शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
2
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
3
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
4
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
5
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
6
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
7
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
8
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
9
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
10
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
11
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
12
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
13
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
15
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
16
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
17
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
19
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
20
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
Daily Top 2Weekly Top 5

माेबाइल पुन्हा सापडण्याचे प्रमाण केवळ सव्वा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2023 11:34 IST

चार महिन्यांत १,६०० गहाळ : परत मिळाले १८३ माेबाइल

- धीरज परब लोकमत न्यूज नेटवर्कमीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते एप्रिल २०२३ या चार महिन्यांतील गहाळ झालेले व चोरीला गेलेल्या मोबाइलची संख्या सुमारे १,६०० च्या घरात असून, त्यापैकी केवळ १८३ मोबाइल हस्तगत केले आहेत. त्यामुळे मोबाइल पुन्हा मिळविण्याचे प्रमाण अवघा एक ते सव्वा टक्का इतकेच आहे. त्यातही चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला जात असला, तरी गहाळ झालेल्या मोबाइल प्रकरणात गुन्हा दाखल केला जात नसल्याने, सापडलेले मोबाइल प्रामाणिकपणे परत करण्याचे प्रमाण नाममात्र आहे. 

पोलिस आयुक्तालयाच्या जनसंपर्क विभागातून दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार भागात जानेवारी ते एप्रिल २०२३ या चार महिन्यांतील गहाळ मोबाइलची संख्या १ हजार ४६० इतकी आहे. त्यापैकी ६७ मोबाइल पोलिसांना सापडले आहेत. ५२ मोबाइल हे संबंधित व्यक्तींना परत केले गेले. याच कालावधीत मोबाइल चोरीचे ११० गुन्हे दाखल झालेले आहेत, तर ५५ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून ११६ मोबाइल हस्तगत केले आहेत. ५० मोबाइल नागरिकांना परत केले आहेत. 

प्रवासात विसरण्याच्या घटना अधिक    रिक्षा, बस, ट्रेन आदींमध्ये प्रवासाच्या दरम्यान वा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मोबाइल विसरण्याचे, पडण्याचे प्रकार हे जास्त हाेतात. त्यामुळे गहाळ मोबाइलच्या नोंदी जास्त आहेत, असे सांगितले जाते. गहाळ झालेला मोबाइल हा कोणाला ना कोणाला सापडलेला असतो.     या माेबाइलची विक्री, तसेच वापर करणे हा फौजदारी दखलपात्र गुन्हा आहे. मात्र, पोलिस तसे गुन्हे दाखल करत नसल्याने, चोरटे व लबाडी करणारे मोकाट आहेत.    पोलिसांनी हरवलेला मोबाइल परत करणाऱ्यांचे कौतुक करणे जसे आवश्यक आहे, तसेच मोबाइल लबाडीने स्वतःकडेच ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. 

विदेशातही हाेते विक्रीगहाळ झालेले मोबाइल हे पुन्हा वापरात आल्यास त्याच्या आयएमईए क्रमांकावरून पुन्हा सापडतात. चोरी झालेले मोबाइल हे देशातच नव्हे, तर ते नेपाळ, बांगलादेशपासून अन्य देशांतही विक्रीसाठी पाठविले जातात. मोबाइलमधील महागडे पार्ट विक्री केले जातात. मात्र, हे खूपच कमी प्रमाण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुलगी रिक्षात प्रवास करत असताना २३ एप्रिल, २०२१ रोजी १२ हजारांचा मोबाइल गहाळ झाला होता. पोलिसांनी त्यावेळी मोबाइल मिळेल, असे आश्वस्त केले होते. नुकताच पोलिसांनी तो मोबाइल परत मिळवून दिला आहे. मोबाइल सुस्थितीत आहे. यामुळे पोलिसांवरील विश्वास आणखी वाढला असून आनंद झाला.    - बाळासाहेब गोडसे, काशिमीरा

टॅग्स :theftचोरी