेने जाणाऱ्या वाहनां मुळे होणारी कोंडी फुटणार आहे.

नवीन पूल सुरु झाल्या नंतर ठाणे वरून वसई - गुजरात दिशेला जाणाऱ्या पुला साठी मोठी अडचण प्राधिकरण व वाहतूक पोलिसांना भेडसावणार आहे . कारण वरसावे नाक्यावर सदर काम करताना वसई - गुजरात वरून ठाण्याला जाणारी तसेच ठाण्या कडून वसई दिशेला जाणारी वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे . तसेच अन्यत्र वळवावी लागणार आहे असे सूत्रांनी सांगितले .

वरसावे नाका येथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासह पुलांचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी महामार्ग प्राधिकरण आणि केंद्रीय मंत्रालया कडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे . नवीन उड्डाणपूल नवीन वर्षात फेब्रुवारी वा मार्च पर्यंत नागरिकां साठी खुला करण्याचे प्राधिकरणा कडून आश्वस्त केले गेल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर