शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

माेबाइल पुन्हा सापडण्याचे प्रमाण केवळ सव्वा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2023 11:34 IST

चार महिन्यांत १,६०० गहाळ : परत मिळाले १८३ माेबाइल

- धीरज परब लोकमत न्यूज नेटवर्कमीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते एप्रिल २०२३ या चार महिन्यांतील गहाळ झालेले व चोरीला गेलेल्या मोबाइलची संख्या सुमारे १,६०० च्या घरात असून, त्यापैकी केवळ १८३ मोबाइल हस्तगत केले आहेत. त्यामुळे मोबाइल पुन्हा मिळविण्याचे प्रमाण अवघा एक ते सव्वा टक्का इतकेच आहे. त्यातही चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला जात असला, तरी गहाळ झालेल्या मोबाइल प्रकरणात गुन्हा दाखल केला जात नसल्याने, सापडलेले मोबाइल प्रामाणिकपणे परत करण्याचे प्रमाण नाममात्र आहे. 

पोलिस आयुक्तालयाच्या जनसंपर्क विभागातून दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार भागात जानेवारी ते एप्रिल २०२३ या चार महिन्यांतील गहाळ मोबाइलची संख्या १ हजार ४६० इतकी आहे. त्यापैकी ६७ मोबाइल पोलिसांना सापडले आहेत. ५२ मोबाइल हे संबंधित व्यक्तींना परत केले गेले. याच कालावधीत मोबाइल चोरीचे ११० गुन्हे दाखल झालेले आहेत, तर ५५ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून ११६ मोबाइल हस्तगत केले आहेत. ५० मोबाइल नागरिकांना परत केले आहेत. 

प्रवासात विसरण्याच्या घटना अधिक    रिक्षा, बस, ट्रेन आदींमध्ये प्रवासाच्या दरम्यान वा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मोबाइल विसरण्याचे, पडण्याचे प्रकार हे जास्त हाेतात. त्यामुळे गहाळ मोबाइलच्या नोंदी जास्त आहेत, असे सांगितले जाते. गहाळ झालेला मोबाइल हा कोणाला ना कोणाला सापडलेला असतो.     या माेबाइलची विक्री, तसेच वापर करणे हा फौजदारी दखलपात्र गुन्हा आहे. मात्र, पोलिस तसे गुन्हे दाखल करत नसल्याने, चोरटे व लबाडी करणारे मोकाट आहेत.    पोलिसांनी हरवलेला मोबाइल परत करणाऱ्यांचे कौतुक करणे जसे आवश्यक आहे, तसेच मोबाइल लबाडीने स्वतःकडेच ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. 

विदेशातही हाेते विक्रीगहाळ झालेले मोबाइल हे पुन्हा वापरात आल्यास त्याच्या आयएमईए क्रमांकावरून पुन्हा सापडतात. चोरी झालेले मोबाइल हे देशातच नव्हे, तर ते नेपाळ, बांगलादेशपासून अन्य देशांतही विक्रीसाठी पाठविले जातात. मोबाइलमधील महागडे पार्ट विक्री केले जातात. मात्र, हे खूपच कमी प्रमाण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुलगी रिक्षात प्रवास करत असताना २३ एप्रिल, २०२१ रोजी १२ हजारांचा मोबाइल गहाळ झाला होता. पोलिसांनी त्यावेळी मोबाइल मिळेल, असे आश्वस्त केले होते. नुकताच पोलिसांनी तो मोबाइल परत मिळवून दिला आहे. मोबाइल सुस्थितीत आहे. यामुळे पोलिसांवरील विश्वास आणखी वाढला असून आनंद झाला.    - बाळासाहेब गोडसे, काशिमीरा

टॅग्स :theftचोरी