शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

Mira Bhayander: वरसावे येथील खाडीवरचा नवीन ५ पदरी उडडाणपूल फेब्रुवारी-मार्चमध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता

By धीरज परब | Updated: November 30, 2022 14:24 IST

Mira Bhayander: गेल्या अनेक वर्षां पासून काशीमीराच्या वरसावे नाका येथील खाडीवर असलेल्या जुन्या पुलां मुळे होणारी जाचक वाहतूक कोंडी पुढील वर्षी सुटणार आहे .

 - धीरज परब 

मीरारोड - गेल्या अनेक वर्षां पासून काशीमीराच्या वरसावे नाका येथील खाडीवर असलेल्या जुन्या पुलां मुळे होणारी जाचक वाहतूक कोंडी पुढील वर्षी सुटणार आहे . खाडी वरील मुंबई कडून वसई - सुरत कडे जाणारा नवीन ५ पदरी उड्डाणपूलचे काम बहुतांश झाले असून पुढील वर्षात फेब्रुवारी अखेर किंवा मार्च मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

वसई खाडी वर दोन पूल आहेत . एक जुना पूल कमकुवत झाला असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी पूल बंद ठेवावा लागत होता . त्यावरून अवजड वाहनांना मनाई केली गेली तर धीम्या गतीने वाहने जात असल्याने मोठी वाहनकोंडी होऊ लागली . पावसाळ्यात जुन्या पुलांवर खड्डे पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत .  देशाच्या मुख्य राष्ट्रीय महामार्गची अशी बिकट परिस्थिती झाल्याने संताप व्यक्त होत होता.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ५ पदरी नवीन पूल बांधण्यासाठी डिसेंबर २०१६ ला निविदा काढून मार्च २०१७ ला कार्यादेश दिले .  मात्र महत्वाच्या परवानग्या घेतल्या नव्हत्या त्यामुळे आणि नंतर २०२० सालात कोरोना लागल्याने पुलाचे काम रखडले . पुलाचे काम रखडल्याने येथील वाहतूक कोंडी मुळे नागरिक मात्र रडकुंडीला आले आहेत.

ह्या ठिकाणी नवीन पूल पाच पदरी असल्याने त्या नव्या पुलावरून मुंबई - मीरा भाईंदर कडून  वसई व पुढे गुजरात  दिशेला जाणारी वाहनं जातील . तर सध्याचा जुना व दुसरा सुमारे १७ वर्षां पूर्वी बांधलेल्या पुला वरून मुंबई - ठाणे कडे जाणारी वाहनं धावतील . मुंबई - मीरा भाईंदर वरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहनं हि उड्डाणपुलाखालून जातील . त्याच प्रमाणे ठाण्या वरून वसई - गुजरात कडे जाणारी वाहनं नवीन उडडाणपुलाला जोडणाऱ्या पुला वरून  जातील.

सध्या केवळ नवीन ५ पदरी पूल हा फेब्रुवारी - मार्च दरम्यान पूर्ण होऊन तो आधी वाहनांसाठी खुला केला जाणार आहे . त्या पुलावरून मुंबई - मीरा भाईंदर कडून येणारी व वसई - गुजरात दिशेला जाणारी वाहनं जाणार आहेत . त्यामुळे सध्या वरसावे नाका येथे एकाच जुन्या पुलावरून वसई दिशेने जाणाऱ्या वाहनां मुळे होणारी कोंडी फुटणार आहे.

नवीन पूल सुरु झाल्या नंतर ठाणे वरून वसई - गुजरात दिशेला जाणाऱ्या पुला साठी मोठी अडचण प्राधिकरण व वाहतूक पोलिसांना भेडसावणार आहे . कारण वरसावे नाक्यावर सदर काम करताना वसई - गुजरात वरून ठाण्याला जाणारी तसेच ठाण्या कडून वसई दिशेला जाणारी वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे . तसेच अन्यत्र वळवावी लागणार आहे असे सूत्रांनी सांगितले .

वरसावे नाका येथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासह पुलांचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी महामार्ग प्राधिकरण आणि केंद्रीय मंत्रालया कडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे . नवीन उड्डाणपूल नवीन वर्षात फेब्रुवारी वा मार्च पर्यंत नागरिकां साठी खुला करण्याचे प्राधिकरणा कडून आश्वस्त केले गेल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर